फलटण प्रतिनिधी:-
प्रशासनाने मौजे वाखरी गावातील कुलदैवत असलेले कोटलिंग देवस्थानचा छबीना तसेच शिंदेवस्तीवरील भैरवनाथ देवस्थानचा छबीना या दोन्ही यात्रा कार्यक्रमावर एकीकडे बंदी घातली असून दुसरीकडे जोतीबा देवस्थानच्या यात्रेस परवानगी दिल्याने प्रशासन एकाच गावात यात्रा कार्यक्रमात भेदभाव करत असल्याचा आरोप वाखरी ग्रामस्थांनी लेखी अर्जाद्वारे केला आहे.
दिनाक १३ एप्रिल रोजी वाखरी ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांना दिलेल्या लेखी अर्जात असे नमुद केले आहे की, वाखरी गावामध्ये नविनच गेल्या वर्षीपासुन जोतीबा देवाची यात्रा भरत आहे. तरी त्या यात्रेमध्ये आम्हा ग्रामस्थांची वर्गणी घेतली जात नाही. तरी वाखरी गावातील सर्व जाती धर्मातील लोकांची वर्गणी घेतली जावी म्हणून जोतीबा देवस्थान यात्रा कमिटीस बोलावून आमचे सर्व जाती धर्मातील लोकांची वर्गणी घेणेस आदेश द्यावेत.
वाखरी गावामध्ये ग्रामदैवत भैरवनाथ देवाची यात्रा १०० वर्षापेक्षा जास्त दिवस भरत असुन आतापर्यंत भरत आहे. त्यामध्ये गावातील त्यावेळच्या लोकांनी जे ठरविलेले होते. तेच आजपर्यंत त्याप्रमाणे यात्रा चालु आहे. त्यामध्ये जे गावातील खातेदार आहेत. त्यांच्या सहकार्यातून मोठया प्रमाणात यात्रा भरली जाते. परंतु आता गेल्या वर्षीपासून तुकाराम शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यानी त्यांची यात्रा भरवत गेल्या वर्षीपासुन तुकाराम शिंदे यांची पत्नी सरपंच झाल्यामुळे मुद्दाम आमच्या ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेत सहभागी करुन वर्गणी घ्या म्हणून अडचण करुन यात्रा बंद पाडत आहेत.
प्रशासनाने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ग्रामदैवत भैरवनाथ देवाचे यात्रेत १४४ कलम लागु करुन बंदी घातलेली आहे. तरी आमची सर्व ग्रामस्थांची एक नम्र विनंती आहे की, जोतीबा यात्रेत आमची देखील वर्गणी देणेत यावी न घेतलेस गावात तणावाचे वातावरण निर्माण होवुन भांडण तंटा होण्याची दाट शक्यता आहे. ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेत वर्गणीवरुन वाद झालेमुळे भैरवनाथ यात्रेत १४४ कलमान्वये आदेश काढून भांडणतंटा होवु नये म्हणून बंदी घातलेली आहे.
या आदेशामुळे भैरवनाथ यात्रे बरोबरच कोटलिंग देवस्थानचा छबीना तसेच शिंदेवस्तीवरील भैरवनाथ देवस्थानचा छबीना देखील रद्द करणेत आलेला आहे. सर्व जाती धर्मातील लोकांची वर्गणी जोतीबा देवस्थानमध्ये घेणेत यावी परंतु वर्गणी न घेता जोतीबा यात्रेस व छबीन्यास परवानगी दिली तर जातीयवाद निर्माण होईल व गावामध्ये आपआपसात जातीय वाद होतील गावातील शांततेचा भंग होईल.
तरी प्रशासनाने सर्व ग्रामस्थांना समान न्याय द्यावा नाही दिला तर वाद होण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही आमच्या सर्व गावातील देवकार्य व छबीना काढणेस सर्वांनाच परवानगी द्यावी कुठलाही दुजाभाव करु नये केलेस गावात आपापसात भांडणतंटा होवुन जातीयवाद होण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनाने सर्व ग्रामस्थांना समान न्याय देवुन योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी लेखी स्वरूपात करण्यात आली आहे.आता एकाच गावात तीन वेगवेगळ्या यात्रेस वेगवेगळे नियम लावत प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



















