Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार

वेगवान निर्णयांमुळे जिल्ह्याचा विकास गतिमान विकासकामांसोबतच योजनांच्या अंबलवजावणीत जिल्हा अग्रेसर

टीम : धैर्य टाईम्स

शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांना लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे व पर्यायाने जिल्ह्याचा व राज्याचा विकास करणे हे राज्य शासनाचे धोरण आहे. या धोरणाला अनुसरून सध्या राज्य शासनाचे काम सुरू आहे. सातारा जिल्ह्यातही विकास कामे सध्या वेगाने सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताराचे सुपुत्र असल्यामुळे त्यांचे जिल्ह्याच्या विकासाकडे विशेष लक्ष आहे. तसेच गतिमान शासनाचा प्रत्यय आणून देणारे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वेगवान कामकाजामुळे जिल्ह्याची विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे.

शासनाच्या महत्वाकांक्षी आणि नागरिकांना जास्तीत जास्त योजनांचा व शासकीय सेवांचा फायदा देणारी शासन आपल्या दारी या योजनेची सुरूवातच आपल्या जिल्ह्यातून झाली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या योजनेमुळे नागरिकांना शासकीय सेवा घरापर्यंत पोहचवण्यात येत आहेत. त्यासाठी आज प्रशासन नागरिकांच्या घरापर्यंत पोहचल्याचे पहायला मिळत आहे. पूर्वी लोकांना शासकीय कामांसाठी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत होते. पण, आज ही परिस्थीत पूर्णतः बदलली आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या या संकल्पनेला प्रशासनानेही तितकाच चांगला प्रतिसाद देत आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत 2 लाख 74 हजार 348 लाभांचे वाटप करण्यात आले आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू असल्यामुळे निजीकच्या काळात यामध्ये नक्कीच लक्षणीय वाढ झालेली दिसणार आहे.

 कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस विभागाचे काम आहे. त्यासाठी पोलीस विभाग सुसज्ज असणेही तितकेच गरजेचे आहे. याचाच विचार करून पोलीस दलाच्या अधुनिकीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 6 मिनीबस, 7 स्कॉर्पिओ व पेट्रोलिंगसाठी 15 मोटार सायकल खरेदीस मंजूरी देण्यात आली आहे. तसेच महाबळेश्वर, सातारा व कराड शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्यात आले आहेत.

 विकासासाठी पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाच्या सुविधांची उपलब्धताही तितकीच महित्वाची असते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धरणे आहेत. तसेच पुर्वेकडे दुष्काळी भाग ही आहे. या दुष्काळी भागात पाणी पोहचवण्याचे काम सध्या वेगाने सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच जिहे-कठापूर योजनेच्या बंद नलिका वितरण प्रणालीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. या योजनेमुळे 18 हजीर 970 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्याशिवाय या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमुळे आणखी 8 हजार 530 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. दुष्काळी भागात सिंचनाच्या शाश्वत सुविधा उभारण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. या कामांमुळे माण तालुक्यातील दुष्काळ कायमचा नाहीसा होईल असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत, वन विभागामार्फत अमृत सरोवर योजनेंतर्गत वनतळे बांधणे व दुरुस्ती करणे इत्यादी 22 कामे घेण्यात आलेली आहेत. तसेच जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, सातारा यांचे मार्फत पाझर तलाव दुरुस्ती करण्याची 38 कामे हाती घेण्यात आली आहेत.

याशिवाय शाश्वत सिंचन व चांगल्या पिण्याच्या पाण्याची सुविधेसाठी जनजागृती होणेही तितकेच महत्वाचे आहे. हे ओळखूनच शासाने नदी संवाद यात्रा या अभियानाचे आयोजन केले. या माध्यमातून लोकांपर्यंत पाणी प्रदूषण व पाण्याचे महत्व, नदी स्वच्छतेचे महत्व व त्याची गरज याविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यात कृष्णा, वेण्णा आणि माणगंगा या नद्यांची संवाद यात्रा संपन्न झाली. या उपक्रमामध्ये शासन, प्रशासन, स्वयंसेवक, जलतज्ज्ञ यासोबतच नदीकाठची गावेही उत्स्फूर्तपणे सहभागी होताना दिसली.

नागरिकांचे राहणीमान सुधारण्यासाठी त्यांना चांगली घरे उपलब्ध करुन देणे महत्वाचे आहे. तसेच परिसरही स्वच्छ व सुंदर असणे गरजेचे आहे. यासाठीच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजनेसाठी 36 कोटी 37 लाख 27 हजार , अनुसूचित जाती व नवबौध्द वस्ती सुधार योजना (ग्रामीण) साठी 18 कोटी 03 लाख 72 हजार, डोंगरी भागात साकव बांधकामासाठी 9 कोटी 73 लाख 89 हजार, विद्युत जोडणी व विद्युत विकासासाठी 8 कोटी 49 लाख 99 हजार, नाविण्यपूर्ण योजनेसाठी 2 कोटी 39 लाख 49 हजार निधी देण्यात आला आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रामाणावर घरकूल योजनाही राबवल्या जात आहेत. त्यामध्ये पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना या योजनांची कामगिरी चांगली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य आवास योजना अंतर्गत सन 2022-23 मध्ये 4 हजार 343 घरकुले बांधण्यात आलेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल करिता जागा खरेदी अर्थ सहाय्य योजनेंतर्गत घरकुल योजनेसाठी पात्र पण भूमिहीन /बेघर अशा 44 लाभार्थ्याना प्रति लाभार्थी 500 चौरस फूट पर्यंत जागा खरेदीसाठी 22 लाख अनुदान उपलब्ध करुन दिले आहे.

 शिक्षण हा ही एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळेच शासन विविध महामंडळांच्या माध्यमातून वेगवेगळ्या शिष्यवृत्ती देत आहे. इयत्ता 8 वी ते 10 वी मधील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकामधील विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसाठी 40 लाख, इयत्ता 5 वी, 8 वी मधील मागासवर्गीय विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देणे या योजनेसाठी 18 लाख यासह इतर विविध योजनेसाठी या विभागामार्फत निधी वितरीत करण्यात आलेला आहे. शिक्षण विभागाकडील शाळा खोल्या बांधकाम व दुरुस्तीसाठी 23 कोटी 53 लाख, महिला व बालकल्याण विभागासाठी 17 कोटी 56 लाख इतका निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे.

कृषि हा विकासातील एक महत्वाचा घटक आहे. आपला देश कृषि प्रधान असल्यामुळे या क्षेत्राच्या विकासावर विशेष लक्ष दिलेले दिसून येते. जिल्ह्यातही कृषिच्या विकासासाठी अनेक कामे होताना दिसत आहेत. त्यामध्ये कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत जिल्ह्यात 6 हजार 229 लाभार्थ्यांना 32 कोटी 63 लाख रुपयांच्या विविध शेती औजारांसाठी अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत जिल्ह्यात एकूण 294 वैयक्तिक प्रस्तावांना कर्ज मंजूर झाले आहे. मुख्यमंत्री शास्वत सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिचंन संचासाठी 5 कोटी 83 लाख 47 हजार रुपयांचे पूरक अनुदान वितरण करण्यात आले आहे.  अटल भूजल योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन संचासाठी 42 लाख 8 हजार रुपये पुरक अनुदान वाटप करण्यात आले आहे.

 एकूणच सध्याच्या शासनाच्या ध्येयधोरणाखाली सातारा जिल्ह्याची विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे. आपले सरकार गतिमान, निर्णय वेगवान याचा प्रत्यय जिल्ह्यात येताना दिसत आहेत.

 

हेमंतकुमार चव्हाण,
माहिती अधिकारी, सातारा

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER