Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

अभियंता दिनी जलशक्ती अभियान-कॅच द रेन व जलसाक्षरता अभियानांतर्गत जाणीव जागृती कार्यक्रम संपन्न

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. 17 : अभियंता दिनी जलशक्ती अभियान-कॅच द रेन व जलसाक्षरता अभियानांतर्गत मेजर अतुल गर्जे सभागृह, सैनिक स्कूल सातारा येथे पाण्याचे जतन करणे नदी नाले, धरणामधील पाण्याचे प्रदुषण रोखणे, पाणी वापर संस्थेचे सक्षमीकरण करणे व जलसंधारण या विषयासंदर्भातील जाणीव जागृती  कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जलसंपदा विभागाच्या सातारा सिंचन मंडळाचे  अधीक्षक अभियंता   संजय डोईफोडे,  उपजिल्हाधिकारी (रोहयो)  विजया यादव,  सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक पवार, धोम कालवे विभाग क्र. 2 चे कार्यकारी अभियंता विकास पाटील,   जिल्हा जलसंधारण अधिकारी अरूणकुमार दिलपाक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी  उपस्थितांना मार्गदर्शन करुन जलसाक्षरता - जलप्रदूषण या विषयी जाणीव जागृतीचे महत्व विषद केले.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष अधीक्षक अभियंता संजय  डोईफोडे   यांनी  जलसाक्षरता, जलप्रदूषण या विषयी तसेच पाणी वापर संस्थांचे महत्व या विषयी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. 

 वाल्मी औरंगाबादचे सेवा निवृत्त व्याख्याते बी.एम.शेटे यांनी पाणी वापर संस्थेची ओळख, स्ंस्थेची स्थापना व दैनंदिन कामकाज यावरील व्याख्यान दिले.पाणी वापर संस्थांची आवश्यकता, फायदे, संस्था स्थापन करणेचे कायदेशीर बंधन व कामकाज इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सहकार कायदा 1960 मधून महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन 2005 कायदयानुसार पाणी वापर संस्थेचे रूपांतरण, रुपांतरणाची गरज, फायदे व कार्यपद्धती, सन 2005 चा महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन  कायदा येणेपूर्वी स्थापन झालेल्या पाणी वापर संस्था सहकार कायदा सन 1960 नुसार स्थापन झालेल्या आहेत परंतू आता त्या पाणी वापर संस्था म.सिं.प.शे.व्य.सन 2005 या कायद्यामधील तरतूदीनुसार  रुपांतरीत करण्याचे आदेश शासनाने दिले असल्याने त्याबाबतची कार्यपध्दती व अशा रुपांतरणाची गरज, फायदे याविषयी मार्गदर्शन केले.

 जलयोध्दा कोल्हापूर उदय गायकवाड यांनी जलप्रदूषण कसे व कोणकोणत्या मार्गानी होते व त्यास आळा घालण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे कसे आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन केले.  त्यांनी कोल्हापूर जिल्हयातील पंचगंगा नदीचे जलप्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या पध्दतीने टप्या-टप्याने काय उपाययोजना राबवल्या त्या बाबतचा आराखडा व केलेल्या उपाययोजनांचे संक्षिप्त सादरीकरण केले.  यावर्षीच्या अनंत चर्तुदशी दिवशी नदी-नाले / तलाव जलाशयामध्ये होणारे निर्माल्य व गणेश विसर्जन पूर्णपणे रोखण्यासाठी जिल्हाभर गट निर्माण करुन सुमारे 3.25 लाख मुर्त्यांची व निर्माल्याची पर्यावरण पूरक दृष्टीने विल्हेवाट लावली असेही सांगितले.

 जलयोध्दा नाशिक अध्यक्ष महात्मा ज्योतिबा  फुले कालवा पाणी वापर संस्था ओझरत् ( मिग ) गोवर्धन कुलकर्णी यांनी पाणी वापर संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे फायदे व त्यांनी त्यांचेकडील पाणीवापर संस्थेने अवलंबलेले कांही मार्ग याबाबत मार्गदर्शन केले. पाणी वापर संस्था क्रियाशील राहणे हे संस्थेस निर्धारित केलेला पाणी कोटा अबाधीत राखणेसाठी कसे गरजेचे आहे. तसेच पाण्याचे काटकसरीने व पूर्ण कार्यक्षमतेने वापर होण्याच्या दृष्टीने कसे गरजेचे आहे ही बाब अधोरेखित केली.   पाणी वापर संस्था शेतीपुरक व्यवसायांचा अवलंब करून पाणी वापर संस्थेची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल बाजारभावाच्या अवस्थेतही कशी उंचाऊ शकते याबाबतही  त्यांनी उदाहरणासह  विशद केले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता अशोक  पवार यांनी केले तर जलयोध्दा जलसाक्षरता समिती, सातारा प्रदीप पाटणकर यांनी आभार प्रदर्शन केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER