Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

आता सरकारला दिलेला वेळ संपला आहे : मनोज जरांगे यांचा फलटण येथे यल्गार

मराठा समाजाला आरक्षण मिळे पर्यंत लढा चालूच राहणार
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी : लेकरांच्या वाट्याला आता कष्ट नको. मराठ्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण ही एकच मागणी आमची आहे. आरक्षण नाही म्हणून आम्हाला नोकऱ्या लागत नाहीत. मराठ्यांना आरक्षण म्हटलं की यांना कायदा, अभ्यास, समित्या लागतात. मात्र आता सरकारला दिलेला वेळ संपला आहे. आता सुट्टी नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित सभेत मनोज जरांगे पाटील बोलत होते. यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले, शांततेच युद्धच मराठा आरक्षण मिळवून देईल. २२ तारखेला सांगणार २४ तारखेनंतरचं आंदोलन कसं असणार. मला अजूनही आशा आहे की सरकार २४ तारीख उजडू देणार नाही. मराठा आरक्षणासाठी ५ हजार पानांचे पुरावे देणार आहे. १ पुरावा मिळाला काय १०० मिळाले काय कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो. एका दिवसात कायदा पारित होतो. राज्यपालांची परवानगी गेऊन विधानसभा घेऊन सरकार कायदा पारित करु शकतो.

फलटणला एक ऐतिहासिक असा इतिहास आहे. फलटणला सुरू केलेला लढा कधीही अयशस्वी झाला नाही. आज फलटणमध्ये एवढी अलोट गर्दी बघून मी भारावून गेलो आहे. मी खरं तर कमी बोलणार होतो पण आता एवढी अलोट गर्दी बघून मी सगळंच बोलणार आहे. कोणता मतदारसंघ कुणाचा बालेकिल्ला आहे; हे आता महत्त्वाचे नाही आता आधी आमचे बालेकिल्ला मजबूत ठेवा तरच तुमचा बालेकिल्ला शाबूत ठेवणार; असे म्हणत जरांगे पाटील यांनी सरकारकडे विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण द्यावे, अशी मागणी केली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आता आरक्षण घ्यायचं.आता कायदा पारित करायचा आहे. समितीला पाच हजार पुरावे मिळाले आहेत. मराठा कुणबी आहे त्यामुळे आता राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र द्यावे. आम्हाला आडमुठी भुमिका घ्यायची नाही. आडमुठी भुमिका घ्यायची असती तर ४ दिवसांच्या मुदतीवर ठाम राहिलो असतो. ४० दिवसांची मुदत दीली नसती, २४ तारखेपर्यंत कोणालाच काही बोलायचे नाही. सरकारने ठरवले आहे, मराठ्यांनाच मराठ्यांच्या अंगावर सोडायचे. त्यामुळे आता शांत राहायचं. २४ तारखेपंर्यत कोणालाच काही उत्तर द्यायचे नाही. वातावरण दुषित करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

आरक्षणाचा निर्णय मुदतीपूर्वी घ्या अशी आग्रही मागणी केली. मराठा आरक्षणाबाबत कायदा पारित केल्यानंतर त्यामध्ये पुन्हा अडचणी येवू नयेत यासाठी आम्ही सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला. आता सरकारने २४ तारखेला आदेश पारीत करून आरक्षण द्यावं.अन्यथा आम्ही तुमच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ, शांततेच्या मार्गाने आंदोलन करत सरकारला मराठा आरक्षण निर्णयापर्यंत आणलं आहे. परंतु २४ ऑक्टोबरनंतर हे शांततेचं युद्ध सरकारला झेपणार नाही आणि पेलणारही नाही, मराठा समाजाने ताकदीने तयारी करा,गाफील राहू नका. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. शिवाजी महाराजांचा एकही मावळा गाफील राहत नव्हता. त्यामुळे आता सर्वांनी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार करा.मराठा आरक्षणासाठी सरकारने आमच्याकडे वेळ मागितला म्हणून आम्ही ४० दिवसांची मुदत दिली. येत्या २४ तारखेला ही मुदत संपणार आहे. तत्पूर्वी २२ ऑक्टोबर रोजी आपण या आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करू अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्याचवेळी मी माझ्या समाजाशी प्रामाणिक असून आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही असेही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी जाहीर केले.

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या ठिकाणी फलटण तालुका मुस्लीम समाजाच्या वतिने सभेसाठी आलेल्या नागरिकांना मोफत पाण्याच्या बोटलचे वाटप करण्यात आले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER