Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

दुष्काळी भागातील दुग्ध उत्पादक शेतकरी भाव घसरल्याने तोट्यात

शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय : तीसचा पंचवीस रुपयांवर भाव; पशुधन धोक्यात
टीम : धैर्य टाईम्स
माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वश्रूत अन् परिचित आहे. कधी सुकाळ तर कधी दुष्काळ अशा निसर्गाच्या लहरीवर इथला शेतकरी जगत आहे. केवळ लहरी शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून संकरित गाई जोपासून दुग्ध व्यवसाय सुरू ठेवला आहे. या व्यवसायावर अनेकांचे संसार उभे आहेत. मात्र, सध्या अघोषित दुधाचे दर खाली आले असल्याने शेतकर्‍यांचा जोडधंदा तोट्यात जाणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे पशुधन जोपासले असून ते धोक्यात आले आहे.

दौलत नाईक

दहिवडी : माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वश्रूत अन् परिचित आहे. कधी सुकाळ तर कधी दुष्काळ अशा निसर्गाच्या लहरीवर इथला शेतकरी जगत आहे. केवळ लहरी शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून संकरित गाई जोपासून दुग्ध व्यवसाय सुरू ठेवला आहे. या व्यवसायावर अनेकांचे संसार उभे आहेत. मात्र, सध्या अघोषित दुधाचे दर खाली आले असल्याने शेतकर्‍यांचा जोडधंदा तोट्यात जाणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे पशुधन जोपासले असून ते धोक्यात आले आहे.

सततचा दुष्काळ, लहरी निसर्गाची अवकृपा त्यामुळे दुधत्या जनावरांसाठी ओला-सुका चारा तयार करताना शेतकरी वर्षभर झटत असतात. यावर्षी माण तालुक्यावर निसर्गाची कृपा होऊन पाऊस समाधानकारक झाला. यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी-मका पिकांचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी यावर्षी ज्वारी, मक्याच्या वैरणीच्या गंजी लागल्या आहेत. 

लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची मागणी घटली आहे.  शेतकर्‍यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात जोपासला आहे. दुधाचे दर गेल्या महिन्यापर्यंत अगदी तीस रुपयांपर्यंत होते. हा भाव शेतकर्‍यांना परवडत होता. त्यातून दोन पैसे शिल्लक राहून व्यवसायात समाधानी होता. मात्र, हळूहळू दुधाचे भाव खासगी डेअरीकडून कमी करण्यात आले आहेत, हे कमी झालेले भाव शेतकर्‍यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडून जाण्याची गडद भीती निर्माण झाली आहे.

दिवसेंदिवस पशुखाद्याचे भाव गगणाला भिडू लागले आहेत. पशुखाद्याचा रतीब गाईंना लावल्या शिवाय जादा प्रमाणात दूध निघत नाही आणि जनावरांचे आरोग्य संतुलित राहत नाही. दुधाचे भाव घटल्याने पशुखाद्य यामध्ये सरकी, गोळी पेंड, मक्याचा भरडा, ओली व वाळलेली वैरण, औषधोपचार, संगोपन करताना पशुपालक शेतकरी तोट्यात जाताना दिसतोय. जनावरांच्या खुराकासाठी सरकी पेंड 1575 रुपये, गोळी पेंड 1350 रुपये तर मक्याचा भरडा 1050 रुपये, आटा 1000 रुपये, खपरी पेंड 2500 रुपये भावाने प्रती 50 पन्नास किलोची गोणी खरेदी करावी लागत आहे.  

पशुपालकांना दुभत्या जनावरांना दररोज सकस आहार द्यावा लागतो. त्यामध्ये पशुखाद्य, हिरवा चारा, वाळला कडबा यावर इतका सरासरी पावणे चारशे ते चारशे रुपये खर्च होत असतो. जनावरांचा दुभता व भाकड काळ यातील दुधाचे सरासरी प्रमाण प्रतिदिन पंधरा लिटर इतके मानले तर पावणे चारशे रुपये शेतकर्‍यांच्या हातात येतात. दररोज पशुखाद्य सरासरी दहा किलो तीनशे रुपयांच्या घरात जातंय तर 25 किलो वैरण किमान शंभर रुपयांची लागत आहे. त्यामुळे उत्पादन आणि खर्च बघितला तर हा जोडधंदा तोट्यात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

गाईच्या दुधाचा भाव फॅट, एसएनएफ या निकषावर ठरविला जातो. सध्या 16 एप्रिलनंतर गाईच्या दुधाला फॅट 3.5 एसएनएफ 8.5 या गुणवत्तेला 25 रुपये दर दिला जातोय, या अगोदर याच गुणवत्तेला 30 रुपये दर दिला जात होता. आता प्रती लिटर दुधाला पाच रुपयांची घसरण झालीय. आगामी काही दिवसांत आणखी पाच रुपयांची घसरण होण्याची शक्यता आहे. मग मे महिन्याच्या सुरवातीला भाव वीस रुपयांवर येईल, असे वर्तविण्यात येत आहे. तसेच फॅट 3.5 एसएनएफ 8.5च्या खाली गुणवत्ता आल्यास प्रती पॉईंट 40 पैसे प्रमाणे दरांची घसरण होत आहे. कमी फॅट, एसएनएफचे दूध शेतकर्‍यांना विक्री करायला व संकलन केंद्र चालकांना खरेदी करायला परवडत नाही.

सध्या 16 एप्रिल पासून 3.5 फॅट व 8.5 एसएनएफला 25 रुपये दर झाला आहे, तर कमी म्हणजे 3.0 फॅटला बावीस साडेबावीस रु. इतका दर बसत आहे. हे दर प्रत्येक दहा दिवसानी ढासळू लागले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात दर वाढत असतात. दर वाढायचं दूर राहिलं तर टिकून राहायचं सोडाच, दिवसेंदिवस दरात घसरण सुरू आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास पशुपालक शेतकरी उद्ध्वस्त होऊन जाईल. तळहाताच्या फोडासारखे पशुधन सांभाळताना शेतकर्‍यांचा जीव मेटाकुटीला येत आहे.


मिल्किंग मशीन, कडबा कुट्टीमुळे वेळ अन् मनुष्यबळाची बचत
शेतकर्‍यांनी अधिक दूध उत्पादनासाठी संकरित गाई पाळल्या आहेत. अधिकतम दूध देणार्‍या प्रजाती विकसित झाल्या आहेत, जादा दूध देणार म्हणल्यावर त्या गाईंना खुराक ही त्या प्रमाणात द्यावा लागत असतो. अनेक पशुपालक शेतकर्‍यांनी पाच व त्यापेक्षा जादा गाईची जोपासना केली आहे. या जनावरांना ओली वाळलेली वैरण तोडून खाऊ घालणे कष्टाचे व जिकिरीचे असल्याने, वैरणीची बचत करणे या अनुषंगाने कडबा कुट्टीचा वापर करण्यात येत आहे. तसेच भरपूर गाई असल्याने सर्व गाईंच्या वेळेत धारा काढणे आवश्यक असते तर त्यासाठी कुशल माणसांची गरज असते. परंतु, दूध धारा काढण्यासाठी पशुपालक सर्रास मिल्किंग मशीनचा वापर करीत आहेत. त्यातून वेळ व मनुष्यबळाची बचत होत आहे. यासाठी शेतकर्‍यांना जादा भांडवल गुंतवावे लागत आहे.     
 
दुधाच्या भावानुसार गाईंच्या किमतीत चढउतार
बाजारपेठेत दुधाचे भाव कसे आहेत, यावर दुभत्या व व्यायला झालेल्या गाईंचा दर ठरत आहेत. दुधाचे भाव खाली आल्यास गाईंचे दर कमी होऊन गाईंची विक्री मंदावते तर दर वाढल्यास गाई शोधून विकत मिळत नाहीत, परिणामी शेतकर्‍यांना गाई खरेदीसाठी व्यापार्‍यांचा आसरा घ्यावा लागत असतो. सध्या गाईंच्या किमती लाखाच्या घरात आहेत. गेल्या दुष्काळाच्या खाईत पशुधन घटले होते. मात्र, अलीकडे पर्जन्यमान चांगले झाल्याने शेतकर्‍यांकडे स्वतःच्या शेतात चारा निर्माण होऊन पुन्हा पशुधन वाढले आहे.
 
 
दुधाचा दर घसरल्यास व्यवसाय परवडत नाही..
दुग्ध व्यवसाय करायचा म्हटलं की गाई खरेदी करणे, निवार्‍यासाठी गोठा-शेड बांधणे, कडबा कुट्टी, मिल्किंग मशीन, चार्‍याची साठवणूक व तरतूद करणे, पशुखाद्य, मक्याचा भरडा आदीसाठी भांडवल गुंतवावे लागते. दुभती जनावरे अधूनमधून आजारी पडतात. त्यांना महागडा औषधोपचार करावा लागतो. शेतात किमान आठमाही हिरव्या चार्‍याचे नियोजन करून उन्हाळ्यात सुक्या चार्‍याबरोबर हिरवा, ओला चारा खरेदी करावा लागतो. या सर्व उलाढालीच्या चार्‍याबरोबर हिरवा, ओला चारा खरेदी करावा लागतो. या सर्व उलाढाली करीत असताना दुधाचे दर किमान तीस रुपयांच्या खाली आल्यास शेतकरी तोट्यात जात आहे.
- सुनील खाडे, पशुपालक शेतकरी, पळशी.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER