Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

कोरोनाग्रस्त मृतांच्या अंत्यसंस्कारासाठीच्या लाकूड व्यवहारात 30 लाखांचा अपहार 

जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार : चौकशी करण्याची मागणी
टीम : धैर्य टाईम्स
कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारावरील प्रत्यक्ष खर्च आणि सातारा पालिकेने काढलेल्या बिलात तफावत आहे. प्रत्येक मृत व्यक्तीमागे दोन हजार जादा खर्च होत असून आजअखेर दीड हजारांहून जास्त मृतांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. म्हणजेच जवळपास 30 लाखांचा अपहार झाला असल्याचा आरोप अमित शिंदे, बाळासाहेब शिंदे व जितेंद्र वाडकर आदींनी केला आहे.

सातारा : कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारावरील प्रत्यक्ष खर्च आणि सातारा पालिकेने काढलेल्या बिलात तफावत आहे. प्रत्येक मृत व्यक्तीमागे दोन हजार जादा खर्च होत असून आजअखेर दीड हजारांहून जास्त मृतांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. म्हणजेच जवळपास 30 लाखांचा अपहार झाला असल्याचा आरोप अमित शिंदे, बाळासाहेब शिंदे व जितेंद्र वाडकर आदींनी केला आहे.

याबाबत जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, सातारा येथील संगम माहुली येथील स्मशान भूमीमध्ये सातारा नगरपालिकेच्या वतीने कोवीड 19च्या आजाराने मृत झालेल्या व्यक्तींचे गेल्या वर्षापासून आजपर्यंत (मार्च 2020 पासून) अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकूड पूरवण्याचा ठेका सातारा नगरपालिकेच्या वतीने तेथे जवळच असणार्‍या राजेंद्र कदम या वखार मालकास दिला आहे. एका कोवीडच्या अंत्यसंस्कारासाठी 12 मण (440 किलो) लाकूड व वाहतूक खर्च 200/- रु. अशी पावती वखारीतून नगरपालिकेला मिळत आहे.

सातारा नगरपालिकेला वखार खालीलप्रमाणे एका कोवीड मृत रुग्णासाठी प्रतिमण 300 प्रमाणे 12 मण लाकडपोटी 3600 व लाकूड वाहतूक खर्च 200 असे 3800 रुपयांचे बिल दाखवण्यात येत आहे. प्रत्यक्षात एकाच ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये मृत कोवीड रुग्णांसाठी लागणारे लाकड न वजन करता संपूर्ण ट्रॉली भरून प्रत्येक मृत रुग्णाच्या अग्निकुंडापाशी टाकत आहेत. त्याला कोणत्याही प्रकारचे मोजमाप नाही. परंतु, नगरपालिकेला सादर करत असलेल्या बिलामध्ये प्रत्येक मृत कोवीड रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकूड असा 100 फूट अंतरासाठी वाहतूक खर्च 200 रुपये प्रत्येक मृत रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी दाखवत आहेत. हा प्रकार शासनाची आर्थिक फसवणूक करणारा आहे.

प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी केली असता तेथे अंत्यसंस्कार करत असलेल्या अग्णीकुंडात प्रत्यक्षात 7 मण एवढेच लाकूड बसत आहे. त्यापेक्षा जास्त लाकूड आणीकुंडात बसतच नाही. तसेच अत्यंसंस्कारासाठी लागणारे लाकूड बघितले असता, असे दिसून आले की ते रायवळ लाकूड आहे. त्या रायवळ लाकडाचा आजच्या बाजार भावाप्रमाणे दर 250 रुपये प्रती मण इतका आहे. याचाच अर्थ असा की, रायवळ लाकूड 7 मणाप्रमाणे 1750 व 100 फूट अंतरासाठी लाकडाचा वाहतूक खर्च 50  मिळून एकूण 1800 इतका  खर्च येत आहे.

म्हणजेच प्रत्येक मृत कोवीड  रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी 1800 रुपये खर्च होत असताना वखार मालक नगरपालिकेला व तेथील अधिकार्‍यांना हाताशी 2000 रुपये  जास्त दाखवला जात आहे. आजपर्यंत सुमारे 1500 व त्यापेक्षा अधिकच कोवीड मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार झाले आहेत. म्हणजेच तीस लाख एवढ्या रक्कमेचा अपहार झालेला आहे असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.  

कोरोनाच्या भयंकर परिस्थितीतही असा गैरव्यवहार अत्यंत घृणास्पद व माणुसकीला काळीमा फासणारा आहे. संबंधीत अधिकारी व वखार मालक संगनमत करून राजरोसपणे हा प्रकार करत आहेत. अशा अधिकार्‍यांवर व वखार मालकावर योग्य ती कारवाई करावी. संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकार्‍यांनी स्वत: चौकशी करून कागदपत्रांची, बिलांची पाहणी करून, वजन न करता लाकडाची वाहतूक करणार्‍या व संपूर्ण गैरकारभार करणार्‍या पालिकेच्या अधिकार्‍यांना निलंबीत करावे आणि अपहार झालेल्या रकमेची वसूली करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER