Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

प्रा. रमेश आढाव यांच्यासारखा उमेदवार फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मिळणे हे फलटणकरांचे नशीब

प्रा.रमेश तुकाराम आढाव यांच्या कार्याचा घेतलेला आढावा
टीम : धैर्य टाईम्स

प्राध्यापक रमेश आढाव  :  एक झुंजार पत्रकार 

समाजावर होणाऱ्या अन्यायावर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रहार करणारा होता वाचन, मनन चिंतन करणारे एक सर्जनशील व्यक्तिमत्त्व.

नामांतर आंदोलनात लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होऊन नामांतरासाठी प्रयत्न करणारे भीमसैनिक.समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी प्रकाशित होणाऱ्या 'एकता दर्शन' या साप्ताहिकाचे संपादक 

विद्यार्थी दशेपासूनच अन्यायाविरुद्ध आवाज उठवून न्यायाची लढाई लढणारा कृतिशील कार्यकर्ता.

मवाळ पण तितक्याच जोरकसपणे आपले विचार प्रकट करणारे स्पष्टवक्ते समाजातील तरुणांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणारे शिक्षणप्रेमी 

अनेक ठिकाणी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन व प्रबोधन करणारे सामाजिक कार्यकर्ते. प्राध्यापक रमेश तुकाराम आढाव यांना सर्वजन आढावसर म्हणूनच ओळखतात.अंगाने सडसडीत लाभलेल्या आढाव सर त्यांच्या त्या सफेद कुर्त्यामुळे सहज ओळखले जातात.सरांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. पण त्यांच्या वडिलांवर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव असल्याने त्यांच्यासह सर्व भावंडांना शिक्षणाची संधी मिळाली.सरांच्या आईचे नाव लालूबाई होते. त्यांना विलास व सुरेश हे भाऊ व तोलन नावाची एक बहीण आहे.सरांचे कुटुंब मजुरीवरच अवलंबून असायचे. माधवदास बाबा, महादेव आढाव, नान्याबा अण्णा(नाना महार), बी.पी आढाव, निवृत्ती आढाव यांच्यामुळे आंबेडकरी चळवळ जवळून पाहता आली.सरांचे वडील स्वतः १९३९<साली फलटण येथे झालेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेला हजर होते.त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांतून प्रेरणा घेतली.शिक्षण, राहणीमान आणि समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत प्रबोधनाचे कार्यक्रम करीत ब।सी कांबळे, रा.सू.गवई,बॅरिस्टर खोब्रागडे यांचे कार्यक्रम पाहत गेले.त्यातून मुलांना उच्च शिक्षण देण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. सरांच्या वडिलांनी शिवलाल नानकचंद दोशी यांच्याकडे १८ वर्ष मजुरीने काम केले. दारी धरल। शिवलाल दोशी यांनी मुलांना शिकवण्याचा सल्ला दिला.सरांच्या वडिलांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. तिन्ही मुलांना पदवीधर केले.

       आढाव सरांचे प्राथमिक शिक्षण गुणवरेच्या प्राथमिक शाळेत झाले.माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मुधोजी महाविद्यालयात झाले. पुढे उच्च शिक्षणासाठी ते बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात दाखल झाले.विद्यार्थी दशेपासूनच सरांनी आंदोलने केली. अकरावीमध्ये शिकत असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळत नव्हती म्हणून पंचवीस विद्यार्थ्यांसह त्यावेळचे प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांना भेटले आणि या अन्याय या विरुद्ध न्याय मिळवला. इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी ते गजानन चौकातील फलटण विद्यार्थी बोर्डिंगमध्ये राहिले. पुढे बी.कॉमपर्यंतचे शिक्षण घेताना ते कॉलेजच्या वसतिगृहात राहिले. इथे असताना डबा हा एसटीने यायचा. कधी कधी एसटी चुकली तर वडील स्वतः डबा घेऊन चालत फलटण पर्यंत यायचे.सरांनी शिकावं, मोठं हवं समाजासाठी काहीतरी करावं असं त्यांना कायम वाटायचे. सरांनी मिळणाऱ्या सुट्टीचा वापर मौजमजा करण्यासाठी कधीच केला नाही ते स्वतः शेतात मजुरीला जायचे. 

       महाविद्यालयीन काळात त्यांनी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. नामांतराच्या चळवळीत उपराकार लक्ष्मण मानेंच्या समवेत सहभागी घेतला.एन.एस.एस सारख्या संघटनेने सक्रिय काम केले. राष्ट्रीय प्रौढ साक्षरता अभियानात सहभाग घेऊन साक्षरतेचे काम केले. व्याख्यानाच्या संधी मिळाल्या त्या त्या ठिकाणी सामाजिक चळवळ सांगून समाजप्रबोधनाचे काम केले.मराठा विद्या प्रसारक मंडळात नोकरी मिळाली. पण तिथे ते रमले नाहीत. कारण राजकीय दबावाखाली काम करणे त्यांच्या स्वभावात नव्हते ते या संस्थेतून बाहेर पडले.त्यांनी त्या ठिकाणी अकाऊंटंट व सहकार हे विषय शिकवले.

        नूतन मराठा महाविद्यालयातील सरांचे मित्र भरत सुरसे यांनी साप्ताहिक काढण्याचा सल्ला दिला.अशोकलाल दीक्षित यांना बरोबर घेऊन साप्ताहिकाची परवानगी मिळवली आणि १९९३ ला 'एकता दर्शन' नावाचे साप्ताहिक सुरू झाले.साप्ताहिकांचे प्रकाशन प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांच्या हस्ते झाले. यासाठी माजी आमदार कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर, श्री. सुभाषराव शिंदे,अरविंद भाई मेहता, रवींद्र बेडकिहाळ, प्रा.विजय खुडे, दत्तोपंत देशपांडे उपस्थित होते.समाजाच्या व्यथा वेदना मांडण्यासाठी हे पत्रक काढले. निंभोरे येथील आश्रमशाळेच्या उभारणीमध्ये सक्रिय सहभाग घेतला.बेबी ताईंच्या 'जिणं आमचं' या पुस्तकाचे पुनर्लेखन केले यामुळे साहित्य क्षेत्रातील अनेक लोकांशी संपर्क त्यांचा आला.सरांनी अनेक मोठ्या पदांवर काम केले. बी.कॉम ला असताना रिपब्लिकन युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष पदही त्यांनी भूषविले.पुढे फलटण तालुका बेरोजगार युवक संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.

 केंद्रीय मंत्री खासदार रामविलास पासवानांनी समावेत. . 

भारत सरकारचे तत्कालीन केंद्रीय रेल्वे व दूरसंचार मंत्री रामविलास पासवान यांच्या बरोबर काम केले. त्यांची समाजासाठी आणि तळागळातील माणसांसाठी काम करण्याची तळमळ पाहून रामविलास पासवान साहेबांसोबत सरांनी काम केले.गोरगरीबांना न्याय देणारा अभ्यासू नेता म्हणून सर रामविलास पासवान साहेबांकडे आकर्षित झाले.१९९६ ला खासदार असताना पासवान साहेबांना घरी बोलावले.कस्तुरबा मैदानावर त्यांच्यासोबत भाषण केले. भारतभर दौरे काढल। रेल्वे बोर्डावर व भारत संचार बोर्डावरही सल्लागार सदस्य म्हणून काम करण्याची संधी त्यांना रामविलास पासवान साहेबांमुळे मिळाली.

पत्रकार म्हणून काम करण्याची संधी आपल्याला कशी मिळाली ?

मला लोकप्रिय दैनिक लोकमतमध्ये काम करण्याची संधी मिळाली. प्राध्यापक सिकंदर अहिवळे यांनी माजी लोकमतच्या सातारा आवृत्तीचे उपसंपादक बाबुराव शिंदे यांच्याशी ओळख करून दिली.त्यांनी मला आधार दिला त्यामुळे मी टिकलो. पुढे तरुण भारत या दैनिकाचे तालुका स्तरावरील काम पाहिले. तरुण भारताचे तत्कालीन सातारा जिल्हा आवृत्ती प्रमुख प्राध्यापक अशोक शिंदे यांनी काम करण्याची संधी दिली.आजही मी दैनिक तरुण भारतचे काम करत आहे.

आताच्या पत्रकारितेविषयी आपल्याला काय वाटते?

आधुनिक पत्रकारिता सर्वसामान्यांना न्याय देईल असे सांगणे कठीण आहे. वृत्तपत्र समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमाबरोबरच व्यावसायिक क्षेत्र बनले आहे.स्वातंत्र्यपूर्व काळातील वर्तमानपत्र आणि आताची वर्तमानपत्र यात फार मोठी तफावत आहे. स्पर्धा वाढली आहे. रंगीबेरंगी, आकर्षक, छपाई यासाठी पैशाची गरज भासू लागली आहे.त्यामुळे ही वर्तमानपत्र न्याय देतीलच असे नाही. वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींनी समाजाचे वास्तव दर्शन दाखवणारी बातमी मुख्य संपादकांकडे पाठवली तरी व्यावसायिक दृष्टी असणारा वर्तमानपत्राचा मालक व संपादक या बातमीला अग्रक्रम देईलच असे नाही. ही वस्तुस्थिती आहे.ते कोणीही नाकारू शकत नाही.

आजच्या शिक्षण व्यवस्थेविषयी आपल्याला काय वाटते ?

 शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण केला पाहिजे. शिक्षण हक्क विधेयक जे नुकतेच पारित झाले आहे त्यामुळे मुले आठवीपर्यंत नापास होणार नाहीत. त्यात काही चांगल्या गोष्टी सुचवण्यात आल्या असल्या तरी हे धोरण बहुजन समाजाला मारक आहे. याचा मी निषेध करतो हे धोरण मला मुळीच मान्य नाही खरंतर शिक्षण सक्तीचे व मोफत असायला हवे.

 समाजावर दिवसं दिवस अन्य अत्याचाराच्या घटना घडत असताना नुकताच खैरलांजी हत्याकांडाचा निकाल लागला या विषयी आपल्याला काय वाटते ?

खैरलांजी सारख्या अमानुष घटना या देशाला भूषण नाहीत या खटल्यात न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा रद्द करून त्याऐवजी उच्च न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा देण्याचा निर्णय हा राजकीय दबावापोटी दिला आहे.त्यामुळे आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर न्याय व्यवस्थेमध्ये आपले लोक असायला हवेत.त्याशिवाय निरपेक्ष न्याय मिळणार नाही. पूर्वी दलितांची चळवळ राजकीय सत्तेला सुरुंग लावणारी होती. पण आता ही चळवळ उरली नाही.पॅन्थर सारखी लढाऊ संघटनेची आज गरज आहे. चळवळही सामाजिक विचाराने प्रेरीत असावी.

राजकीय चळवळीविषयी आपल्याला काय वाटते ?

फुले , शाहू , आंबेडकरांच्या चळवळीतील कार्यकर्ता हा जागृत असतो. तो चळवळीतूनच समाजकारण, राजकारण शिकलेला असतो.हुजरेगिरी त्याला चालत नाही.प्रस्थापित राजकारण्यांना तो त्यामुळे चालत नाह। त्याला संधी नाकारून हुजरेगिरी करणाऱ्यांनाच सत्तेत संधी मिळते.यासाठी स्थानिक पातळीपासूनच अगदी संसदेपर्यंत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची माणसे पोहोचली पाहिजेत.आजच्या काळात पैसा हा सर्व काही बनला आहे.त्याने चळवळीला खिंडारं पाडली आहेत. आजच्या काळात बुद्धीजीवी वर्गाचा पैशाने पराभव केला आहे. लोकप्रतिनिधी होण्यासाठी फक्त पैसेवाले पात्र आहेत.

धार्मिक कार्याविषयी आपल्याला काय वाटते ?

धम्म मार्गदर्शक आहे. त्यामुळे धम्म समजावून सांगण्यासाठी सुशिक्षित धम्म प्रचारक व प्रसारक गाव पातळीवर तयार व्हायला पाहिजेत.बुद्धांचा विचार हा घरोघरी गावोगावी वाडय़ावस्त्यांवर पोहचला पाहिजे धम्म आणि राजकारण यांची गल्लत करून चालणार नाही.बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असायला हवे. धम्माचा प्रचार करणाऱया राष्ट्रीय व राज्यपातळीवरील संघटनांमध्ये समन्वय असायला हवा.लोकांना कृतिबद्ध कार्यक्रम द्यायला पाहिजे. धर्माच्या कार्यासाठी समाजानेच आर्थिक पाठबळ द्यायला हवे.

ग्रामीण भागात तुम्ही वाढला. तिथे तुम्ही चळवळी उभारल्या. आपलं काम कशा स्वरूपात आकाराला आले?

ग्रामीण भागात अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा आणि भयंकर जातीयता होतीच त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लढे द्यावे लागले.गावातील धडका बंद करणे असो की समाज प्रबोधनासाठी व्याख्यानमालेचे आयोजन असो आम्ही चळवळही गतिमान करतच राहिलो. पर्यावरणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी वृक्षारोपण करण्याचे कार्यक्रम घेतले.व्यसनमुक्तीपासून ते रक्तदान शिबिराचे आयोजन केले. धार्मिक कार्यक्रमातून धम्माचे विचार पोचवण्याचा प्रयत्न केला.

तरुणांसाठी आपण काय सांगाल ? 

तरुणांनी शिक्षणाला प्राधान्य द्यावे. मोक्याच्या जागा पटकावून समाजासाठी कार्य करावे.प्रशासकीय पदावर गेल्यानंतर समाजापासून आपली नाळ तुटू देऊ नये. विविध क्षेत्रात करिअर करावे. व्यसनापासून दूर राहून समाज बांधवांना मदत करावी.वाचन, मनन, चिंतन करावे. महापुरुषांच्या स्वप्नातील समताधिष्ठित भारत तयार करण्यासाठी प्रयत्न करावा.

राहून गेलेली एखादी गोष्ट कोणती ?

कार्यकर्ता तयार करणारी प्रशिक्षण शाळा उभी करायची आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यांना सर्वप्रकारचे शिक्षण दिले जाईल. समाज व्यवस्था तयार होण्यासाठी चांगल्या कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे.

सीमाप्रश्नाचा जो वाद चालला आहे यावर आपल्याला काय वाटते ?

 भाषावाद व प्रांतवाद असायला नको आहे. बहुसंख्यांक भाषिकांनी अल्पसंख्यांक भाषिकांवर अन्याय करू नये. भाषावर प्रांतरचना असता कामाने असे मला वाटते.

आपल्याला काय करायला आवडते ?

वाचन नाट्यसंगीत ऐकणे. कला व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणं.

आपल्याला काम करण्याची प्रेरणा कशी मिळते ?

समाजाचे वास्तव दर्शन, अन्याय अत्याचार पाहून त्याविरुद्ध काम करण्याची प्रेरणा मिळते.

आपल्या जीवनातला अविस्मरणीय क्षण ?

प्रतिकूल परिस्थितीत असतानाही एक रुपयात प्रवेश मिळाले. फी न भरल्याने शेती शाळेतून हाकलले होते.पण शिवाजीराजेनी सांगितले की गरिबांच्या मुलांसाठी शाळा काढली आहे. पुन्हा शाळेत घेतले. बारामतीला तुळजाराम चतुरचंद कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी दोन ओळींची चिठ्ठी दिली. तसेच डॉ. जे.के गोधा यांनी मदत केली.हे क्षण महत्त्वाचे वाटतात तसेच ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुसेगाव येथे ज्ञानज्योती पुरस्कार स्वीकारतानाचा क्षण अविस्मरणीय वाटतो.

           तसेच साहित्य क्षेत्रात डॉ. बाबा आढाव, ग.प्र प्रधान, डॉ. कुमार सप्तर्षी, प्रा. रामनाथ चव्हाण, पुष्पा भावे, उल्का महाजन,वर्षा देशपांडे,निळू फुले,भारत पाटणकर, नागनाथ अण्णा नायकवडी, भाई वैद्य यांच्या समवेत काम करतानाचे क्षण हे अविस्मरणीय क्षण आहेत.

आपल्या जडणघडणीत मदत करणारे आपले शिक्षक कोणते?

प्राचार्य शिवाजीराव भोसले शिकवायला नव्हते पण त्यांचा सहवास व मार्गदर्शन मोलाचे वाटते.तसेच प्राचार्य एस पी शिंदे( टीसी कॉलेज बारामती) प्राध्यापक राऊत, प्राध्यापक आर व्हि. फडतरे, प्राध्यापक ए. वाय शिंदे,प्राध्यापक डॉ.मधुकर जाधव , प्रा.अे.जे कुलकर्णी यांचे मला विशेष सरकारे लाभले.

 आतापर्यंतच्या आपल्या प्रवासात घरच्यांची साथ कशी मिळाली ?

माझ्या प्रवासात पत्नीची साथ मोलाची आहे. घरच्यांचे सांगणे एकच होते ते म्हणजे सामाजिक चळवळीसाठी कितीही वेळ द्या. घरची चिंता करू नका. कुटुंबाने खूप सहकार्य दिले.

 मुलाखातकार : फलटण च्या आंबेडकर चळवळीचे अभ्यासक तथा साहित्यिक  सोमनाथ घोरपडे, फलटण

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER