Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार अजितदादा यांच्या सारखे कणखर नेतृत्व पुन्हा घडणार नाही,शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेत पाठिंबा दिला - आमदार सचिन पाटील

महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून शासकीय आदेशाला केराची टोपली : मुख्यालयाच्या ठिकाणी रहाणेबाबत उदासीनता कायम

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनीधी :- 

महावितरणचे कार्यकारी अभियंता पासून शाखा अभियंता मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय शनिवार व रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी मुख्यालय सोडून जात असल्याने फलटण महावितरण विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना व नागरीकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

महावितरण कर्मचा-यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी रहाणेबाबत व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय शनिवार व रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी मुख्यालय सोडून न जाण्याबाबत महावितरण कंपनीने आजअखेर अनेक प्रशासकीय परिपत्रके काढूनही फलटण विभाग महावितरण कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागीय कार्यालय तसेच चार उपविभाग व शाखा कार्यालय मधिल अभियंते व कर्मचारी त्यांचे मुख्यालयाचे ठिकाणी रहाणे बंधनकारक असताना मुख्यालयी राहत नसून मुख्य अभियंता आणि अधिक्षक अभियंता हे त्यांच्या अधिनस्थ कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा/तपासणी करताना कर्मचारी मुख्यालयात राहतात का याची तपासणी करत नसल्याने महावितरण कंपनीचे कर्मचारी बिनधास्त मुख्यालय सोडून इतरत्र राहत आहेत.

ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याकरीता व अचानकपणे उदभवणाऱ्या अडचणीचा निपटारा करण्याकरीता क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे मुख्यालयाचे ठिकाणी रहाणे बंधनकारक आहे. याबाबत आढावा बैठकीमध्ये वेळोवळी सूचना देण्यात आल्या असताना याबाबत ठोस कारवाई होताना दिसत नाही.महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणेबाबत आणि मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांच्याविरुध्द तसेच सुट्टीच्या दिवशी मुख्यालय सोडून इतरत्र जाणाऱ्या विरोधात कारवाई करणेबाबत सुचना करण्यात आलेल्या आहेत. 

क्षेत्रीय कार्यालयातील विभाग प्रमुखाकडून या प्रकरणी प्रभावीपणे आढावा घेतला जात नाही, तसेच दोषी कर्मचाऱ्यांवर तत्परतेन व गांभिर्याने कारवाई होत नाही.कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात रहाणेबाबत यापूर्वी दिलेल्या सूचनांची परिणामकारक अंमलबजावणी व्हावी, याकरीता मुख्य अभियंता आणि अधिक्षक अभियंता हे फलटण विभागीय कार्यालय अभियंता व कर्मचारी मुख्यालयात राहतात का? विना परवानगी मुख्यालय सोडून इतरत्र जातात का? याची तपासणी करत नाहीत. अधिक्षक अभियंता यांनी त्यांच्या मंडळातील सर्व कर्मचा-यांसंदर्भात अशा प्रकरणी तपासणी करण्यासाठी पथकांची नेमणूक करण्याची आवश्यकता असून सदर पथकाने सुट्टीच्या दिवशी व कार्यालयीन वेळेनंतर विशिष्ट शाखा / उपविभागातील कर्मचाऱ्यांच्या घोषीत निवास स्थानांना भेट देऊन ते मुख्यालयात राहतात का? याची पडताळणी करावी व या संदर्भातील अहवालानुसार तात्काळ शिस्तभंगाविषयक कारवाई करण्यात यावी तसेच कसूरदार अधिका-यांविरूध्द शिस्तभंगाविषयक करण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे त्यांच्या मुख्यालयी न राहता रोज येणे-जाणे करतात. त्यामुळे अचानक उ‌द्भवणाऱ्या व निर्माण होणाऱ्या घटनेला /अडचणीला ते त्वरित सामोरे जाऊ शकत नाहीत त्यामुळे गोंधळ निर्माण होतो व जनक्षोभ वाढतो. तसेच बरेच अधिकारी/कर्मचारी कार्यालयात वेळेवर व सोमवारी तसेच शुक्रवारी उपस्थित रहात नसल्याचेही सतत नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. जे अधिकारी/कर्मचारी त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी रहात नाहीत तसेच कार्यालयात वेळेत उपस्थित रहात नाहीत अशा अधिकारी/कर्मचा-यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या सर्व प्रकाराचा नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. याप्रकरणी ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केली आहे.

एका शाखा अभियंता यांना नागरिकांनी सुट्टीच्या दिवशी वीज समस्याबाबत फोन केला असता शाखा अभियंता सलग दोन ते तीन दिवस ग्रामीण भागात हजर नसल्याने तसेच राहण्यास नसल्याने तुम्ही मुख्यालयी का राहत नाही अशी विचारणा केली असता "तुला काय करायचे ते कर,कुणाकडे जायचे त्याच्याकडे जा" असे उत्तर दिले असल्याची माहिती एका शेतकऱ्याने दिली.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER