Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
माती परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा याचे मानेवाडी येथे प्रात्यक्षिक : युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ. सोनू संग्राम अहिवळे यांचे कडून फलटण नगर परिषद शाळा क्र 3 ला सबमर्सीबल पंप ( पाणी उपासयची मोटर ) भेट फलटण तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडत जाहीर जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ : रणजीत देशमुख फलटण येथील ओंकार साळुंखे बालगंधर्व परिवार पुरस्काराने सन्मानित विठ्ठल नामाचे उच्चारण ह्रदयाच्या आरोग्यासाठी प्रभावी - डॉ.प्रसाद जोशी खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची मा. नगरसेवक सनी अहिवळे यांच्या निवासस्थानी भेट फलटण तालुक्यातील थेट सरपंच निवडी आरक्षण सोडत ४ जुलै रोजी - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शिस्तीमुळेच मालोजीराजे शेती संकुलाचा विकास होऊ शकला : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण येथील पै.खंडेराव करचे यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश : पालकमंत्री ना.शंभुराज देसाई यांची उपस्थिती माऊलींच्या पालखी सोहळ्याला फलटण येथे विना खंडित वीज पुरवठा : रवींद्र ननावरे यांची माहिती फलटण येथून पालखी प्रस्थाना नंतर पालखी तळाची केवळ तीन तासात स्वच्छता : मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या कामाची तत्परता मंगळवार दि.१ जुलै रोजी पालखी तळ स्वच्छता अभियान राबविणार : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर डराडोच्या वतीने वारकरी माऊलींना मोफत चहा,पाणी आणि बिस्कीट वाटप कै.नंदकुमार भोईटे मित्र मंडळाच्या वतीने वारकऱ्यांची अन्नदान सेवा माउलींच्या स्वागतासाठी फलटणला पूर्वतयारी सुरु : मुख्याधिकारी निखिल मोरे कोळकी येथे 25 जून रोजी बांधकाम कामगार नोंदणी कॅम्प श्री दत्त इंडियाचे १२ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट : अजितराव जगताप माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजे गटाचा पाठिंबा विडणीच्या उपसरपंचपदी मनीषा नाळे बिनविरोध : बहुमतातील लोकनेता तोंडावर पडला - सरपंच सागर अभंग यांचे टीकास्त्र कोळकीसाठी ९० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर : माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती फलटणला होणार अद्ययावत बसस्थानक : आमदार सचिन पाटील धुळदेवचे माजी सरपंच सुभाष शिंदे भाजपात - विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : माजी खासदार रणजितसिंह कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाचे उदघाट्न व 1000 मे. टन गोदामच्या बांधकामाचा शुभारंभ रविवारी विविध मान्यवरांच्या उपस्थित होणार संपन्न चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांची फलटण येथील राम पेट्रोलियमला भेट शहरातील अंतर्गत पालखी मार्गाची अतिशय दयनीय अवस्था : सार्वजनिक बांधकाम विभागाचे फक्त पाट्या टाकाण्याचे काम ढोल ताशांच्या गजरात चिमुकल्यांचे स्वागत श्रीराम विद्याभवन येथे पावलांचे ठसे घेऊन अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत फलटण येथे आज 19 जून रोजी महायुतीचा शासकीय योजनांच्या लाभार्थीचा स्नेह मेळावा श्रीमंत रघुनाथराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ.सोनू संग्राम अहिवळे यांच्या कडून एकता गणेशोत्सव मंडळास स्टेज भेट राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी रामभाऊ ढेकळे यांची नियुक्ती जाधववाडी (फलटण) येथे सौ.स्वातीताई मुनिष जाधव यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप फलटण रायडर्स सायकलवारीचे दि. २१ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान मुलांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घ्यावा : अभिजित सोनवणे श्रीराम एज्युकेशन सोसायटी मधून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्चस्त पदावरती विराजमान : डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नवागतांचे स्वागत बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन

दूरदृष्टीच्या नेतृत्वाने अनेक पिढ्या दुष्काळी असलेला भाग बागायतदार केला

टीम : धैर्य टाईम्स

|| विकासाच्या सत्यकथा ||

दूरदृष्टीच्या नेतृत्वाने अनेक पिढ्या दुष्काळी असलेला भाग बागायतदार केला. 

विधान परिषद सभापती, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, फलटण चे खंबीर नेतृत्व आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराजांनी नुकतीच वयाची पंचहत्तरी पूर्ण केली. मागच्या काही दशकांची त्यांची सामाजिक व राजकीय कारकीर्द राहिलेली आहे. त्यात त्यांनी प्रदेशाच्या व नागरिकांच्या सेवेसाठी अविरतपणे संघर्ष व कार्य केले. त्यांच्या या कार्याचा मागोवा घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

सततचा दुष्काळ, जगण्यातील उदासीनता आणि शेतकरी, कष्टकरी यांच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, रामराजे नाईक निंबाळकर साहेबांच्या कार्यकर्तृत्वातून उभा राहिलेल्या धरणप्रकल्प क्षेत्रातील आर्थिक सुबत्ता पाहिल्यावर, त्यांच्या राजकीय आणि सामाजिक यशाबद्दल प्रत्येकाला कमालीची उत्सूकता लागून राहते.

पिढ्यानपिढ्या दुष्काळी असणारे अनेक तालुके आणि महाराष्ट्रातील काही जिल्हे रामराजेंच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेल्या धोम बलकवडी, नीरा देवघर सारख्या प्रकल्पांमुळे कायमस्वरूपी बागायतदार झाले आहेत. 

निरा- देवघर फलटण आणि आजूबाजूच्या तालुक्यासाठी तसेच जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. गेली अनेक वर्ष या धरणाच्या संबंधित विषयाभोवती रामराजे नाईक- निंबाळकर साहेबांचं राजकीय आणि सामाजिक जीवन राहिलेले आहे.

१९९६ साली निरा देवधर या धरणाचे काम सुरू झाले. धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामती, इंदापूर या भागाला तर उजव्या कालव्यातून फलटण, माळशिरस आणि पंढरपूर या भागाला पाणी पोहोचवले गेले., १९९६ साली रामराजे नाईक- निंबाळकर हे आमदार म्हणून निवडून आले. यावेळी कृष्णा लवादा हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. ३१ मे २००१ पर्यंत कृष्णा खोऱ्याच्या न वापरलेल्या पाण्यासंबंधी पुनर्विचार होण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. आपल्या इतर सहकाऱ्यांच्या साथीने त्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पाठींबा व विविध प्रशासकीय मान्यता मिळवल्या. दरम्यान, पुनर्वसनाला स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध होता. 

१९९३ रोजी प्रत्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांना नागरिकांनी उद्घाटनाला येवू दिले नव्हते अशा परिस्थितीत या भागात स्वतः रामराजे नाईक निंबाळकर यांनी जातीने लक्ष देत लोकांशी संवाद साधत, त्यांना पुनर्वसनाचा विश्वास दिला. प्रत्येक प्रश्नावर तोडगा काढत, अनेक अडचणी सोडवत अकरा वर्षाचा काळ निघून गेला आणि २००७-०८ या वर्षात धरण पूर्ण झाले. लोकांना विश्वासात घेऊन त्यांना या पाण्याचे व या धरणाचे महत्त्व पटवून देण्यात रामराजे नाईक निंबाळकर यांना यश आलं. संपूर्ण प्रक्रियेमध्ये स्थानिक नागरिक, आमदार आणि प्रशासनासह पुनर्वसन प्रक्रियेतील तुटलेल्या २२-२३ गावांच्या योगदानातून हे स्वप्न पूर्ण झाले. याचा लाभ सातारा, सोलापूर जिल्हातील गावांना मोठ्या प्रमाणात झाला.

पाण्याच्या विषयात आदरणीय रामराजे प्रसंगी स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात उभे राहिले आणि प्रदेशाला न्याय मिळवून दिला. २००४ रोजी डाव्या कालव्याला जास्त पाणी मिळण्याच्या संदर्भात संघर्ष झाला. त्यावेळी आणि मा.श्री. अजित दादा पवार आणि रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीवेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी दादांच्या निर्णयाला विरोध करताना या निर्णयावेळी आम्हाला जर पाणी कमी पडले तर आम्ही हे ऐकणार नाही. या अटीवर तुम्हाला हा निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता अन्यथा हा आमच्यावर अन्याय होईल, असे आपले मत त्यांनी आपल्या फाईल वरती स्पष्ट नमूद केले. 

पण, या पाणी वाटपामुळे फलटण तालुक्यातील गावांना कधीच पाण्याची कमतरता भासली नाही. २००४ साली २ कारखाने असलेल्या फलटण तालुक्यात आज ४ कारखाने उभे राहिले आहेत, परिसरात शेतीमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत, ऊस क्षेत्राचे प्रमाण वाढले आहे, प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय क्षेत्राचाही मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे हे सर्व आदरणीय रामराजेंच्या प्रयत्नातून मिळालेल्या या पाण्यामुळेच शक्य झाले आहे. ऊस क्षेत्राचे प्रमाण वाढले. मुबलक पाणी मिळाल्यामुळे शेतीच्या विविध प्रयोग होत गेले. त्याचप्रमाणे, प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय क्षेत्राचाही मोठ्या प्रमाणात विकास झाला.

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या स्थापनेच्या नंतर ज्यावेळी कालवा की स्टोरेज हा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रामुख्याने भूमिका घेत स्टोरेज आणि कालवे यात त्यांनी स्टोरेजला महत्त्व दिलं आणि यामुळेच आज फलटणमधील पाण्याची पातळी वाढलेली दिसून येते. या संपूर्ण पाण्याचा लाभ फलटण तालुका, सांगोला तालुका, माळशिरस, पंढरपूर, बारामती, इंदापूर अशा सर्वच तालुक्यांना झाला.

कुकडी, उजनी, कोयना, वारणा या आणि अशा इतर योजना उभा राहत असताना देखील आदरणीय रामराजेंच्या प्रभावी नेतृत्वामुळे साताऱ्यासाठी १२० टीएमसी पाणी वाचलं. याच दरम्यान ८१ टीएमसी जास्तीचे पाणी फलटण तालुक्याला मिळाले. हे त्यांच्या तीस वर्षाच्या कारकीर्द सर्वोच्च यश आपल्याला म्हणता येईल. 

कृष्णा खोरे महामंडळाच्या बाबतीतही आपली भूमिका मांडत तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मुधोजी क्लब ग्राउंड येथे २२ आमदारांच्या साथीने पत्रातून पाण्याची मागणी केली. आम्हाला कोणतेही मंत्रीपद नको, आम्हाला फक्त पाणी हवं या एका मागणीसाठी संपूर्ण २२ आमदार एकत्र झाले. हा या संपूर्ण पाणी प्रश्नाच्या संबंधी रामराजे नाईक निंबाळकर यांनी घडवून आणलेले एतिहासिक यश म्हणता येईल.

सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून दुष्काळी भागाला पाणीप्रश्नातून मुक्त करण्यासाठी आपल्या संपूर्ण राजकीय शक्तीचा वापर करीत पाणी आणि फक्त पाणी या विषयाला जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करत त्यांनी अविरतपणे संघर्ष केला. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांच्या सक्षम व खंबीर नेतृत्वामुळे आज फलटण तालुक्यात विकसगंगा वाहत आहे.

 

-टीम श्रीमंत रामराजे 

#विकासाच्या_सत्यकथा #फलटण #नीरा_देवघर_प्रकल्प #धोम_बलकवडी #पाणी #धरण

सौजन्य - श्रीमंत रामराजे यांच्या फेसबुक पेज वरून 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER