Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार

प्रशासनाने 2013 च्या ऊस आंदोलनाची पुनरावृत्ती टाळावी

पंजाबराव पाटील : बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास वेगळा विचार करण्याचा इशारा
टीम : धैर्य टाईम्स
The administration should avoid a repeat of the 2013 sugarcane agitation
पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ऊसा व्यतिरिक्त पैसे मिळवून देणारे दुसरे पीक नसल्याने यावरच येथील लोकांचे जीवन अवलंबून आहे. गेल्या चार वर्षात साखरेचे दर जवळपास 1 हजार रुपयांनी वाढले. मात्र, ऊस दर 100 रुपयांनीही वाढला नाही. साखरेचे दर वाढल्यावर कारखानदारांनी स्वतःहून त्या पटीत किमान 500 ते 600 रुपये दर द्यायला हवा होता.

कराड : बळीराजाच्या ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मध्यस्थी करत प्रशासन व कारखाना अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली आहे. परंतु, या बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास संघटनेला वेगळा विचार करावा लागेल. ऊस दरासाठी 2013 मध्ये झालेले  आंदोलन व त्याचे परिणाम सर्वज्ञात असून त्याची पुनरावृत्ती होऊ नये; याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला.  
येथील प्रशासकीय इमारतीसमोर बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एक रकमी एफआरपी अधिक सहाशे रुपये ऊस दरासाठी धरणे आंदोलन सुरू आहे. आज मंगळवारी 9 रोजी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी तहसीलदार व पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी प्राथमिक चर्चा केली. याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बळीराजाचे प्रदेशाध्यक्ष बी.जी. पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
अध्यक्ष पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ऊसा व्यतिरिक्त पैसे मिळवून देणारे दुसरे पीक नसल्याने यावरच येथील लोकांचे जीवन अवलंबून आहे. गेल्या चार वर्षात साखरेचे दर जवळपास 1 हजार रुपयांनी वाढले. मात्र, ऊस दर 100 रुपयांनीही वाढला नाही. साखरेचे दर वाढल्यावर कारखानदारांनी स्वतःहून त्या पटीत किमान 500 ते 600 रुपये दर द्यायला हवा होता. तो न दिल्याने शेतकऱ्यांना त्यांच्याच हक्काच्या पैशांसाठी आंदोलन करावे लागत असून त्याशिवाय कारखानदारांना दुसरी भाषा कळत नाही.
ते म्हणाले, प्रशासनाने मध्यस्थी करून ऊसदरप्रश्‍नी लेख परीक्षक वर्ग १ व विभागीय सहसाखर आयुक्त, सर्व कारखान्यांचे एमडी व आंदोलक शेतकरी यांची  गुरुवारी ११ रोजी दुपारी १२ वाजता कराड प्रांताधिकारी कार्यालयात संयुक्तिक बैठक आयोजित केली आहे. सदर बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास ऊस दरासाठी 2013 साली झालेल्या आंदोलनाचा इतिहास सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती होऊ नये, याची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे. आम्ही जरी धरणे आंदोलनास बसलो असलो; तरीही त्याचा वेगळा अर्थ प्रशासनाने काढू नये. आम्हाला वेगळ्या पद्धतीनेही लढा देता येतो. परंतु, ती पद्धत अवलंबण्याची वेळ कारखानदार, प्रशासनाने आमच्यावर आणू नये, असा इशाराही पंजाबराव पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, बळीराजाच्या धरणे आंदोलनाला शेतकऱ्यांचा वाढता पाठिंबा मिळत असून विविध भागातून हजारो शेतकरी आंदोलनस्थळी भेट देऊन समर्थन देत आहेत. तसेच विश्व इंडियन पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी संघटना, भीम आर्मी आदी. संघटनांनीही आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कारखानदारांची युनिट वाढवण्याची चळवळ
पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांची भूक वाढत चालली असून ते ऊस दर वाढवण्याऐवजी स्वतःच्या कारखान्यांची युनिटे वाढविण्यावरच भर देत आहेत. त्यासाठी कारखानदारांकडून शेतकऱ्यांची वारेमाप लूट सुरू आहे. स्वतःच्या नातवाला, जावयाला कारखान्याचे नवे युनिट काढून देण्याची एकप्रकाची चळवळच कारखानदारांनी सुरू केली असल्याची टीका करत ही गोष्ट शेतकऱ्यांच्या विनाशाचे कारण ठरणार असल्याचे सूचक विधानही पंजाबराव पाटील यांनी यावेळी केले.

ऊस तोड न घेणे हेच हत्यार
शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत ऊस तोड न घेता आंदोलनात सहभागी झाले पाहिजे.  त्यामुळे आपणास प्रतिटन 3600 रुपये दर वाढवून मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना दगडफेक वा ऊस वाहतूक अडवण्याची गरज नसून त्यांनी फक्त स्वतः ऊस तोड न घेणे; हेच हत्यार बनवल्यास कारखानदार तात्काळ निर्णय घेऊन आपली मागणी मान्य करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER