Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

दुष्काळी भागातील दुग्ध उत्पादक शेतकरी भाव घसरल्याने तोट्यात

शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय : तीसचा पंचवीस रुपयांवर भाव; पशुधन धोक्यात
टीम : धैर्य टाईम्स
माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वश्रूत अन् परिचित आहे. कधी सुकाळ तर कधी दुष्काळ अशा निसर्गाच्या लहरीवर इथला शेतकरी जगत आहे. केवळ लहरी शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून संकरित गाई जोपासून दुग्ध व्यवसाय सुरू ठेवला आहे. या व्यवसायावर अनेकांचे संसार उभे आहेत. मात्र, सध्या अघोषित दुधाचे दर खाली आले असल्याने शेतकर्‍यांचा जोडधंदा तोट्यात जाणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे पशुधन जोपासले असून ते धोक्यात आले आहे.

दौलत नाईक

दहिवडी : माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वश्रूत अन् परिचित आहे. कधी सुकाळ तर कधी दुष्काळ अशा निसर्गाच्या लहरीवर इथला शेतकरी जगत आहे. केवळ लहरी शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून संकरित गाई जोपासून दुग्ध व्यवसाय सुरू ठेवला आहे. या व्यवसायावर अनेकांचे संसार उभे आहेत. मात्र, सध्या अघोषित दुधाचे दर खाली आले असल्याने शेतकर्‍यांचा जोडधंदा तोट्यात जाणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे पशुधन जोपासले असून ते धोक्यात आले आहे.

सततचा दुष्काळ, लहरी निसर्गाची अवकृपा त्यामुळे दुधत्या जनावरांसाठी ओला-सुका चारा तयार करताना शेतकरी वर्षभर झटत असतात. यावर्षी माण तालुक्यावर निसर्गाची कृपा होऊन पाऊस समाधानकारक झाला. यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी-मका पिकांचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी यावर्षी ज्वारी, मक्याच्या वैरणीच्या गंजी लागल्या आहेत. 

लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची मागणी घटली आहे.  शेतकर्‍यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात जोपासला आहे. दुधाचे दर गेल्या महिन्यापर्यंत अगदी तीस रुपयांपर्यंत होते. हा भाव शेतकर्‍यांना परवडत होता. त्यातून दोन पैसे शिल्लक राहून व्यवसायात समाधानी होता. मात्र, हळूहळू दुधाचे भाव खासगी डेअरीकडून कमी करण्यात आले आहेत, हे कमी झालेले भाव शेतकर्‍यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडून जाण्याची गडद भीती निर्माण झाली आहे.

दिवसेंदिवस पशुखाद्याचे भाव गगणाला भिडू लागले आहेत. पशुखाद्याचा रतीब गाईंना लावल्या शिवाय जादा प्रमाणात दूध निघत नाही आणि जनावरांचे आरोग्य संतुलित राहत नाही. दुधाचे भाव घटल्याने पशुखाद्य यामध्ये सरकी, गोळी पेंड, मक्याचा भरडा, ओली व वाळलेली वैरण, औषधोपचार, संगोपन करताना पशुपालक शेतकरी तोट्यात जाताना दिसतोय. जनावरांच्या खुराकासाठी सरकी पेंड 1575 रुपये, गोळी पेंड 1350 रुपये तर मक्याचा भरडा 1050 रुपये, आटा 1000 रुपये, खपरी पेंड 2500 रुपये भावाने प्रती 50 पन्नास किलोची गोणी खरेदी करावी लागत आहे.  

पशुपालकांना दुभत्या जनावरांना दररोज सकस आहार द्यावा लागतो. त्यामध्ये पशुखाद्य, हिरवा चारा, वाळला कडबा यावर इतका सरासरी पावणे चारशे ते चारशे रुपये खर्च होत असतो. जनावरांचा दुभता व भाकड काळ यातील दुधाचे सरासरी प्रमाण प्रतिदिन पंधरा लिटर इतके मानले तर पावणे चारशे रुपये शेतकर्‍यांच्या हातात येतात. दररोज पशुखाद्य सरासरी दहा किलो तीनशे रुपयांच्या घरात जातंय तर 25 किलो वैरण किमान शंभर रुपयांची लागत आहे. त्यामुळे उत्पादन आणि खर्च बघितला तर हा जोडधंदा तोट्यात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

गाईच्या दुधाचा भाव फॅट, एसएनएफ या निकषावर ठरविला जातो. सध्या 16 एप्रिलनंतर गाईच्या दुधाला फॅट 3.5 एसएनएफ 8.5 या गुणवत्तेला 25 रुपये दर दिला जातोय, या अगोदर याच गुणवत्तेला 30 रुपये दर दिला जात होता. आता प्रती लिटर दुधाला पाच रुपयांची घसरण झालीय. आगामी काही दिवसांत आणखी पाच रुपयांची घसरण होण्याची शक्यता आहे. मग मे महिन्याच्या सुरवातीला भाव वीस रुपयांवर येईल, असे वर्तविण्यात येत आहे. तसेच फॅट 3.5 एसएनएफ 8.5च्या खाली गुणवत्ता आल्यास प्रती पॉईंट 40 पैसे प्रमाणे दरांची घसरण होत आहे. कमी फॅट, एसएनएफचे दूध शेतकर्‍यांना विक्री करायला व संकलन केंद्र चालकांना खरेदी करायला परवडत नाही.

सध्या 16 एप्रिल पासून 3.5 फॅट व 8.5 एसएनएफला 25 रुपये दर झाला आहे, तर कमी म्हणजे 3.0 फॅटला बावीस साडेबावीस रु. इतका दर बसत आहे. हे दर प्रत्येक दहा दिवसानी ढासळू लागले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात दर वाढत असतात. दर वाढायचं दूर राहिलं तर टिकून राहायचं सोडाच, दिवसेंदिवस दरात घसरण सुरू आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास पशुपालक शेतकरी उद्ध्वस्त होऊन जाईल. तळहाताच्या फोडासारखे पशुधन सांभाळताना शेतकर्‍यांचा जीव मेटाकुटीला येत आहे.


मिल्किंग मशीन, कडबा कुट्टीमुळे वेळ अन् मनुष्यबळाची बचत
शेतकर्‍यांनी अधिक दूध उत्पादनासाठी संकरित गाई पाळल्या आहेत. अधिकतम दूध देणार्‍या प्रजाती विकसित झाल्या आहेत, जादा दूध देणार म्हणल्यावर त्या गाईंना खुराक ही त्या प्रमाणात द्यावा लागत असतो. अनेक पशुपालक शेतकर्‍यांनी पाच व त्यापेक्षा जादा गाईची जोपासना केली आहे. या जनावरांना ओली वाळलेली वैरण तोडून खाऊ घालणे कष्टाचे व जिकिरीचे असल्याने, वैरणीची बचत करणे या अनुषंगाने कडबा कुट्टीचा वापर करण्यात येत आहे. तसेच भरपूर गाई असल्याने सर्व गाईंच्या वेळेत धारा काढणे आवश्यक असते तर त्यासाठी कुशल माणसांची गरज असते. परंतु, दूध धारा काढण्यासाठी पशुपालक सर्रास मिल्किंग मशीनचा वापर करीत आहेत. त्यातून वेळ व मनुष्यबळाची बचत होत आहे. यासाठी शेतकर्‍यांना जादा भांडवल गुंतवावे लागत आहे.     
 
दुधाच्या भावानुसार गाईंच्या किमतीत चढउतार
बाजारपेठेत दुधाचे भाव कसे आहेत, यावर दुभत्या व व्यायला झालेल्या गाईंचा दर ठरत आहेत. दुधाचे भाव खाली आल्यास गाईंचे दर कमी होऊन गाईंची विक्री मंदावते तर दर वाढल्यास गाई शोधून विकत मिळत नाहीत, परिणामी शेतकर्‍यांना गाई खरेदीसाठी व्यापार्‍यांचा आसरा घ्यावा लागत असतो. सध्या गाईंच्या किमती लाखाच्या घरात आहेत. गेल्या दुष्काळाच्या खाईत पशुधन घटले होते. मात्र, अलीकडे पर्जन्यमान चांगले झाल्याने शेतकर्‍यांकडे स्वतःच्या शेतात चारा निर्माण होऊन पुन्हा पशुधन वाढले आहे.
 
 
दुधाचा दर घसरल्यास व्यवसाय परवडत नाही..
दुग्ध व्यवसाय करायचा म्हटलं की गाई खरेदी करणे, निवार्‍यासाठी गोठा-शेड बांधणे, कडबा कुट्टी, मिल्किंग मशीन, चार्‍याची साठवणूक व तरतूद करणे, पशुखाद्य, मक्याचा भरडा आदीसाठी भांडवल गुंतवावे लागते. दुभती जनावरे अधूनमधून आजारी पडतात. त्यांना महागडा औषधोपचार करावा लागतो. शेतात किमान आठमाही हिरव्या चार्‍याचे नियोजन करून उन्हाळ्यात सुक्या चार्‍याबरोबर हिरवा, ओला चारा खरेदी करावा लागतो. या सर्व उलाढालीच्या चार्‍याबरोबर हिरवा, ओला चारा खरेदी करावा लागतो. या सर्व उलाढाली करीत असताना दुधाचे दर किमान तीस रुपयांच्या खाली आल्यास शेतकरी तोट्यात जात आहे.
- सुनील खाडे, पशुपालक शेतकरी, पळशी.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER