Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

स्थलांतरीत कामगारांनी एक देश एक रेशन कार्ड योजनेचा लाभ घ्यावा - जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि.25  :  एक देश एक रेशन कार्ड (ONORC) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पोर्टेबिलिटीद्वारे कोणत्याही राज्यातील कोणत्याही रास्तभाव दुकानातून आधार Authentication करुन धान्य उचलण्याची सेाय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील स्थलांतरित कामगार, ऊसतोड मजूर, आदिवासी स्थलांतरण करणाऱ्या लाभार्थ्यांना होणार असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन  जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.

अनुज्ञेय असलेले अन्नधान्य प्राप्त करुन घेण्याची सुविधा पोर्टेबिलिटीद्वारे ई-पॉस उपकरणांवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या करिता लाभार्थ्यांनी सद्यस्थितीत असलेल्या शिधापत्रिकांवरील 12 अंकी क्रमांकाचा वापर करुन आधार प्रमाणिकरणाद्वारे धान्य वितरीत करण्यात येते. ई-पॉस मशीनवर बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण यशस्वी झाल्यानंतरच लाभार्थ्याला एक देश एक शिधापत्रिका योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभ घेणारे सर्व लाभार्थी एक देश एक शिधापत्रिका योजनेसाठी पात्रत आहेत. (ज्या रास्तभाव दुकानांमध्ये मानवी पद्धतीने धान्य वाटप करण्यात येते, त्या रास्तभाव दुकानातील लाभार्थी व राज्य योजनेतील लाभार्थी एक देश एक शिधापत्रिका योजनेचा लाभ घेण्यास पात्र नसतील.)

शिधापत्रिकेतील कमीत कमी एक लाभार्थ्याचा आधार क्रमांक शिधापत्रिकेसोबत संलग्न असावा. लाभार्थ्याकडे एक पेक्षा अधिक शिधापत्रिका नसावी. (लाभार्थ्याचे नाव इतर शिधापत्रिकांमध्ये समाविष्ट असल्यास असा लाभार्थी या योनजेसाठी पात्र नसेल). शिधापत्रिकेतील एकही लाभार्थ्याचे इतर दुसऱ्या शिधापत्रिकेमध्ये नाव समाविष्ट नसावे.

राष्ट्रीय पोर्ट्रेबिलीटी अंतर्गत ज्या शिधापत्रिकेमध्ये एक सदस्य आहे, ती शिधापत्रिका वगळून इतर शिधापत्रिकेमधील काही सदस्य स्वगृही राज्यात वास्तव्यास असतील तेव्हा लाभार्थी अशा शिधापत्रिकेवर अनुज्ञेय संपूर्ण अन्नधान्य गंतव्य राज्यातील रास्तभाव दुकानामधून एकाच व्यवहारात उचल करु शकत नाही. ही सुविधा स्वगृही राज्यातील शिधापत्रिकेतील इतर सदस्यांनाही अन्नधान्याचा लाभ मिळावा याकरिता करण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय पोर्टेबिलीटी अंतर्गत ज्या शिधापत्रिकेमध्ये एकपेक्षा जास्त सदस्य आहेत, अशा शिधापत्रिकेवर लाभार्थी एका व्यवहारामध्ये अनुज्ञेय अन्नधान्याचा 50 टक्के अन्नधान्य उचल करु श्काता, तथापी दोन अन्नधान्य उचलीच्या व्यवहारांमध्ये 7 दिवसांचे अंतर असावे, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती राजमाने यांनी कळविले आहे.

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER