Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

दूरदृष्टीच्या नेतृत्वाने अनेक पिढ्या दुष्काळी असलेला भाग बागायतदार केला

टीम : धैर्य टाईम्स

|| विकासाच्या सत्यकथा ||

दूरदृष्टीच्या नेतृत्वाने अनेक पिढ्या दुष्काळी असलेला भाग बागायतदार केला. 

विधान परिषद सभापती, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, फलटण चे खंबीर नेतृत्व आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराजांनी नुकतीच वयाची पंचहत्तरी पूर्ण केली. मागच्या काही दशकांची त्यांची सामाजिक व राजकीय कारकीर्द राहिलेली आहे. त्यात त्यांनी प्रदेशाच्या व नागरिकांच्या सेवेसाठी अविरतपणे संघर्ष व कार्य केले. त्यांच्या या कार्याचा मागोवा घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

सततचा दुष्काळ, जगण्यातील उदासीनता आणि शेतकरी, कष्टकरी यांच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, रामराजे नाईक निंबाळकर साहेबांच्या कार्यकर्तृत्वातून उभा राहिलेल्या धरणप्रकल्प क्षेत्रातील आर्थिक सुबत्ता पाहिल्यावर, त्यांच्या राजकीय आणि सामाजिक यशाबद्दल प्रत्येकाला कमालीची उत्सूकता लागून राहते.

पिढ्यानपिढ्या दुष्काळी असणारे अनेक तालुके आणि महाराष्ट्रातील काही जिल्हे रामराजेंच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेल्या धोम बलकवडी, नीरा देवघर सारख्या प्रकल्पांमुळे कायमस्वरूपी बागायतदार झाले आहेत. 

निरा- देवघर फलटण आणि आजूबाजूच्या तालुक्यासाठी तसेच जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. गेली अनेक वर्ष या धरणाच्या संबंधित विषयाभोवती रामराजे नाईक- निंबाळकर साहेबांचं राजकीय आणि सामाजिक जीवन राहिलेले आहे.

१९९६ साली निरा देवधर या धरणाचे काम सुरू झाले. धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामती, इंदापूर या भागाला तर उजव्या कालव्यातून फलटण, माळशिरस आणि पंढरपूर या भागाला पाणी पोहोचवले गेले., १९९६ साली रामराजे नाईक- निंबाळकर हे आमदार म्हणून निवडून आले. यावेळी कृष्णा लवादा हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. ३१ मे २००१ पर्यंत कृष्णा खोऱ्याच्या न वापरलेल्या पाण्यासंबंधी पुनर्विचार होण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. आपल्या इतर सहकाऱ्यांच्या साथीने त्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पाठींबा व विविध प्रशासकीय मान्यता मिळवल्या. दरम्यान, पुनर्वसनाला स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध होता. 

१९९३ रोजी प्रत्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांना नागरिकांनी उद्घाटनाला येवू दिले नव्हते अशा परिस्थितीत या भागात स्वतः रामराजे नाईक निंबाळकर यांनी जातीने लक्ष देत लोकांशी संवाद साधत, त्यांना पुनर्वसनाचा विश्वास दिला. प्रत्येक प्रश्नावर तोडगा काढत, अनेक अडचणी सोडवत अकरा वर्षाचा काळ निघून गेला आणि २००७-०८ या वर्षात धरण पूर्ण झाले. लोकांना विश्वासात घेऊन त्यांना या पाण्याचे व या धरणाचे महत्त्व पटवून देण्यात रामराजे नाईक निंबाळकर यांना यश आलं. संपूर्ण प्रक्रियेमध्ये स्थानिक नागरिक, आमदार आणि प्रशासनासह पुनर्वसन प्रक्रियेतील तुटलेल्या २२-२३ गावांच्या योगदानातून हे स्वप्न पूर्ण झाले. याचा लाभ सातारा, सोलापूर जिल्हातील गावांना मोठ्या प्रमाणात झाला.

पाण्याच्या विषयात आदरणीय रामराजे प्रसंगी स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात उभे राहिले आणि प्रदेशाला न्याय मिळवून दिला. २००४ रोजी डाव्या कालव्याला जास्त पाणी मिळण्याच्या संदर्भात संघर्ष झाला. त्यावेळी आणि मा.श्री. अजित दादा पवार आणि रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीवेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी दादांच्या निर्णयाला विरोध करताना या निर्णयावेळी आम्हाला जर पाणी कमी पडले तर आम्ही हे ऐकणार नाही. या अटीवर तुम्हाला हा निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता अन्यथा हा आमच्यावर अन्याय होईल, असे आपले मत त्यांनी आपल्या फाईल वरती स्पष्ट नमूद केले. 

पण, या पाणी वाटपामुळे फलटण तालुक्यातील गावांना कधीच पाण्याची कमतरता भासली नाही. २००४ साली २ कारखाने असलेल्या फलटण तालुक्यात आज ४ कारखाने उभे राहिले आहेत, परिसरात शेतीमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत, ऊस क्षेत्राचे प्रमाण वाढले आहे, प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय क्षेत्राचाही मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे हे सर्व आदरणीय रामराजेंच्या प्रयत्नातून मिळालेल्या या पाण्यामुळेच शक्य झाले आहे. ऊस क्षेत्राचे प्रमाण वाढले. मुबलक पाणी मिळाल्यामुळे शेतीच्या विविध प्रयोग होत गेले. त्याचप्रमाणे, प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय क्षेत्राचाही मोठ्या प्रमाणात विकास झाला.

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या स्थापनेच्या नंतर ज्यावेळी कालवा की स्टोरेज हा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रामुख्याने भूमिका घेत स्टोरेज आणि कालवे यात त्यांनी स्टोरेजला महत्त्व दिलं आणि यामुळेच आज फलटणमधील पाण्याची पातळी वाढलेली दिसून येते. या संपूर्ण पाण्याचा लाभ फलटण तालुका, सांगोला तालुका, माळशिरस, पंढरपूर, बारामती, इंदापूर अशा सर्वच तालुक्यांना झाला.

कुकडी, उजनी, कोयना, वारणा या आणि अशा इतर योजना उभा राहत असताना देखील आदरणीय रामराजेंच्या प्रभावी नेतृत्वामुळे साताऱ्यासाठी १२० टीएमसी पाणी वाचलं. याच दरम्यान ८१ टीएमसी जास्तीचे पाणी फलटण तालुक्याला मिळाले. हे त्यांच्या तीस वर्षाच्या कारकीर्द सर्वोच्च यश आपल्याला म्हणता येईल. 

कृष्णा खोरे महामंडळाच्या बाबतीतही आपली भूमिका मांडत तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मुधोजी क्लब ग्राउंड येथे २२ आमदारांच्या साथीने पत्रातून पाण्याची मागणी केली. आम्हाला कोणतेही मंत्रीपद नको, आम्हाला फक्त पाणी हवं या एका मागणीसाठी संपूर्ण २२ आमदार एकत्र झाले. हा या संपूर्ण पाणी प्रश्नाच्या संबंधी रामराजे नाईक निंबाळकर यांनी घडवून आणलेले एतिहासिक यश म्हणता येईल.

सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून दुष्काळी भागाला पाणीप्रश्नातून मुक्त करण्यासाठी आपल्या संपूर्ण राजकीय शक्तीचा वापर करीत पाणी आणि फक्त पाणी या विषयाला जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करत त्यांनी अविरतपणे संघर्ष केला. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांच्या सक्षम व खंबीर नेतृत्वामुळे आज फलटण तालुक्यात विकसगंगा वाहत आहे.

 

-टीम श्रीमंत रामराजे 

#विकासाच्या_सत्यकथा #फलटण #नीरा_देवघर_प्रकल्प #धोम_बलकवडी #पाणी #धरण

सौजन्य - श्रीमंत रामराजे यांच्या फेसबुक पेज वरून 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER