Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

सांगा कसं जगायचं? फलटण मधील विदारक सत्य

टीम : धैर्य टाईम्स

आज देश स्वातंत्र्याचा ७६ वर्धापन दिन देशभर मोठया उत्साहात साजरा होत असताना फलटणच्या भर बाजार पेठेत आणि देशातील स्त्रियांच्या शिक्षणाची कवाडे जांनी उघडली त्या महात्मा जोतिबा फुले यांच्याच पुतळ्या समोर एक बारा-तेरा वर्षाची चिमुकली आपल्यासह कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत रस्त्यावर खेळ करीत होती. देश महासत्ता बनणार वगैरे हाकाटी पिटली जात असताना अगदी मूलभूत प्रश्न मात्र सोडवलेच गेले नाहीत हेच या ठिकाणी अधोरेखित होत आहे असेच खेदाने नमूद करावेसे वाटते आहे. 

माणसाला दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारी या सारख्या समस्यांकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही,असं दिसतंय, त्यामुळे प्रत्येकाच्या मनात "सांगा कसं जगायचं?" हा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. अर्थात सर्वसामान्य जनतेची अवस्था पाहील्यावर ही जनता कण्हत कण्हत आणि आपलं रड'गाणं' गातच जगत आहे हे वास्तव आहे. मायबाप सरकार तर कसं जगायचं ते तुम्हीच ठरवा असंच सांगत आहे हे ही स्पष्टपणे दिसून येत आहे, त्यामुळे वीस तीस वर्षांपूर्वी मंगेश पाडगावकरांच्या या काव्यपंक्ती आजही तितक्याच तंतोतंत लागू पडतात असे चित्र दिसत आहे.

अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या देशातील नागरिकांच्या मुलभूत गरजा असून त्या सरकारने अग्रक्रमाने सोडवल्या पाहिजेत.मात्र या मुलभूत गरजा अजूनही आपल्या मायबाप सरकारला सोडवता आलेल्या नाहीत. या देशातील अनेक कुटुंबांना एक वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. इतकंच नव्हे तर अनेक शहरांमध्ये फेरफटका मारला तर फूटपाथवर राहून जीवन जगणांऱ्यांची संख्या किती मोठी आहे, हे दिसून येते, यापैकी अनेकांना लज्जा रक्षणासाठी धड वस्त्रें ही मिळत नाहीत, यांचाच अर्थ अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आजही या देशातील सरकार पुर्णपणे भागवू शकत नाही. दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वसामान्य माणसाला मोठी कसरत करावी लागते.ही बाब निश्चितच गंभीर आहे,मात्र याची दखल घ्यायला कुणालाच वेळ नाही असे दिसते.

येणाऱ्या प्रत्येक दिवशी नवनवीन समस्या निर्माण होत आहेत, त्यातच महागाई गगनाला भिडल्या आहे.महागाईचा वणवा भडकला आहे, या वणव्यात सामान्य माणूस भरडला जात आहे. त्याची आर्थिक व मानसिक घुसमट होत आहे. बाजारात वाढलेल्या बेसुमार दरवाढीने तो भांबावून गेला आहे, त्याचे आर्थिक नियोजन पुर्णपणे कोलमडून पडले आहे.असेल त्या भावाने जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना त्याची अक्षरशः कुतरओढ होते आहे. दैनंदिन जीवनातील त्यांचे हे हाल दररोजचेच झाले आहे. श्रीमंतांना जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती किती ही प्रमाणात वाढल्या तरी त्याचा परिणाम त्यांच्या रहाणीमानावर होत नाही, मात्र सर्वसामान्य माणूस पुरता खचून, पिचून व गांगरून जातो आहे. रोजच्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर एक हजार रुपयांच्या वर गेला आहे, त्यामुळे गॅसच्या ऐवजी चूल पेटवावी काय असा विचार ते करु लागले आहेत, त्यातही सरपण व जळावू लाकडाच्या किंमतीत ही वाढ झाली आहे.काहीही झाले तरी रोजचा स्वयंपाक करताना डोळ्यासमोर महागाईचा महाकाय राक्षस उभा रहातोच. 

सर्वसामान्य माणसाला आपल्या रोजीरोटीला मुकावे लागले आहे.अनेकांना दैनंदिन जीवनात कसं जगायचं हा प्रश्न भेडसावत आहे. आरोग्याचा प्रश्न ही जटील झाला. औषधांच्या किंमतीत बेसुमार वाढ झाली. खाजगी व सरकारी दवाखान्यात वैद्यकीय उपचार घेणे अनेकांना परवडणारे राहिले नाही. एकुण वैद्यकीय उपचार महाग झाले आहेत. त्यामुळे अनेकजणांना वैद्यकीय उपचाराऐवजी स्वतः चे प्राण गमवावे लागले आहेत. "सांगा कसं जगायचं?....कण्हत कण्हत की गाणं म्हणत..." या प्रश्नाचे उत्तर "तुम्हीच ठरवा!" 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER