फलटण प्रतिनिधी :
फलटण शहराचा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा जपणाऱ्या सोमवार पेठेची ओळख गेल्या काही वर्षांत राजकीय दहशत, धमक्या आणि दडपशाहीमुळे मलिन झाल्याची खंत प्रभाग क्रमांक 1 चे अपक्ष उमेदवार देविदास पवार-पाटील, यांचे बंधू आणि श्रीमती नर्मदा किसनराव पवार -पाटील यांचे चिरंजीव प्रसाद पवार - पाटील यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर सोमवार पेठेला दहशतमुक्त करणे आणि मूलभूत विकासाचे नियोजन राबविणे हाच या निवडणुकीतील आपला मुख्य अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोमवार पेठेतील समस्या विषयी संवाद साधताना प्रसाद पवार-पाटील म्हणाले, “दहशतीतून चालणारे राजकारण हे शहराच्या विकासाला अडथळा आहे. नागरिकांनी भीतीतून मुक्त होऊन विकासाचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. यावेळी जनता जागी झाली असून परिवर्तनासाठी तयार आहे.” त्यामुळे या निवडणुकी नंतर सोमवार पेठेतील नागरिक भयमुक्त जीवन जगतील व त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असेल असा आशावाद प्रसाद पवार - पाटील यांनी व्यक्त केला.
मूलभूत विकासाचे प्रमुख मुद्दे
१) पाणीपुरवठा व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन
सोमवार पेठेत वेळोवेळी पाणीटंचाईची समस्या निर्माण होते.
पाण्याचे समान वितरण, नवीन पाइपलाइन व दुरुस्तीची कामे जलदगतीने पूर्ण करणे.
२) ड्रेनेज व गटार समस्यांचे निराकरण
वारंवार गटारे तुंबणे, दुर्गंधी आणि अस्वच्छता.
आधुनिक ड्रेनेज सिस्टम व नियमित देखभाल योजनेची अंमलबजावणी.
३) रस्ते, स्ट्रीटलाइट्स आणि वाहतूक सुविधा सुधारणा
मुख्य व आंतरिक रस्त्यांची तातडीने पुनर्बांधणी.
सर्व भागात स्ट्रीटलाइट बसवणे व रात्री सुरक्षिततेची खात्री.
४) स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन
घरगुती कचरा संकलनासाठी नियमित वाहन व्यवस्था, डोअर-टू-डोअर सेवा.
क्षेत्र स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष उपक्रम व जनता सहभाग कार्यक्रम.
५) युवकांना रोजगार व कौशल्य प्रशिक्षण केंद्र
स्थानिक तरुणांसाठी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम व रोजगार मेळावे.
लघुउद्योजकांना मदत व मार्गदर्शन केंद्र.
६) महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक आणि हेल्पलाइन
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी तत्काळ प्रतिसाद व्यवस्था.
महिला स्वयंसहाय्यता गटांना प्रोत्साहन व आवश्यक सुविधा.
७) नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य सुविधा
प्राथमिक आरोग्य केंद्र, मोफत तपासणी व औषध उपलब्धता.
आरोग्य शिबिरांचे नियमित आयोजन.
यावेळी प्रसाद पवार-पाटील यांच्या आई श्रीमती नर्मदा किसनराव पवार-पाटील व प्रसाद पवार-पाटील यांनीसुद्धा नागरिकांना आवाहन केले की,
“व्यक्तींच्या भीतीवर नव्हे, तर जनतेच्या विकासावर आधारित नेतृत्वाला पाठिंबा द्या.”
“सोमवार पेठेला भयमुक्त करून प्रगतीच्या मार्गावर नेणे हेच आमचे ध्येय आहे. नागरिकांचा विश्वास हीच आमची ताकद आहे,”
असे सांगत देविदास पवार-पाटील यांनी निवडणूक प्रचाराला दमदार सुरुवात केली.
नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत बदल आणि प्रगतीसाठी मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.











