Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार

अतिवृष्टी नुकसान भरपाई व संपूर्ण कर्जमाफी कधी मिळणार : आ. दिपकराव चव्हाण

अधिवेशन संपताच बैठक घेऊन संपूर्ण रक्कम देणार : ना. शंभूराज देसाई
टीम : धैर्य टाईम्स

सातारा जिल्ह्यात ७५० कोटी कर्ज माफी मिळणार होती, मात्र प्रत्यक्षात केवळ २५० कोटी मिळाले, दुसऱ्या टप्प्यातील यादी आजच प्राप्त झाली असून त्यामध्ये ३०० कोटी रुपये प्राप्त होतील उर्वरित २०० कोटींचे काय असा सवालही आ. दिपक चव्हाण यांनी उपस्थित केला.

फलटण, दि. २७ : अतिवृष्टीने शेती व शेतकऱ्यांच्या संपूर्ण नुकसान भरपाई सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही, ती कधी देणार, अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या परंतू नुकसान झाले त्यांना मदत करणार अशी घोषणा प्रत्यक्षात कधी येणार आणि कर्जमाफी उर्वरित रक्कम कधी मिळणार असे सवाल आ. दिपक चव्हाण यांनी लक्षवेधीद्वारे विचारले आहेत. 

  नागपूर हिवाळी अधिवेशनात आज मंगळवार दि. २७ रोजी सकाळच्या सत्रात आ. दिपक चव्हाण यांनी लक्षवेधी द्वारे सदर प्रश्न सभागृहात उपस्थित केले. तालीका सभापती आ. संजय शिरसाठ त्यावेळी सभापतींच्या आसनावर होते.

 जुलै, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात राज्यात संततधार अतिवृष्टी झाली, त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील ६ ते ७ तालुके अतिवृष्टीने बाधीत झाले. दुबार पेरणी करुन सुद्धा घेवडा, बटाटा, कांदा व सोयाबीन यांसह भाजीपाला आदी हाताशी आलेली पीके वाया गेली. यामुळे शेतकरी काकुळतीला आला. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी नुकसान ग्रस्त भागाचे दौरे करुन मदतीचे आश्वासन दिले मात्र सातारा जिल्ह्यात अद्याप सदर नुकसान भरपाई पूर्ण स्वरुपात मिळाली नसल्याचे आ. दिपक चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.

 सातारा जिल्ह्यात ३४५०१ शेतकऱ्यांची १० हजार हेक्टर क्षेत्रातील पिके अतिवृष्टीने वाया गेली त्यामध्ये सुमारे २२ कोटी रुपयांचे नुकसान झाले, आतापर्यंत ५ कोटी रुपये देण्यात आले, मात्र उर्वरित १७ कोटी अद्याप न मिळाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे नमूद करीत सदर रक्कम कधी मिळणार असा सवाल आ. दिपक चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला.

अतिवृष्टी नुकसान भरपाई देताना निकषात न बसणाऱ्या परंतू ज्यांचे प्रत्यक्ष नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांनी अतिवृष्टीग्रस्त भगाचा दौरा करताना दिले मात्र प्रत्यक्षात नावे जाहीर होताना त्यामध्ये सातारा जिल्ह्याचा उल्लेख नसल्याने सातारा जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार की नाही असा सवाल जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत उपस्थित केल्यानंतर सर्व बाधीतांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शासनाच्या वतीने दिल्याचे निदर्शनास आणून देत मात्र त्याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आणून देत त्याबाबत काय असा सवालही आ. दिपक चव्हाण यांनी उपस्थित केला.

सातारा जिल्ह्यात ७५० कोटी कर्ज माफी मिळणार होती, मात्र प्रत्यक्षात केवळ २५० कोटी मिळाले, दुसऱ्या टप्प्यातील यादी आजच प्राप्त झाली असून त्यामध्ये ३०० कोटी रुपये प्राप्त होतील उर्वरित २०० कोटींचे काय असा सवालही आ. दिपक चव्हाण यांनी उपस्थित केला.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी अधिवेशन संपल्यावर तातडीने बैठक घेऊन प्रलंबीत निधी वितरित केला जाईल असे आश्वासन सभागृहास दिले.

 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केलेल्या घोषणांची पूर्तता करतात किंबहुना जे करणार त्याच घोषणा करतात याची ग्वाही देत पूर्वी २ हेक्टर असलेली मर्यादा ३ हेक्टर पर्यंत वाढविण्यात आली आणि एन. डी. आर. एफ. च्या निकषाच्या दुप्पट रक्कम देण्याचा निर्णय घेतला असून नियमीत कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष अनुदानाची घोषणा सतत २ वर्षे करण्यात आली मात्र प्रत्यक्षात ते अनुदान आमच्या शासनाने या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचे ही यावेळी पालक मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER