Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

कायदेशीर बांधकाम परवानगी घेताना सरकारी अनास्थेमुळे येताहेत अडचणी व समस्या

राजेंद्र चव्हाण : अधिकृत गावठाणे घोषित नसल्याने अनधिकृत बांधकामांना खतपाणी
टीम : धैर्य टाईम्स
problems arise due to government apathy in obtaining legal building permits
घोषित असलेल्या गावठाणांपासून या गावांच्या सन 2011 च्या लोकसंख्येनुसार बिनशेती व बांधकाम परवानगी देण्याचे धोरण सुरू झाले. त्यापूर्वी कोणत्याही गावच्या महसुली हद्दीत कोठेही बिनशेती परवानगी दिली जात असे. या धोरणामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावच्या गावठाणाची अधिकृतता असणे अत्यंत आवश्यक व महत्वाचे झाले.

सातारा : सन 2018 मध्ये शासनाने सातारा जिल्ह्यासाठीचा रिजनल प्लॅन मंजूर केला. तसेच गावठाणापासून 200 मीटर परीघाच्या अंतरातील जमीनींना बिनशेती परवानगी घेण्याची गरज नसल्याबाबतचा शासन निर्णय घेतला व तो प्रसिध्द केला. तेव्हापासून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 122 नुसार घोषित असलेल्या गावठाणांपासून या गावांच्या सन 2011 च्या लोकसंख्येनुसार बिनशेती व बांधकाम परवानगी देण्याचे धोरण सुरू झाले. त्यापूर्वी कोणत्याही गावच्या महसुली हद्दीत कोठेही बिनशेती परवानगी दिली जात असे. या धोरणामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावच्या गावठाणाची अधिकृतता असणे अत्यंत आवश्यक व महत्वाचे झाले.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 122 नुसार प्रत्येक गावाच्या सीमा म्हणजेच गावठाणांची निश्चिती व घोषणा केली जाते. तसेच याच 122 कलमानुसार प्रत्येक गावाच्या भविष्यातील विकासाचा कल लक्षात घेऊन नगर भूमापन करण्याची प्रक्रीया केली जाते. म्हणजेच एका अर्थाने गावांच्या किंवा शहरांच्या हद्दी नव्याने निश्चीत केल्या जातात.
याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये अनेक शासकीय जलसिंचन प्रकल्प झाले असून या प्रकल्पांमुळे बाधित होऊन विस्थापित झालेल्या गावांसंबंधीचे पुनर्वसन करताना नवीन व लाभक्षेत्रामधील गावांच्या महसुली हद्दींमध्ये या बाधित गावांचे पुनर्वसन केले जाते. भविष्यात अशा गावांचाही विस्तार होऊ शकतो. 
मूळ गावांमधील लोकसंख्यावाढीमुळे अनेक गावांलगत लोक आपापल्या कुवतीनुसार व गरजेमुळे बांधकामे करत असतात. त्यामुळे गावांची वाढ तसेच गावांच्या हद्दी वाढत असतात. अनेक गावांमधील नागरीक हे त्यांचे मूळ शेती या पारंपारीक उद्योगासंबंधाने आपल्याला सोईचे व्हावे या विचाराने वस्त्यांवर रहिवास सुरू करतात. 
फार पूर्वीपासून अनेक गावांलगत वाड्याही अस्तित्वात आहेत. शासन जणगणना करताना प्रत्येक गावच्या महसूल हद्दीत राहणार्‍या नागरीकांचा म्हणजेच गावालगतच्या वस्त्यांवरील व वाड्यांवरील आणि वाढलेल्या हद्दीतील, नव्याने निर्माण झालेल्या परंतु महसूल अधिनियमानुसार घोषित न झालेल्या गावठाणांमधील नागरीकांचा (फक्त मूळ गावठाणामध्ये राहणार्‍या नागरीकांचा नव्हे) जणगणनेमध्ये  अंतर्भाव करते. अश्या प्रकारे वाढलेल्या भागातील नागरीकांना संबंधित गावच्या ग्रामपंचायती काही प्रकारच्या नागरी सुविधाही पुरवितात आणि यासुविधांपोटी त्यांचेकडून त्या गावचे नागरीक म्हणून करवसुलीही केली जाते. या सर्व बाबींचा विचार करता गावे अगर नगरांलगत वाढणार्‍या भागातील नागरीकांचे अस्तित्व व वास्त्यव्य या दोन्ही गोष्टी मान्य केल्या जातात. रिजनलस प्लॅनमधील नियमांमुळे सन 2011 च्या जनगणनेनुसारची लोकसंख्या हीच मूळ पायाभूत बाब असल्याने विकासास परवानग्या देताना गावठाण घोषणा हा कळीचा मुद्दा बनला आहे.
परंतू दुर्दैवाने अशी वाढ होत असताना शासकीय यंत्रणेच्या उदासिनतेमुळे व निष्क्रीयतेमुळे अश्या वाढीव हद्दी या मूळ गावांकरीता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 122 च्या तरतूदींप्रमाणे वाढीव गावठाणे म्हणून शासनाकडून घोषित झालेली नाहीत. कहर म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून गावठाण ही संकल्पना अस्तित्वात असताना भारत स्वतंत्र झाल्यावर व वेगळ्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतरही अनेक गावांना गावठाणेच नाहीत अगर शासकीय नियमांप्रमाणे गावठाणे घोषित नाहीत. एकट्या पाटण तालुक्यात अनेक गावांना गावठाणेच नाहीत ही वस्तस्थिती आहे, तर जिल्ह्यातील गावांचे गावनकाशे व अभिलेख पाहता काही ठिकाणी कायद्यातील तरतुदींप्रमाणे निर्मीत व घोषित गावठाणेही भूमी अभिलेख विभागाकडील गाव नकाशांवर अद्ययावत करून दर्शविलेली नाहीत.
बदलत्या परीस्थितीतील लोकांच्या आर्थिक स्थितीमुळे बहुसंख्य लोकांना सध्या घरे बांधताना बँकांकडून कर्ज घेऊन घरे बांधावी लागतात व अश्या बँका रितसर कायदेशीर परवानगीचा आग्रह धरतात. एका बाजूने जणगणनेमध्ये समावेशासह इतर बाबींमुळे अस्तित्व व वास्त्यव्य मान्य असूनही शासनाकडून गावांच्या गावठाण हद्दीबांबत अनिश्‍चितता असल्यामुळे कायद्याचे पालन करून विकास व बांधकामे करण्याची इच्छा असूनही नागरीकांना रितसर कायदेशीर परवानग्या मिळत नसल्याने त्यांच्या न्याय्य हक्कापासून वंचित रहावे लागत आहे. बर्‍याचदा खाजगी, सहकारी  बँका व पतस्ंस्थांची मोठे व्याजदर असलेली कर्जे घेणे भाग पडत आहे व अनधिकृत बांधकामे करणे भाग पडत आहे. अश्या बांधकामांमुळे गावे आणखी बकाल स्वरूप धारण करीत आहेत.
एका बाजूला रितसर परवानग्या देताना परवानगी देणारे अधिकारी गावठाणांपासूनची 200 मीटर, 500 मीटर व 1500 मीटर परीघस्त अंतर दर्शविणार्‍या भूमी अभिलेख विभागाकडील गाव नकाशांची मागणी करत आहेत. तर दुसर्‍या बाजूला भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी याबाबत असमर्थता दर्शवून परीघस्त अंतरे दर्शविणारे नकाशे उपलब्ध करून देत नाहीत. अनेक गावांचे नगर भूमापन होऊनही गावांतील जमिनींचे 7/12 उतारे व नगर भूमापन मिळकत पत्रिका या दोन्ही बाबी आजही जिवंत अगर अस्तित्वात असल्याने या जमीनी शेतजमीनी असल्याचा व गावठाणांत नसल्याचा समज होऊन गावठाण हद्दनिश्चीती होत असल्याचे दिसत नाही. ही परिस्थितीही अनधिकृत बांधकामाना चालना देत असल्याचे अनुभवास येत आहे.
ही परीस्थिती बदलण्यासाठी व अनधिकृत बांधकामांस अटकाव होण्यासाठी खालील बाबी होणे तातडीने आवश्यक बनले आहे.
1) जिल्ह्यात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 122 च्या तरतुदींप्रमाणे गावठाणे घोषित नसलेल्या गावांच्या गावठाणांची घोषणा होण्यासंबंधीची प्रक्रीया तातडीने सुरू करून पुनर्वसित, वाढीव व नवीन गावठाणांच्या घोषणांची प्रक्रीया करण्यात यावी.
2) गावठाणापासूनच्या बांधकाम व बिनशेती परवानगी देण्यासंबंधीच्या परीघस्त अंतरांकरीता वर नमूद केलेली पुनर्वसित, वाढीव  व नवीन गावठाणे याच्या हद्दी गावठाण हद्दी समजून त्यांच्या लगत वांधकाम व विकास परवानग्या देण्यात याव्यात.
3) गावठाण घोषणा व गावांच्या हद्दी निश्चीत करणे या बाबी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 122  अन्वयेच करण्यात येत असल्याने कलम 122 नुसार नगर भूमापन झालेल्या भागाच्या हद्दी (नगर भूमापन हद्दी) या गावठाण हद्दी समजण्यात येणेबाबत महसूल विभागाकडून त्यांचे अंतर्गत कार्यरत भूमी अभिलेख विभागाला स्पष्ट निर्देश देणेत यावेत व अश्या हद्दिंपासूनचे परीघस्त अंतराचे निकष लागू करण्याबाबत स्पष्ट आदेश संबंधितांस करण्यात यावेत.
4) 7/12 उतारा व नगर भूमापन मिळकत पत्रिका हे दोन्ही स्वरूपातीत अभिलेख कार्यरत व अस्तित्वात असलेल्या ठिकाणी नगर भूमापन मिळकत पत्रिका कार्यरत ठेऊन 7/12 उतारा कायमस्वरूपी बंद करण्यात यावा.
5) जनगणनेत त्याच गावांच्या लगत असणार्‍या वाड्या व वस्त्या या स्वतंत्र गावठाणे समजण्याबाबतची स्पष्ट घोषणा करण्यात येऊन त्या बाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.
6) भूमी अभिलेख विभागाकडील गावनकाशे अद्ययावत करण्यात यावेत व या अद्ययावत नकाशांमध्ये त्या गावची पुनर्वसन, वाढीव व नवीन गावठाणे तसेच गावालगतच्या वाड्या व वस्त्या या महसूली गावची गावठाणे म्हणून स्पष्टपणे दर्शविली जावीत. असे नकाशे नागरीकांना सहजसुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्याचीही व्यवस्था करण्यात यावी.
7) शासनाच्या कोणत्या विभागाने गावांच्या गावठाणालगतचे परीघस्त 200 मीटर, 500 मीटर व 1500  मीटर परीघस्त अंतर दर्शविणारे गावनकाशे नागरिकांना अधिकृत व नियमानुसार उपलब्ध करून द्यायचे, याबाबतची जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी व त्याबाबत सर्व संबंधितांना स्पष्ट आदेश तसेच निर्देश देण्यात यावेत.
8) बांधकाम व बिनशेती परवानगी प्रक्रियेबाबतची व प्रक्रीया सोप्या पध्दतीने दर्शविणारे माहिती फलक महसूल विभागाची सर्व कार्यालये (तलाठी कार्यालय, तहसिलदार कार्यालय, प्रांत कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय) व नगररचना विभागाची सर्व संबंधित कार्यालये, तसेच संबंधित गावांची ग्रामपंचायत कार्यालये आणि गावांमधील मोक्याच्या ठिकाणी सर्वसामान्य नागरीकांच्या सहज निदर्शनास येतील, अशा पध्दतीने लावण्यात यावेत.

9) विकासाच्या प्रक्रियेत गावठाणांमध्ये जागेच्या कमतरतेमुळे नागरीक गावचे महसूली हद्दींत बर्‍याचदा गावांचे महसूल हद्दीतून जाणार्‍या ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग या प्रकारच्या रस्त्यांलगत रस्त्यास खेटून बांधकामे करतात.अशा प्रकारच्या रस्त्यांलगत बांधकामे करताना सोडावयाच्या अंतरांबाबत माहिती नसल्यामुळे अज्ञानामुळे बरीच बांधकामे सोडावयाच्या अंतरांच्या आतील बाजूला केली जातात व ती अनधिकृत ठरतात. त्यांवर कायदेशीर कारवाई होण्याची भिती असते. नागरिकांच्या माहितीकरता अशा अंतरांबाबतची अद्ययावत शासन निर्णयाची माहिती संबंधित रस्ते विभागांमार्फत गावचे ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात तसेच गावांतील मोक्याच्या ठिकाणी नागरीकाचे सहज निदर्शनास येईल, अशा ठिकाणी फलक स्वरूपात प्रसिध्द करणेत यावी व ती वेळोवेळी अद्ययावत करण्यात यावी.
10) तालुक्याच्या पातळीवरील भूमी अभिलेख कार्यालयात फाळणी नकाशे बर्‍याचदा उपलब्ध होत नाहीत. तसेच पूर्वी नागरिकांनी गुंठेवारी स्वरूपात खरेदी केलेल्या जमिनीचे 7/12 उतारे तलाठी पातळीवर खरेदीमुळे वेगळे विभक्त करण्यात आले आहेत. अश्या जमिनींचे फाळणी नकाशे भूमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध होऊ शकत नाहीत. अश्या गुंठेवारी स्वरूपातील जमिनींबाबत वहीवाटीप्रमाणे अतिअतितातडीची मोजणी फी भरून घेऊन शासकीय कर्मचार्‍यांमार्फत गावचे तलाठी व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत तसेच लगत धारकांच्या उपस्थितीत मोजमापे घेऊन, मोजणी प्रक्रीया पार पाडून हजर अर्जदार, लगत जमीनधारक, तलाठी व ग्रामसेवक यांच्या स्वाक्षर्‍यांसह तयार करून घेण्यात यावेत किंवा नगरविकास विभागाकडील नोंदणीकृत इंजिनिअर, आर्कीटेक्ट यांसारख्या खाजगी क्षेत्रातील लोकांकडून तयार करून घेण्यात यावेत. अशा साक्षांकित नकाशांआधारे तयार केलेल्या इमारत नकाशांना नगररचना किंवा संबंधित विभागांनी मंजूरी व बांधकाम परवानगी द्यावी. म्हणजे कागदपत्रांच्या उपलब्धतेअभावी विनापरवाना अनधिकृत बांधकामे होणार नाहीत. अशा बांधकामाना अनधिकृत गुंठेवारी बांधकाम नियमितीकरणासंबंधीचे काही नियम नवीन इमारत नकाशे मंजूरीसाठी लावावेत.

शासनाने सातारा जिल्ह्यातील सर्व गावठाणांची व पुनर्वसित गावठाणांची पाहणी करून मूळ गावठाण व विस्तारित गावठाण यांचा मोजणी गाव नकाशामध्ये समावेश केल्यास सर्वसामान्य नागरिकांना बांधकाम परवानगी घेणे सोयीचे होऊन त्यांना घरबांधणीसाठी येणार्‍या अडचणींना सामना करावा लागणार नाही. तसेच त्यांना घरबांधणीसाठी गृहकर्जाचा लाभ घेता येईल. सध्या शासनाने गुंठेवारी पद्धत बंद केल्यामुळे बिगरशेती प्लॉट खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढू लागलेला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये आपोआपच बेकायदेशीर बांधकामांना आळा बसेल व शासनालाही कायदेशीर मार्गाने मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होईल.

- महारुद्र तिकुंडे (माहिती अधिकार) संस्थापक-अध्यक्ष, युवा राज्य फाउंडेशन, महाराष्ट्र.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER