Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

बोंडारवाडी धरणाबाबत त्वरित निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करणार 

उषा उंबरकर यांचा इशारा : पाण्यावाचून मेढा-केळघर भागाची दुर्दशा
टीम : धैर्य टाईम्स
मेढा-केळघर भागातील कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांची पाण्याअभावी दैना झाली असून, 1991 पासूनच्या तीन दशकात या भागातून मोठ्या प्रमाणावर शहरात स्थलांतर होत आहे. बर्‍याच प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडल्या असून, केडंबे येथील हायस्कूल सुद्धा बंद पडले आहे. 60 ते 70 टक्क्यांच्यावर शेती पाणी नसल्यामुळे पडून आहे. जावली तालुका दूध पुरवठा संघ 10 वर्षांपूर्वीच बंद पडला असून, भागातील दुग्धव्यवसाय पूर्णपणे संपलाय. पाण्याअभावी कुठलाच जोडधंदा करणे शक्य नाही. त्यामुळे तरुण वर्ग शहरात स्थलांतरित

कुडाळ : मेढा-केळघर भागातील कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांची पाण्याअभावी दैना झाली असून, 1991 पासूनच्या तीन दशकात या भागातून मोठ्या प्रमाणावर शहरात स्थलांतर होत आहे. बर्‍याच प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडल्या असून, केडंबे येथील हायस्कूल सुद्धा बंद पडले आहे. 60 ते 70 टक्क्यांच्यावर शेती पाणी नसल्यामुळे पडून आहे. जावली तालुका दूध पुरवठा संघ 10 वर्षांपूर्वीच बंद पडला असून, भागातील दुग्धव्यवसाय पूर्णपणे संपलाय. पाण्याअभावी कुठलाच जोडधंदा करणे शक्य नाही. त्यामुळे तरुण वर्ग शहरात स्थलांतरित होतोय. येत्या काळात पाण्याची व्यवस्था न झाल्यास हा संपूर्ण भाग लवकरच  निर्मनुष्य होण्याची भीती आहे. या भागातील प्रत्येक गावात आतापर्यंत चार-पाच पाणीपुरवठा योजना झाल्यात.

गेल्या 15 ते 20 वर्षांत पाणलोट, जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कोट्यवधी रुपये शासनाने खर्च केले आहेत. केळघर, डांगरेघर, भामघर येथे तीन कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यावर दोन-अडीच कोटी खर्च झाले. मात्र, त्यामुळे पाण्याचा प्रश्‍न सुटला नाहीच. 54 गावांना शाश्‍वत पाणीपुरवठा होण्यासाठी बोंडारवाडी येथे धरण हाच एकमेव उपाय आहे. या धरणासाठी गेली 12 वर्ष  प्रयत्न चालू आहेत. त्यातही बोंडारवाडी धरण कृती समिती गेली 8 वर्ष धरणासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. 

तीन वर्षांपूर्वी या धरणासाठी पाणी परवाना मिळाला आहे. किती भूसंपादन करावे लागणार व धरणरेषा याचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. आता ट्रायल पिट करून प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवण्याची आवश्यकता असताना शासनाने बोंडारवाडी धरणाची व्यवहार्यता तपासण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण केले आहे. याचा अर्थ यापूर्वी झालेले धरणाबाबतचे निर्णय रद्दबातल ठरतात. कृती समिती या शासन आदेशाचा निषेध करते. हा जी आर रद्द करून बोंडारवाडी धरणास तातडीने प्रशासकीय मंजुरी न दिल्यास कृतीसमिती 54 गावांचे तीव्र आंदोलन उभारेल व त्यामधे महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील, असा इशारा कृती समितीच्या निमंत्रक व सामाजिक कार्यकर्त्या उषा उंबरकर यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER