Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त

बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर व ओबीसींचे राजकारण!

टीम : धैर्य टाईम्स

बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर व ओबीसींचे राजकारण!

लेखकः प्रा. श्रावण देवरे, (भाग-1)

 

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक-अध्यक्ष माननीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी परवा (28 ऑगस्ट 23 रोजी) फोन करून ओबीसींच्या राजकारणाची दिशा काय असावी याबाबत अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांवर माझ्याशी चर्चा केली. मुद्दे अत्यंत महत्वाचे असल्याने मी हे मुद्दे समस्त ओबीसी कार्यकर्त्यांच्या समोर चर्चेला ठेवू ईच्छितो..

ओबीसींनी कुणाला मते दिली पाहिजेत, यावर बोलतांना त्यांनी पहिला निकष सांगीतला की, ‘जे पक्ष आरक्षणविरोधी आहेत, त्यांना ओबीसींनी मुळीच मते देवू नयेत, असे बाळासाहेब म्हणाले. हा मुद्दा अधिक स्पष्ट करतांना ते म्हणाले की, भाजपा हा पक्ष उघडपणे आरक्षणविरोधी आहे, त्यामुळे ओबीसींनी चुकूनही या पक्षाला मते नाही दिली पाहिजेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी सारखे पक्ष हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत. त्यांची निर्णय प्रक्रिया व अमलबजावणीची पद्धती ही मराठा-ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत ओबीसीला कुठेही स्थान नाही. त्यामुळे हे पक्षही ओबीसींनी बाद केले पाहिजे.

 दुसरा एक महत्वाचा निकष त्यांनी सांगीतला की, ‘जो पक्ष ओबीसींना 50 टक्केपेक्षाही जास्त तिकीटे देईल त्याच पक्षाला ओबीसी मते देतील, असे जाहीर केले पाहिजे.’ आता हा मुद्दा योग्यच आहे. कारण कॉंग्रेस-राष्ट्रवादीसारखे मराठा-वर्चस्वाचे पक्ष हे मराठा जातीलाच जास्त तिकीटे देतात व एक-दोन दलाल ओबीसींना तिकीटे देवून 52 टक्के ओबीसींची वोटबँक लुटतात. शिवसेना तिच्या सुरूवातीच्या राजकीय कारकिर्दीत ओबीसींना मोठ्या प्रमाणात तिकीटे देत होती, मात्र तो काळ शिवसेनेच्या पायाभरणीचा काळ होता. पायाभरणीच्या काळात पायाचे दगड होण्यासाठी ओबीसींशिवाय दुसरा कोणताही समाजघटक पात्र असू शकत नाही. पायाचा दगड होणे म्हणजे बळीचा बकरा होणे. बळीचा बकरा होण्यासाठी पात्रता लागते. विचारशक्ती नष्ट झालेली असणे, हि सर्वात मोठी पात्रता! नेतृत्वाबद्दल प्रचंड निष्ठा व भक्ती असणे ही दुसरी पात्रता! या दोन्ही कसोट्यांवर आजचाही ओबीसी मेरिटमध्ये पास होत असतो. त्यामुळे शिवसेनेच्या सुरूवातीच्या राजकीय कारकिर्दित पायाभरणीसाठी ओबीसी उमेदवार निवडणूकीत मोठ्याप्रमाणात उभे केले गेलेत व 52 टक्के ओबीसी वोटबँकेवर दरोडे टाकून शिवसेनेने आपली पायाभरणी केली.

पायाभरणी भक्कम झाल्यावर व ओबीसी वोटबँक मजबूत झाल्यावर जेव्हा निवडणूकीत आमदार-खासदार निवडून येण्याची शक्यता वाढली, तेव्हा या सर्व ओबीसींचे तिकीटे कापून तेथे मराठा व ब्राह्मण उमेदवारांना तिकीटे देण्यात आलीत. यासाठी धुळ्याचे उदाहरण प्रतिनिधिक समजले पाहिजे. उदाहरण दिल्याशिवाय आमच्या ओबीसींना ते समजतच नाही. धुळ्यात नेमके काय झाले?

मी 1972 ला शिक्षणासाठी धुळ्यात आलो तेव्हा मोठमोठ्या भिंतींवर ‘शिवसेनेचे झुंजार नेते बापू शार्दूल यांना प्रचंड मतांनी निवडून द्या’ अशा जाहिराती लिहीलेल्या दिसत होत्या. बापू शार्दूल हे विश्वकर्मा (सुतार समाजाचे) होते. 1966 ते 1969 या काळात देशभरातला ओबीसी राजकीयदृष्ट्या जागृत होण्याचा हा काळ होता. 1969 ला एकाच वेळेस तामीळनाडू, बिहार व उत्तरप्रदेश हे अत्यंत मोक्याचे व विस्तिर्ण प्रदेशांची राजकीय सत्ता ओबीसी चळवळींनी काबीज केली होती. ओबीसींचे हे वादळ महाराष्ट्रात केव्हाही येऊ शकते व मूळ धरू शकते, हे कॉंग्रेसी मराठा-ब्राह्मणांना चांगलेच ठावूक होते. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सत्यशोधक चळवळीने केलेली मशातगत ओबीसी चळवळीसाठी पोषक होती. नेमक्या याच काळात कॉंग्रेसने शिवसेनेला जन्माला घातले. कॉंग्रेसचे मराठा वर्चस्वाचे राजकारण पाहता ओबीसींना शिवसेना हा राजकीय पर्याय वाटू लागला. निवडणूकात ओबीसींना तिकीटे देऊन त्यांच्यात नेतृत्वाची महत्वाकांक्षा निर्माण करण्यात आली. अशा असंख्य ओबीसींपैकी एक म्हणजे धुळ्याचे बापू शार्दूल होय! प्रत्येक विधानसभा व लोकसभा निवडणूकीत शिवसेनेतर्फे बापू शार्दूल उभे राहायचे.

बापू शार्दुल यांना 100 टक्के माहीत असायचे की आपण कॉंग्रेसच्या विरोधात अजिबात निवडून येणार नाहीत. परंतू तरीही केवळ शिवसेनेच्या पायाभरणीसाठी निवडणूकीत उभे राहायचे व स्वतःच्या कष्टाच्या कमाईचे पैसे व साधने वापरून निवडणूक लढवायची. निवडणूकीत डिपॉझिट जप्त झाले की, कफल्लक बनून पुन्हा आपल्या रोजच्या पोटा-पाण्याच्या व्यवसायाला लागायचे! 1985 नंतर हिंदूत्वाची पालखीही त्यांनी वाहीली. 1990 नंतर जेव्हा हिंदू विचारांची वोटबँक निर्माण झाली व शिवसेनेचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढली त्यावेळी बापू शार्दूल यांचे तिकीट कापण्यात आले व ते तिकीट शिवसेनेशी काडीचाही संबंध नसलेल्या मराठा जातीच्या विजय नवले यांना देण्यात आले. 1990 नंतर अचानक अनेक ब्राह्मण व मराठा लोक शिवसेनेच्या तिकीटांवर निवडून यायला लागलीत. चूकून एखादा भुजबळांसारखा ओबीसी निवडून आला तर त्याच्या डोक्यावर मनोहर जोशीसारखा ब्राह्मण बसवायचा, जेणेकरुन तो ओबीसी नेता ‘‘ओबीसी जनतेचा नेता’’ बनता कामा नये! शिवसेनेला जन्माला घालण्याचे मुख्य कारण हेच होते की, ओबीसी जातीतून स्वतंत्रपणे ओबीसी नेते निर्माण होऊ नयेत. राजकीय महत्वाकांक्षा असलेल्या ओबीसी व्यक्तींना तिकीटे द्यायची, त्यांचे कष्टाने कमावलेले पेसे निवडणूकीत खर्च करायला लावायचे. कफल्लक झाला की, राजकारण बाजूला ठेवून पुन्हा रोजीरोटीच्या मागे धावायचं. अशा असंख्य महत्वाकांक्षी ओबीसी कार्यकर्त्यांचे जीवन उध्वस्त करण्याचे काम शिवसेनेने केले आहे. या महत्वाकांक्षी ओबीसी कार्यकर्त्यांनी त्या काळात शिवसेनेच्या नादी न लागता कर्मवीर ऍडव्होकेट जनार्दन पाटील यांच्या ओबीसी संघटनेत काम केले असते तर, तामीळनाडू, बिहार व उत्तरप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसी पक्ष स्थापन झाला असता व हे ओबीसी सत्ताधारी झाले असते. पण असे होऊ नये म्हणूनच कॉंग्रेसी मराठा-ब्राह्मणांनी शिवसेना नावाचे षडयंत्र रचले व त्यात ओबीसींच्या ऐन उमेदीच्या पिढ्या बरबाद केल्यात!

प्रत्येक काळात नवनव्या नावाने शिवसेना सारखे पक्ष निर्माण करण्यात येतात व ओबीसींच्या पिढ्या बरबाद करण्याचे दृष्टचक्र सुरूच राहते. आता शिवसेनेचेच प्रतीरूप असलेले आप पक्ष व बी.आर.एस. पक्ष महाराष्ट्रात येत आहेत. महाराष्ट्रातल्या ब्राह्मण-मराठ्यांनी ज्याप्रमाणे भुजबळांसारखे उमदे ओबीसी नेतृत्व मातीत घालवले, त्याचप्रमाणे केजरीवाल यांनी दिल्लीतले योगेंद्र यादवांसारखे वैचारिक ओबीसी नेतृत्व मातीत घालवले आहे. आणी आता ते महाराष्ट्रात असंख्य ओबीसी कार्यकर्त्यांना उध्वस्त करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आंध्रचे मुख्यमंत्री के.सी.आर. हे अगदी उघडपणे ओबीसी कार्यकर्त्यांना 5-10 हजार रुपयात विकत घेत आहेत.

अशा परिस्थितीत बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी सांगीतलेला 50 टक्के उमेदवारीचा निकष गोंधळ निर्माण करतो, कारण केजरीवाल व केसीआर सारखे लोक आपल्या पक्षाची पायाभरणी करण्यासाठी ओबीसींना मोठ्याप्रमाणात तिकीटे देतात. म्हणून आपल्याला 2024 च्या लोकसभेच्या निवडणूकीपर्यंत काही निकष शोधावे लागणार आहेत, ते काय असु शकतात, यावर आपण या लेखाच्या दुसर्‍या भागात विचार करू या, तो पर्यंत जयजोती, जयभीम! सत्य की जय हो..

साभार - 

- प्रा श्रावण देवरे 

संपर्क मोबाईल- 94 227 88 546

ईमेल- s.deore2012@gmail.com

    

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER