फलटण प्रतिनिधी:-
अपघाताच्या दुसऱ्या दिवशी आज सकाळी घटनास्थळावरील सबंधित कंपनीने एकेरी वाहतूक बंद करून दोन्ही कडील वाहतूक गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने सुरू केली हीच वाहतूक काल सुरू केली असती तर दोन तरुणाचा जीव वाचला असता.
आळंदी - पंढरपूर पालखी महामार्गाचे काम करणाऱ्या आर के सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनी च्या नियमबाह्य व धोकेदायक कामामुळे दोन तरुणांना जीव गमवावा लागला असून यापूर्वी या कंपनीकडून अनेक अपघात झाले असून कालच्या अपघात प्रकरणी जबाबदार आर के सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग - ९६५) हा २३४ किमी लांबीचा मार्ग हडपसर (पुणे) - सासवड - जेजुरी - निरा - लोणंद - फलटण - नातेपुते - माळशिरस - बोंडले - वाखरी - पंढरपूर असा असून या चौपदरी रस्त्याचे काम सुरू असून फलटण तालुक्यांतील महामार्गाचे काम
आर.के.सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनी कडून सुरू असून सदरचे काम अनेक महिन्यापासून फारच संथ गतीने सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकारी यांच्यासह पाहणी करून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याकडेही संबंधित कंपनीने दुर्लक्ष केले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महसूल विभाग सदरील कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून तांबमळा येथील दूध संघ ते वडजल येथील फलटण कडून लोणंद कडे जाणाऱ्या एका बाजूकडील काम अनेक दिवसापासून संथपणे सुरू असून लोणंद फलटण कडील बाजूकडे एकाच रस्त्यावर दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू असून या ठिकाणी कोणताही दिशादर्शक फलक लावण्यात आला नसून दोन्ही बाजूकडील वाहतुकीच्या मध्ये कोणत्याही प्रकारचा तात्पुरता दुभाजक लावण्यात आला नसल्याने या रत्यवर भरदाव वेगाने वाहतूक सुरू आहेत.
दिनांक 15 रोजी रात्री तांबमळा येथील गुरू हॉटेलचे पुढे आर.के.सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनी च्या सूर्यस्ता नंतरही मुरूम वाहतूक करणाऱ्या दहा चाकी टिपर ने फलटण येथील दुचाकीवरून निघालेल्या दोन तरुणांना दिलेल्या धडक देत फरपटत नेहत अपघात केला यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. आर.के.सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनी या महामार्गाचे काम सुरू करत असल्यापासून नियमबाह्य व बेकादेशीर पद्धतीने कामकाज करत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. अनेक अपघात यापूर्वी या कंपनीच्या गाड्यांकडून झाले आहेत. पण याकडे कोणतेही संबधित विभाग लक्ष देत नसल्याने या कंपनीची मुजोरी वाढली आहे.
फलटण येथील दोन तरुणाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी जबाबदार असणाऱ्या आर.के.सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनी च्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असून रात्रीच्या वेळी मुरमाची वाहतूक कोणत्या नियमातून होत आहे. सदर मुरूम कोठून आणला जात होता व एकाच बाजू एकाच रस्त्यावर दोन्ही बाजूकडील वाहतूक होत असताना त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात दुभाजक व फलक का लावण्यात आले नाही असा सवाल नागरिक विचारत असून फलटण तालुक्यातील नागरिक आर.के.सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनी च्या कामकाजावर प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत. आता या अपघातातील दोन तरुणांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



















