Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त

यशस्वी व सुखी जीवनासाठी भावनांचे व्यवस्थापन गरजेचे - डॉ. गणेश लोखंडे

टीम : धैर्य टाईम्स

व्यक्तिमत्व विकास ही निरंतर व गतिशील प्रक्रिया आहे. व्यक्ती दिसते कशी यापेक्षा व्यक्ती आहे कशी
याला अधिक महत्त्व आहे. बाह्यरूप हा व्यक्तिमत्त्वाचा एक भाग असतो, परंतु अंतर्गत व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य जबाबदारीने वाढवणे आवश्यक असते. स्वतःच्या क्षमतांना ओळखून त्या वाढवणे, स्व- कौशल्ये विकसित करणे, स्वतः च्या स्वभाव गुणांची समीक्षा करणे व समाजामध्ये स्वतःचे अंतर वैयक्तिक संबंध सुव्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. आपल्या क्षेत्रात व एकूणच समाजात  चांगले तसेच यशस्वी म्हणून ठसा उमटवयाचा असेल तर मेंदूच्या बुद्धिमत्तेच्या व्यवस्थापना इतकेच भावनिक बुद्धिमत्तेच्या व्यवस्थापनाची गरज आहे. असे विचार छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गणेश लोखंडे यांनी व्यक्त केले. ते छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभाग व मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन व्याख्यान कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून 'व्यक्तिमत्व व्यवस्थापन' या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रो. डॉ.अनिलकुमार वावरे होते.
पुढे मार्गदर्शन  करताना  डॉ.  लोखंडे म्हणाले की व्यक्तिला स्वतःच्या व इतरांच्या भावनांचे आकलन करून त्याचे व्यवस्थापन करता आले पाहिजे. जीवनात नकारात्मकता, अपमान व मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांना सुद्धा शांत पद्धतीने सामोरे जाता आले पाहिजे.  मनोक्षमता ही आरोग्य क्षमता वाढवत असते. मन शरीराबरोबर चालते व जेथे मन शरीराची साथ सोडते तेथे आरोग्यात बिघाड सुरू होतो. व्यायाम, शांत झोप व समाजात मिसळणे या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त असतात तर एकाकीपणा, जागरण व व्यसन हे आरोग्यास घातक आहे. व्यक्तीने स्वतःमधील ऋण स्थाने व बलस्थाने ओळखायला हवीत. स्वतःचे जीवन चिंतन स्व- अनुभवातून व वाचनातून  विकसित होत असल्याने वास्तवाशी सुसंगत तार्किकतेला महत्व देऊन जीवन चिंतन करायला हवे. प्रत्येक नात्यातील जबाबदारी, भूमिका व कर्तव्ये समजून घेऊन ती निकोपने पार पाडणे आवश्यक आहे. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य  प्रो. डॉ. अनिलकुमार वावरे यांनी सांगितले की आज केवळ साक्षरता वाढवण्याऐवजी उद्योजकता व कौशल्य आधारित शिक्षणाची अधिक आवश्यकता आहे. जगात समाजाच्या गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करणाऱ्या तांत्रिक ज्ञानाला व कौशल्यांना  महत्त्व आले आहे. ऑनलाईन शिक्षणात जीवन कौशल्ये  देताना व आत्मसात करताना मर्यादा येतात. युवकांनी विषय ज्ञानाबरोबरच आवडीच्या व बाजारात मागणी असणाऱ्या कौशल्य क्षेत्रात करिअर करावे. कोरोना महामारी नंतरच्या जगात नोकऱ्या बाबतची स्थिती फार चांगली नाही. युवकांनी केवळ नोकरी करण्याकडे कल न ठेवता उद्योग व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची जाणीवपूर्वकजडणघडणकरावी.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक- स्वागत व पाहुण्यांची ओळख महाविद्यालयातील कौशल्य विकास विभागाचे समन्वयक डॉ. संदीप किर्दत यांनी करुन दिली. आभार उपप्राचार्य डॉ. रामराजे माने -देशमुख यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. रवींद्र महाजन यांनी केले. यावेळी उपप्राचार्य रोशनआरा शेख, प्रा.[डॉ.] सुभाष वाघमारे, डॉ. रघुनाथ साळुंखे, प्रो. सविता मेनकुदळे, प्रो. डॉ.धनाजी मासाळ, प्रो. डॉ.शिवाजीराव पाटील व डॉ. धनंजय नलवडे यांचेसह प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER