Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर व ओबीसींचे राजकारण!

टीम : धैर्य टाईम्स

बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर व ओबीसींचे राजकारण!

लेखकः प्रा. श्रावण देवरे, (भाग-1)

 

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक-अध्यक्ष माननीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी परवा (28 ऑगस्ट 23 रोजी) फोन करून ओबीसींच्या राजकारणाची दिशा काय असावी याबाबत अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांवर माझ्याशी चर्चा केली. मुद्दे अत्यंत महत्वाचे असल्याने मी हे मुद्दे समस्त ओबीसी कार्यकर्त्यांच्या समोर चर्चेला ठेवू ईच्छितो..

ओबीसींनी कुणाला मते दिली पाहिजेत, यावर बोलतांना त्यांनी पहिला निकष सांगीतला की, ‘जे पक्ष आरक्षणविरोधी आहेत, त्यांना ओबीसींनी मुळीच मते देवू नयेत, असे बाळासाहेब म्हणाले. हा मुद्दा अधिक स्पष्ट करतांना ते म्हणाले की, भाजपा हा पक्ष उघडपणे आरक्षणविरोधी आहे, त्यामुळे ओबीसींनी चुकूनही या पक्षाला मते नाही दिली पाहिजेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी सारखे पक्ष हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत. त्यांची निर्णय प्रक्रिया व अमलबजावणीची पद्धती ही मराठा-ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत ओबीसीला कुठेही स्थान नाही. त्यामुळे हे पक्षही ओबीसींनी बाद केले पाहिजे.

 दुसरा एक महत्वाचा निकष त्यांनी सांगीतला की, ‘जो पक्ष ओबीसींना 50 टक्केपेक्षाही जास्त तिकीटे देईल त्याच पक्षाला ओबीसी मते देतील, असे जाहीर केले पाहिजे.’ आता हा मुद्दा योग्यच आहे. कारण कॉंग्रेस-राष्ट्रवादीसारखे मराठा-वर्चस्वाचे पक्ष हे मराठा जातीलाच जास्त तिकीटे देतात व एक-दोन दलाल ओबीसींना तिकीटे देवून 52 टक्के ओबीसींची वोटबँक लुटतात. शिवसेना तिच्या सुरूवातीच्या राजकीय कारकिर्दीत ओबीसींना मोठ्या प्रमाणात तिकीटे देत होती, मात्र तो काळ शिवसेनेच्या पायाभरणीचा काळ होता. पायाभरणीच्या काळात पायाचे दगड होण्यासाठी ओबीसींशिवाय दुसरा कोणताही समाजघटक पात्र असू शकत नाही. पायाचा दगड होणे म्हणजे बळीचा बकरा होणे. बळीचा बकरा होण्यासाठी पात्रता लागते. विचारशक्ती नष्ट झालेली असणे, हि सर्वात मोठी पात्रता! नेतृत्वाबद्दल प्रचंड निष्ठा व भक्ती असणे ही दुसरी पात्रता! या दोन्ही कसोट्यांवर आजचाही ओबीसी मेरिटमध्ये पास होत असतो. त्यामुळे शिवसेनेच्या सुरूवातीच्या राजकीय कारकिर्दित पायाभरणीसाठी ओबीसी उमेदवार निवडणूकीत मोठ्याप्रमाणात उभे केले गेलेत व 52 टक्के ओबीसी वोटबँकेवर दरोडे टाकून शिवसेनेने आपली पायाभरणी केली.

पायाभरणी भक्कम झाल्यावर व ओबीसी वोटबँक मजबूत झाल्यावर जेव्हा निवडणूकीत आमदार-खासदार निवडून येण्याची शक्यता वाढली, तेव्हा या सर्व ओबीसींचे तिकीटे कापून तेथे मराठा व ब्राह्मण उमेदवारांना तिकीटे देण्यात आलीत. यासाठी धुळ्याचे उदाहरण प्रतिनिधिक समजले पाहिजे. उदाहरण दिल्याशिवाय आमच्या ओबीसींना ते समजतच नाही. धुळ्यात नेमके काय झाले?

मी 1972 ला शिक्षणासाठी धुळ्यात आलो तेव्हा मोठमोठ्या भिंतींवर ‘शिवसेनेचे झुंजार नेते बापू शार्दूल यांना प्रचंड मतांनी निवडून द्या’ अशा जाहिराती लिहीलेल्या दिसत होत्या. बापू शार्दूल हे विश्वकर्मा (सुतार समाजाचे) होते. 1966 ते 1969 या काळात देशभरातला ओबीसी राजकीयदृष्ट्या जागृत होण्याचा हा काळ होता. 1969 ला एकाच वेळेस तामीळनाडू, बिहार व उत्तरप्रदेश हे अत्यंत मोक्याचे व विस्तिर्ण प्रदेशांची राजकीय सत्ता ओबीसी चळवळींनी काबीज केली होती. ओबीसींचे हे वादळ महाराष्ट्रात केव्हाही येऊ शकते व मूळ धरू शकते, हे कॉंग्रेसी मराठा-ब्राह्मणांना चांगलेच ठावूक होते. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सत्यशोधक चळवळीने केलेली मशातगत ओबीसी चळवळीसाठी पोषक होती. नेमक्या याच काळात कॉंग्रेसने शिवसेनेला जन्माला घातले. कॉंग्रेसचे मराठा वर्चस्वाचे राजकारण पाहता ओबीसींना शिवसेना हा राजकीय पर्याय वाटू लागला. निवडणूकात ओबीसींना तिकीटे देऊन त्यांच्यात नेतृत्वाची महत्वाकांक्षा निर्माण करण्यात आली. अशा असंख्य ओबीसींपैकी एक म्हणजे धुळ्याचे बापू शार्दूल होय! प्रत्येक विधानसभा व लोकसभा निवडणूकीत शिवसेनेतर्फे बापू शार्दूल उभे राहायचे.

बापू शार्दुल यांना 100 टक्के माहीत असायचे की आपण कॉंग्रेसच्या विरोधात अजिबात निवडून येणार नाहीत. परंतू तरीही केवळ शिवसेनेच्या पायाभरणीसाठी निवडणूकीत उभे राहायचे व स्वतःच्या कष्टाच्या कमाईचे पैसे व साधने वापरून निवडणूक लढवायची. निवडणूकीत डिपॉझिट जप्त झाले की, कफल्लक बनून पुन्हा आपल्या रोजच्या पोटा-पाण्याच्या व्यवसायाला लागायचे! 1985 नंतर हिंदूत्वाची पालखीही त्यांनी वाहीली. 1990 नंतर जेव्हा हिंदू विचारांची वोटबँक निर्माण झाली व शिवसेनेचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढली त्यावेळी बापू शार्दूल यांचे तिकीट कापण्यात आले व ते तिकीट शिवसेनेशी काडीचाही संबंध नसलेल्या मराठा जातीच्या विजय नवले यांना देण्यात आले. 1990 नंतर अचानक अनेक ब्राह्मण व मराठा लोक शिवसेनेच्या तिकीटांवर निवडून यायला लागलीत. चूकून एखादा भुजबळांसारखा ओबीसी निवडून आला तर त्याच्या डोक्यावर मनोहर जोशीसारखा ब्राह्मण बसवायचा, जेणेकरुन तो ओबीसी नेता ‘‘ओबीसी जनतेचा नेता’’ बनता कामा नये! शिवसेनेला जन्माला घालण्याचे मुख्य कारण हेच होते की, ओबीसी जातीतून स्वतंत्रपणे ओबीसी नेते निर्माण होऊ नयेत. राजकीय महत्वाकांक्षा असलेल्या ओबीसी व्यक्तींना तिकीटे द्यायची, त्यांचे कष्टाने कमावलेले पेसे निवडणूकीत खर्च करायला लावायचे. कफल्लक झाला की, राजकारण बाजूला ठेवून पुन्हा रोजीरोटीच्या मागे धावायचं. अशा असंख्य महत्वाकांक्षी ओबीसी कार्यकर्त्यांचे जीवन उध्वस्त करण्याचे काम शिवसेनेने केले आहे. या महत्वाकांक्षी ओबीसी कार्यकर्त्यांनी त्या काळात शिवसेनेच्या नादी न लागता कर्मवीर ऍडव्होकेट जनार्दन पाटील यांच्या ओबीसी संघटनेत काम केले असते तर, तामीळनाडू, बिहार व उत्तरप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसी पक्ष स्थापन झाला असता व हे ओबीसी सत्ताधारी झाले असते. पण असे होऊ नये म्हणूनच कॉंग्रेसी मराठा-ब्राह्मणांनी शिवसेना नावाचे षडयंत्र रचले व त्यात ओबीसींच्या ऐन उमेदीच्या पिढ्या बरबाद केल्यात!

प्रत्येक काळात नवनव्या नावाने शिवसेना सारखे पक्ष निर्माण करण्यात येतात व ओबीसींच्या पिढ्या बरबाद करण्याचे दृष्टचक्र सुरूच राहते. आता शिवसेनेचेच प्रतीरूप असलेले आप पक्ष व बी.आर.एस. पक्ष महाराष्ट्रात येत आहेत. महाराष्ट्रातल्या ब्राह्मण-मराठ्यांनी ज्याप्रमाणे भुजबळांसारखे उमदे ओबीसी नेतृत्व मातीत घालवले, त्याचप्रमाणे केजरीवाल यांनी दिल्लीतले योगेंद्र यादवांसारखे वैचारिक ओबीसी नेतृत्व मातीत घालवले आहे. आणी आता ते महाराष्ट्रात असंख्य ओबीसी कार्यकर्त्यांना उध्वस्त करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आंध्रचे मुख्यमंत्री के.सी.आर. हे अगदी उघडपणे ओबीसी कार्यकर्त्यांना 5-10 हजार रुपयात विकत घेत आहेत.

अशा परिस्थितीत बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी सांगीतलेला 50 टक्के उमेदवारीचा निकष गोंधळ निर्माण करतो, कारण केजरीवाल व केसीआर सारखे लोक आपल्या पक्षाची पायाभरणी करण्यासाठी ओबीसींना मोठ्याप्रमाणात तिकीटे देतात. म्हणून आपल्याला 2024 च्या लोकसभेच्या निवडणूकीपर्यंत काही निकष शोधावे लागणार आहेत, ते काय असु शकतात, यावर आपण या लेखाच्या दुसर्‍या भागात विचार करू या, तो पर्यंत जयजोती, जयभीम! सत्य की जय हो..

साभार - 

- प्रा श्रावण देवरे 

संपर्क मोबाईल- 94 227 88 546

ईमेल- s.deore2012@gmail.com

    

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER