Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार

शिक्षण आणि आरोग्याची गुंतवणूक केली तरच राष्ट्र प्रगत बनते : आ. पृथ्वीराज चव्हाण

टीम : धैर्य टाईम्स
Only by investing in education and health can a nation become advanced : Prithviraj Chavan
आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थिती लक्षात घेऊन सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासनात विकासाभिमुख भूमिका वठवावी. आपला देश जगाच्या पातळीवर आर्थिक, शैक्षणिक व आरोग्याच्या बाबतीत मागे आहे. आज जे देश प्रगत आहेत; ते शिक्षण आणि आरोग्य गुंतवणूक म्हणून करतात. म्हणून ती प्रगत राष्ट्रे आहेत. आपण शिक्षण व आरोग्य अनुत्पादन खर्च समजतो, त्यामुळे आपली प्रगती कमी असून शिक्षण आणि आरोग्याची गुंतवणूक केली; तरच राष्ट्र प्रगत बनते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

कराड : आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थिती लक्षात घेऊन सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासनात विकासाभिमुख भूमिका वठवावी. आपला देश जगाच्या पातळीवर आर्थिक, शैक्षणिक व आरोग्याच्या बाबतीत मागे आहे. आज जे देश प्रगत आहेत; ते शिक्षण आणि आरोग्य गुंतवणूक म्हणून करतात. म्हणून ती प्रगत राष्ट्रे आहेत. आपण शिक्षण व आरोग्य अनुत्पादन खर्च समजतो, त्यामुळे आपली प्रगती कमी असून शिक्षण आणि आरोग्याची गुंतवणूक केली; तरच राष्ट्र प्रगत बनते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
येथील वेणूताई चव्हाण सभागृहात रविवारी ६ रोजी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक प्रा. भगवान शामराव खोत यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त केंद्रातील अधिकाऱ्यांच्या वतीने "सोहळा कृतज्ञतेचा" या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये प्रा. भगवान खोत व त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती विद्या खोत यांचा सत्कार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे  प्रशासन सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, प्रो. डॉ.बी.एन. गोफणे, अॅड. संभाजीराव मोहिते, नायब तहसीलदार बी.एम. गायकवाड, बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतिश घाटगे यांच्यासह शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. चव्हाण म्हणाले, आपल्याकडे आज नॉलेज बेस्ड म्हणजे ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था बनवणे आवश्यक आहे. तरच आपला विकास होऊ शकतो. आज देशाची अर्थव्यवस्था नाजुक बनली असून आपण प्रगत राष्ट्रांच्या खूप मागे चाललो आहोत. आपला विकासाचा निर्देशांक मायनसमध्ये आला आहे. शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था ठिक नाही. त्यामुळे शिक्षण व आरोग्य व्यवस्थेकडे आपणास लक्ष द्यावे लागेल, तरच प्रगती होऊ शकेल, असे अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी यावेळी केले.
ते पुढे म्हणाले, प्रा. भगवानराव खोत यांचे गाव वाळवा तालुक्यातील कामेरी. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सातारा, कडेपूर व कराड येथे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे काम करत त्यांनी नोकरीतील सर्व जबाबदाऱ्या अतिशय समर्थपणे पार पाडल्या आहेत. आपल्या विषयावर राज्याच्या, देशाच्या सद्य परिस्थितीवर व स्पर्धा परीक्षेबाबत व्याख्याने दिलेली आहेत. कराडकरांना जे काम लक्षात राहील, ते म्हणजे शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय संलग्न स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जवळजवळ २२ वर्षे चालवणे. आज या केंद्रातून शेकडो विद्यार्थी यु.पी.एस.सी व एम.पी.एस.सी मध्ये यशस्वी होऊन देश व राज्याच्या प्रशासनातील महत्वाच्या जागेवर अधिकार पदावर राहून त्यांनी विविध विभागांमध्ये आपल्या कार्याचा उत्तम ठसा उमटवला आहे. खोत सरांनी केलेले हे कार्या खरच कौतुकास्पदच आहे. आज सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या गुरुप्रती कृतज्ञता दर्शवत "सोहळा कृतज्ञतेचा" कार्यक्रम घेऊन प्रा. खोत सरांचा माझ्या हस्ते सत्कार केला, याबद्दल समस्थ अधिकाऱ्यांचे आ. चव्हाण यांनी  यावेळी कौतुक केले. तसेच त्यांच्या यशाचे व त्यांच्या कार्याबद्धल त्यांचे अभिनंदनही केले.  
अध्यक्षीय भाषणात डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी प्रा. खोत हे बापूजींच्या विचारांचे खरेखुरे पाईक आहेत. त्यांनी अखंडपणे आपले मार्गदर्शनाचे कार्य सुरू ठेवावे, असे मत व्यक्त केले. तर प्रमूख उपस्थित प्रो.डॉ. बी.एन. गोफणे यांनी खोत सरांचा स्वभाव, त्यांनी घेतलेले श्रम, विद्यार्थ्यांसाठी त्यांची तळमळ, आपल्या कार्यावरील श्रद्धा आदीविषयी मार्मिक शब्दांत मनोगत व्यक्त केले.
अॅड. संभाजीराव मोहिते यांनी खोत सरांचे कराडच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण व विजय दिवस समारोह समितीमधील योगदान किती मोठे आहे, ते स्पष्ट केले. नायब तहसीलदार बी.एम. गायकवाड यांनी सरांची चिकाटी, विद्यार्थ्यांविषयी असणारी तळमळ याविषयी मत मांडले. तसेच शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतिश घाटगे यांनी खोत सरांविषयी ह्रदयाला स्पर्श करणारे अत्यंत भावस्पर्शी भाषण केले.
सत्कारमूर्ती प्रा. भगवान खोत सत्काराला उत्तर देताना सद्गुरू गाडगे महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील व शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना अभिवादन करुन म्हणाले, आयुष्यामध्ये खूप काम करता आले. बापूजीचें विचार समाजात रुजवता आले, याचा मनस्वी आनंद वाटतो. स्पर्धा परीक्षेसाठी आम्ही दिलेले थोडेफार ज्ञान आपण घेतले व उज्वल यश संपादन केले. राज्याच्या व देशाच्या प्रशासनातील महत्वाच्या  अधिकार पदावर राहून आपण सामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून  जनतेसाठी विकासाभिमुख काम करीत आहात. यासाठी मी आपला सदैव कृतज्ञच राहीन, असे मत व्यक्त केले. तसेच प्रा. खोत यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यास मनस्वी शुभेच्छाही दिल्या.
दरम्यान, राज्य कर  उपाआयुक्त गणेश पाटील, डी.वाय.एस.पी सागर कवडे, प्राचार्य योगेश गुरव, एल.आय.सी.डी.ओ.  सचिन पाटील, डी.वाय.एस.पी संकेत गोसावी, नायब तहसीलदार श्रीधर राजमाने, गुप्त वार्ता अधिकारी मकरंद येडगे, तहसीलदार अजित पाटील, नवोदयचे सुर्यकांत काळे, शर्मिला पाटील, कामगार उपायुक्त शितल कुलकर्णी या  अधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात खोत सरांनी आम्ही अधिकारी बनण्यासाठी घेतलेले श्रम आम्ही कधीच विसरू शकत नाही. म्हणूनच आम्ही हा ‘सोहळा कृतज्ञतेचा’ कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले. तसेच सरांची विद्यार्थ्यांशी असलेली बांधिलकी, विद्यार्थ्यांना मदत करण्याची वृत्ती याविषयीही त्यांनी अतिशय भावूक होऊन आपापली मते व्यक्त केली. कु. ऐश्वर्या पाटणकर हिने एक कविता सादर करून सरांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उद्योजक राजविक्रम जाधव यांनी केले. कंपोझर शिंगर मुंबई फिल्म इंडस्ट्रीमधील वैभव पोतदार यांनी  स्वरबद्ध स्वागतगीत सादर केले. सूत्रसंचालन भरत कदम यांनी केले. आभार कामगार उपायुक्त शितल कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता कु. सिमरन भादुले हिने सादर केलेल्या वंदेमातरम या राष्ट्रगीताने झाली.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER