नुकतीच साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची सुरवात झाली आहे. यामुळे शहरातील ऊस वाहतूक वाढल्यामुळे रस्त्यावरील धोका वाढला आहे. याचा प्रत्यय फलटणकरांना दि. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आला. फलटण शहरातील रिंग रोड वरून जाताना, डीएड कॉलेज चौक येथे उसाने भरलेल्या ट्रॉलीचे लॉक तुटल्याने ट्रॅक्टर पासून ट्रॉली वेगळी झाली.
फलटण : डीएड कॉलेज चौक येथे उसाने भरलेल्या ट्रॉलीचे लॉक तुटल्याने ट्रॅक्टर पासून ट्रॉली वेगळी झाली. उतारामुळे वेगाने पाठीमागे येऊन ती रस्त्याच्या डिव्हायडर व लाईट पोलला धडकली. सुदैवाने यामध्ये कोणताही अनर्थ झाला नाही, परंतु ट्रॉलीच्या पाठीमागे जर वाहने असती, तर मात्र नक्कीच अपघात घडून जीवितहानी झाली असती.
नुकतीच साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची सुरवात झाली आहे. यामुळे शहरातील ऊस वाहतूक वाढल्यामुळे रस्त्यावरील धोका वाढला आहे. याचा प्रत्यय फलटणकरांना दि. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आला. फलटण शहरातील रिंग रोड वरून जाताना, डीएड कॉलेज चौक येथे उसाने भरलेल्या ट्रॉलीचे लॉक तुटल्याने ट्रॅक्टर पासून ट्रॉली वेगळी झाली. याठिकाणी असलेल्या उतारामुळे वेगाने पाठीमागे येऊन रस्त्याच्या डिव्हायडर व लाईट पोलला धडकली. मात्र कोणताही अनर्थ घ़डला नाही, तसे पहायला गेले तर हा रस्ता वर्दळीचा समजला जातो. घटनेवेळी ट्रॉलीच्या पाठीमागे जर वाहने असती तर मात्र नक्कीच अपघात घडून जीवितहानी आणि वित्तहानी झाली असती.
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर- ट्रॉली मध्ये जास्त क्षमतेने ऊस भरल्यामुळे या वाहनांचे वारंवार अपघात होत असतात. ऊस वाहतूकदाराला जास्त फायदा होण्यासाठी ऊस वाहतूक करताना ट्रॅक्टर- ट्रॉलीमध्ये एकावर एक थर देत ऊस भरला जातो. उंच थर देऊन कॅपॅसिटीपेक्षा जास्त ऊस भरल्यामुळे चढ- उतार किंवा खड्ड्यांमध्ये ट्रॉल्या पलटी होतात, किवा कॅपॅसिटीपेक्षा जास्त ऊस भरल्यामुळे टायर फुटूनही अपघात झाल्याचे पहायला मिळते. ऊस वाहतूक करताना रस्त्यांना ट्रॅक्टर- ट्रॉलीत जर त्याच्या क्षमते एवढाच ऊस भरला, आपली वाहने व्यवस्थित असल्याची खात्री केली, भरलेल्या ट्रॉलीच्या मागे रिफ्लेक्टर लावले आणि वाहतूक नियमांचे पालन केले तर हे अपघात टाळता येणार आहेत.
जे शेतकरी व ऊस वाहतूकदार वाहनांच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त ऊस भरतील किंवा आपली वाहने सुस्थितीत ठेवणार नाहीत, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर साखर कारखाने व पोलीस यंत्रणेने दंडात्मक कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.