फलटण प्रतिनिधी -
सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतला अन सर्व विभागातील अधिकाऱ्यांना बरोबर घेत तुमच्या वाडी वस्तीवर गावात आलो, शेतकऱ्यांची दुःख काय असतात ती मला माहिती आहेत मी एक शेतकरी पुत्र आहे, म्हणून विधानसभेत आवाज उठवीत तब्बल 55 किलोमीटर चे पानंद रस्ते फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करून आणले गावात थेठ जाऊन अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या असलेल्या अडचणी सोडविल्या आत्तापर्यंत माजी आमदार कधी साधी गावात भेट तरी दिली होती का? असा हल्लाबोल करीत होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन आमदार सचिन पाटील यांनी केले.
बरड जिल्हा परिषद गटाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे तसेच बरड गणाच्या उमेदवार सौ. अनिता ताई गावडे यांच्या प्रचारार्थ झालेल्या प्रचार शुभारंभ प्रसंगी मुंजवडी येथे बोलताना आमदार सचिन पाटील यांनी केले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नीरा देवधर चा प्रश्न मार्गी लावत तब्बल चार हजार कोटी रुपयांचा निधी आणला असून शेतकऱ्यांना आपल्या बांधपर्यंत पाणी देण्यासाठी केंद्र असेल किंवा राज्य सरकार असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विकास निधी आणत आहेत मात्र विरोधक त्यांच्यावर दहशतीचा मुद्दा पुढे करीत जनतेची दिशाभूल करीत आहेत, हो दादांची दहशत आहे ती विकासाची आहे, गेली तीस पस्तीस वर्षे झाली तुमच्याकडे सर्व सत्तास्थाने होती परंतु तुम्ही जनतेला नेहमी झुलवत ठेवले, निवडणुका आल्या की पाणी प्रश्न पुढे करून निवडणुका जिंकल्या सत्ता भोगली मंत्रिपद भोगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भोगले मात्र तुम्ही विकास केला नाही म्हणून तुम्हाला जनतेने विधानसभा निवडणुकीत नाकारले, तसेच फलटण पालिका निवडणुकीत सुद्धा तुमचा दारुण पराभव झाला आता ही फलटण तालुक्यातील स्वाभिमानी जनता तुमचा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत तुमचा पराभव करेल असा ठाम विश्वास व्यक्त करीत विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले.
दरम्यान यावेळी मुंजवडी येथील प्रचार सभेत बोलताना आमदार सचिन पाटील यांनी सांगितले की माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना कोरोना मुळे थोडा काळ मिळाला होता मात्र त्यांनी केंद्रातून कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी खेचून आणित फलटण तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवीला असून आता नीरा देवधर व धोम बलकवडी मुळे शेतकऱ्यांची आर्थिक क्रांती घडणार आहे तसेच युवकांच्या रोजगारासाठी नाईकबोमवाडी येथील एम आय डी सी चा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावला असून लवकरच त्या ठिकाणी चांगल्या मल्टी नॅशनल कंपन्या उभ्या राहून युवकांच्या रोजगारचा प्रश्न मिटणार आहे या मुळे जिल्हा परिषदे चे उमेदवार भाऊसाहेब मोरे व बरड पंचायत समितीच्या उमेदवार सौ. अनिता गावडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर,माजी पंचायत समिती सदस्य संजय कापसे,शरद झेंडे,विशाल पवार, यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















