Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सव वर्षांत हेच आमच्या वाट्याला आलं..... या प्रकाश पर्वाचा उजेड आमच्या झोपडीत कधी येईल?

टीम : धैर्य टाईम्स

सत्ता, संपत्ती, आणि प्रतिष्ठेच्या या बेगडी दुनिये मध्ये माणूस आणि माणुसकीचा अंत होत असताना काही बोटावर मोजण्यासारखे अपवाद वगळले तर गावकुसाबाहेर वाड्यावस्त्यांच्या बाहेर वंचित,शोषित, उपेक्षित समाजाचे दुःख घेऊन जगणाऱ्या या बारा बलुतेदार व अठरा आलूतेदारांमधील काही जातींची स्थिती फारशी सुधारलेली दिसत नाही._ 

        सामान्यपणे पाटील, कुलकर्णी हे सोडून चौगुला, महार, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी, परीट, गुरव आणि कोळी हे प्रामुख्याने 'बारा बलुतेदार'म्हणून प्रसिद्ध आहेत. ज्यांच्यावाचून शेतकऱ्‍यांचे नडत नाही, पण जे शेतकऱ्यांच्या नैमित्तिक गरजा भागवितात ते अलुतेदार. अलुतेदार हा अठरा जातींचा समूह आहे. यांचे महाराष्ट्रातील प्रमाण ३०% पेक्षा अधिक आहे, आणि हा इतर मागास वर्ग (ओबीसी)मध्ये मोडतो. अलुतेदारांनाच ’नारू’ म्हणतात. कासार, कोरव, गोंधळी, गोसावी, घडसी, ठाकर, डवऱ्या, तराळ, तांबोळी, तेली, भट,भोई,माळी,जंगम, वाजंत्री, शिंपी, सनगर,साळी या अठरा गाव कामगारांचा समावेश अलुतेदारांमध्ये होत होता. याशिवाय इतर भटक्या जाती व जमातींचाही ग्रामीण विभागाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा होता.

            गावगाड्यातील याच वंचित शोषित उपेक्षित समाजातील काही जात समूहांच्या जीवनात आजही अंधकार पसरलेला आहे. हेच मरीआईचे व लक्ष्मी आईचे पोतराज मरीआईचा गाडा घेऊन गावोगावी गुबू गुबू वाजवत अंगावर आसूडाचे (कोरड्याचा) फटके घेत देवीची उपासना करताना दिसतात. ते लोक गावोगावी आपल्या उदरनिर्वासाठी देवीच्या नावाखाली भीक मागण्याचे काम आजही करत आहेत. पूर्वी लोकांची दानत होती. लोक आपल्या दारात आलेल्या प्रत्येकाला सढळ हाताने मदत करायचे. आज मदत करणाऱ्या हातांना रोजगार नाही. शेत जमिनीचे तुकडे झाले. एकत्र कुटुंब पद्धती चे रूपांतर विभक्त कुटुंब पद्धतीत झाले. त्यामुळे प्रत्येक जण मी आणि माझे कुटुंब या पुरता सीमित झाला. या वंचित, शोषित, उपेक्षित समाजाच्या कुटुंबातील एखाद दुसऱ्या कुटुंबातील एखादा शिक्षित माणूस फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन हे अंधश्रद्धेचे जोखड फेकून आज तो स्थिरावला आहे. परंतु आजही गाव गावात नगरांमध्ये हे समूह मरीआईचा गाडा घेऊन दारोदारी आसूडाचे (कोरड्याचे) फटके घेत भिक मागताना दिसत आहेत. मी माझ्या वाढ वडिलांच्या काळात ही लक्ष्मी आईला पोतराज सोडल्याच्या गोष्टी ऐकल्या आहेत. माझे थोरले चुलते दिनकर घोरपडे हेही पोतराज म्हणून त्यांनाही देवीला सोडले होते.

         75 वर्षाच्या स्वातंत्र्याचा ढोल वाजवून अमृत बसून साजरा करत असताना आजही या या उपेक्षित, शोषित समाजातील बलुतेदार व अलुतेदार समाजातील काही जातसमुहांच्या वाट्याला हेच जगणे आले आहे. एका बाजूला ग्लोबलायझेशनची भाषा बोलणारे आपण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरणारे आपण त्यांच्यासाठी काय करू शकू याचा विचार कायम मनाला सतावतो. भ्रष्ट सत्तापीपासू राजकारण्यांकडून अपेक्षा करणे हे पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखे आहे. त्यांना या समूहांना या दुःख, दैन्य व दारिद्र्यातून बाहेर काढण्याची मनापासून इच्छा नाही. आज हेच समूह उच्च शिक्षण घेतील. संघटित होतील आणि संघर्ष करायला लागले तर आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल याची त्यांना खात्री आहे. म्हणूनच या समूहांना ते जगूनही देत नाहीत आणि मरूही देत नाहीत. आज संपूर्ण देशभर दिव्यांचा प्रकाश उजळलेला असताना, हे पर्व प्रकाशाचे पर्व आहे हे सुरू असताना हे वंचित, शोषित, उपेक्षित समाजातील घटक, ही माणसं आजही दारोदार भीक मागताना आपल्याला दिसत आहे. गेल्या 75 वर्षात हेच का आपण त्यांना दिलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर या समूहाच्या सामाजिक समतेसाठी व त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी खूप प्रयत्न केले. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा! हा मूलमंत्र दिला. परंतु याचा खरा अर्थ या समूहांना आजही कळलेला दिसत नाही. त्यामुळे या लोकांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीत फारसा बदल झालेला दिसत नाही. पद्मश्री लक्ष्मण माने यांच्यासारख्या भटक्या-विमुक्तांच्या न्यायी हक्कांसाठी लढणाऱ्या योद्धांमुळे काही प्रमाणात यात बदल होऊन आज ही कुटुंबे सन्मानाचे जीवन जगायला लागली आहेत. येणाऱ्या तरुण पिढीने याच लोकांसाठी काम करण्याची गरज आहे. फटाक्यांची आतिषबाजी, दारी रांगोळी, फराळाचं स्वादिष्ट आहार, दिव्यांची व पणत्यांची संपूर्ण आरास, नवीन कपडे, सुगंधी उठणे यात मश्गुल असणाऱ्या समाजाला या प्रस्थापित व्यवस्थेतील सत्ताधाऱ्यांना या माणसांचं दुःख खरच समजेल. हे लोक दोन पावलं उचलून या लोकांच्याकडे मदतीचा हात देतील. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून गेल्या 75 वर्षात आपण काय मिळवलं? एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या लोकांच्या झोपड्यामध्ये प्रकाश कधी आपण देणार आहोत?त्यांची मुलं बाळ चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण कधी घेणार आहेत?का ही मुलं हाच मरीआईचा गाडा डोक्यावर घेऊन सणासुदीला आपल्या दारात झोळी घेऊन भीक मागायला येणार आहेत. आज आपण सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देत आहोत. आग्रहाने फराळाला बोलवत आहोत. यांच्याही जीवनात हे दिवस कधी येतील. जगात विश्वगुरू होण्याचा दावा छाती ठोकून सांगणाऱ्या आपल्या सत्ताधाऱ्यांना व त्यांच्या चेल्या चपाटयांना त्यांचे दुःख समजेल तेव्हा खऱ्या अर्थाने हे दीपावलीचे प्रकाश पर्व आनंदाने साजरा करण्याचे धाडस आपल्यासारखी संवेदनशील माणसं करू शकतात. 

      गौतम बुद्ध आपली जन्मभूमी कपिलवस्तू येथे सम्यक संबोधी प्राप्त झाल्या नंतर १८ वर्षांनी परतले.तेव्हा स्थानिक लोकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी लाखो दिव्यांची आरास केली होती.याच दिवशी आपल्या शिष्यांना अत दीप भव(अप्प दिपो भव)हा संदेश त्यांनी दिला.याचाच अर्थ तुम्हीच तुमचे प्रकाश बना!दिवाळीला अंधकारावर प्रकाशाचा,अज्ञानावर ज्ञानाचा,वाईटावर चांगल्याचा विजय ही मानला जातो.तेव्हा याच उपेक्षित, वंचित व शोषित समूहासाठी आपण सर्वांनी आपला खारीचा वाटा उचलून त्यांच्याही झोपड्यांमध्ये प्रकाश घेऊन जाण्याचे काम करूया. आपल्या घासातील एक घास त्यांनाही भरवू या. तेव्हाच हा दीपदानाचा महोत्सव सार्थकी लागला असे आपण म्हणू शकू.

सोमनाथ घोरपडे, सासकल, फलटण 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER