Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

अतिवृष्टी नुकसान भरपाई व संपूर्ण कर्जमाफी कधी मिळणार : आ. दिपकराव चव्हाण

अधिवेशन संपताच बैठक घेऊन संपूर्ण रक्कम देणार : ना. शंभूराज देसाई
टीम : धैर्य टाईम्स

सातारा जिल्ह्यात ७५० कोटी कर्ज माफी मिळणार होती, मात्र प्रत्यक्षात केवळ २५० कोटी मिळाले, दुसऱ्या टप्प्यातील यादी आजच प्राप्त झाली असून त्यामध्ये ३०० कोटी रुपये प्राप्त होतील उर्वरित २०० कोटींचे काय असा सवालही आ. दिपक चव्हाण यांनी उपस्थित केला.

फलटण, दि. २७ : अतिवृष्टीने शेती व शेतकऱ्यांच्या संपूर्ण नुकसान भरपाई सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही, ती कधी देणार, अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या परंतू नुकसान झाले त्यांना मदत करणार अशी घोषणा प्रत्यक्षात कधी येणार आणि कर्जमाफी उर्वरित रक्कम कधी मिळणार असे सवाल आ. दिपक चव्हाण यांनी लक्षवेधीद्वारे विचारले आहेत. 

  नागपूर हिवाळी अधिवेशनात आज मंगळवार दि. २७ रोजी सकाळच्या सत्रात आ. दिपक चव्हाण यांनी लक्षवेधी द्वारे सदर प्रश्न सभागृहात उपस्थित केले. तालीका सभापती आ. संजय शिरसाठ त्यावेळी सभापतींच्या आसनावर होते.

 जुलै, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात राज्यात संततधार अतिवृष्टी झाली, त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील ६ ते ७ तालुके अतिवृष्टीने बाधीत झाले. दुबार पेरणी करुन सुद्धा घेवडा, बटाटा, कांदा व सोयाबीन यांसह भाजीपाला आदी हाताशी आलेली पीके वाया गेली. यामुळे शेतकरी काकुळतीला आला. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी नुकसान ग्रस्त भागाचे दौरे करुन मदतीचे आश्वासन दिले मात्र सातारा जिल्ह्यात अद्याप सदर नुकसान भरपाई पूर्ण स्वरुपात मिळाली नसल्याचे आ. दिपक चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.

 सातारा जिल्ह्यात ३४५०१ शेतकऱ्यांची १० हजार हेक्टर क्षेत्रातील पिके अतिवृष्टीने वाया गेली त्यामध्ये सुमारे २२ कोटी रुपयांचे नुकसान झाले, आतापर्यंत ५ कोटी रुपये देण्यात आले, मात्र उर्वरित १७ कोटी अद्याप न मिळाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे नमूद करीत सदर रक्कम कधी मिळणार असा सवाल आ. दिपक चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला.

अतिवृष्टी नुकसान भरपाई देताना निकषात न बसणाऱ्या परंतू ज्यांचे प्रत्यक्ष नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांनी अतिवृष्टीग्रस्त भगाचा दौरा करताना दिले मात्र प्रत्यक्षात नावे जाहीर होताना त्यामध्ये सातारा जिल्ह्याचा उल्लेख नसल्याने सातारा जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार की नाही असा सवाल जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत उपस्थित केल्यानंतर सर्व बाधीतांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शासनाच्या वतीने दिल्याचे निदर्शनास आणून देत मात्र त्याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आणून देत त्याबाबत काय असा सवालही आ. दिपक चव्हाण यांनी उपस्थित केला.

सातारा जिल्ह्यात ७५० कोटी कर्ज माफी मिळणार होती, मात्र प्रत्यक्षात केवळ २५० कोटी मिळाले, दुसऱ्या टप्प्यातील यादी आजच प्राप्त झाली असून त्यामध्ये ३०० कोटी रुपये प्राप्त होतील उर्वरित २०० कोटींचे काय असा सवालही आ. दिपक चव्हाण यांनी उपस्थित केला.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी अधिवेशन संपल्यावर तातडीने बैठक घेऊन प्रलंबीत निधी वितरित केला जाईल असे आश्वासन सभागृहास दिले.

 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केलेल्या घोषणांची पूर्तता करतात किंबहुना जे करणार त्याच घोषणा करतात याची ग्वाही देत पूर्वी २ हेक्टर असलेली मर्यादा ३ हेक्टर पर्यंत वाढविण्यात आली आणि एन. डी. आर. एफ. च्या निकषाच्या दुप्पट रक्कम देण्याचा निर्णय घेतला असून नियमीत कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष अनुदानाची घोषणा सतत २ वर्षे करण्यात आली मात्र प्रत्यक्षात ते अनुदान आमच्या शासनाने या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचे ही यावेळी पालक मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER