Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त

कारखानदारांना आंदोलनाशिवाय दुसरी भाषा कळत नाही

पंजाबराव पाटील : एफआरपी अधिक 600 दर मिळेपर्यंत ठिय्या देणार
टीम : धैर्य टाईम्स
Manufacturers do not understand another language without agitation
ऊसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये दर मिळाला पहिले, या मागणीसाठी आम्ही संघर्ष यात्रा काढून सहकारमंत्र्यांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार होतो. परंतु, प्रशासनाने आमची कोंडी करून रोखून धरले. मात्र, आम्ही कराडमध्ये कुठेही बसलो, तरीही सहकारमंत्र्यांच्या दारातच ठिय्या दिल्यासारखा आहे.

कराड : ऊसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये दर मिळाला पहिले, या मागणीसाठी आम्ही संघर्ष यात्रा काढून सहकारमंत्र्यांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार होतो. परंतु, प्रशासनाने आमची कोंडी करून रोखून धरले. मात्र, आम्ही कराडमध्ये कुठेही बसलो, तरीही सहकारमंत्र्यांच्या दारातच ठिय्या दिल्यासारखा आहे. शेतकऱ्यांना त्यांच्याच हक्काचे पैसे मागण्यासाठी आंदोलने करावी लागत असून कारखानदारांना त्याशिवाय दुसरी भाषा कळत नाही. परंतु, जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला.
बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रविवारी ७ रोजी काढण्यात आलेली संघर्ष यात्रा पोलीस प्रशासनाने दत्त चौकात नाकाबंदी करून रोखून धरली. त्यानंतर आंदोलकांनी येथील प्रशासकीय कार्यालयापुढे ठिय्या दिला. त्यानंतर संघर्ष यात्रेचे सभेत रुपांतर झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष बी.जी. पाटील, प्रदेश युवाध्यक्ष नितीन बागल, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, सांगली जिल्हाध्यक्ष उन्मेश देशमुख, सोलापूर जिल्हाध्यक्ष रामदास खराडे, जयंत गायकवाड, माऊली जवळेकर, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे व शेतकरी उपस्थित होते.
पंजाबराव पाटील म्हणाले, सध्या महागाईचा भडका उडाला आहे. त्याचा सामना करण्यासाठी शेतमालाला योग्य दर मिळाला तरच आपण टिकू शकतो. अन्यथा, शेतकऱ्यांची मोठी आर्थिक वाताहत होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गुलामगिरीतून बाहेर काढले. त्यांनतर इंग्रजी पारतंत्र्यातूनही आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, सध्या आपण राजकीय गुलामगिरीत असून शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, यासाठी आमचा लढा आहे.
ते म्हणाले, साखरेला 2800 रुपये दर असताना शेतकऱ्यांना जो दर मिळत होता, तोच दर आज 3600 रुपये झाला तरीही आपणाला तोच दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक होत असून ती यापुढे खपवून घेणार नाही. यासाठी जोपर्यंत ऊसाला एफआरपी अधिक 600 रुपये दर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथेच ठिय्या देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच कारखानदार जर आपली कोंडी करत असतील तर आपणही ऊस त्यांच्या कारखान्याला न घालता त्यांचीही कोंडी करू. त्यामुळे शेतकऱ्यांनी एफआरपी अधिक 600 रुपये दर मिळाल्याशिवाय ऊसाच्या तोंडी थांबवाव्यात. आपल्या मागणीला नक्कीच यश येईल, असे वचनही पंजाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिले.
प्रदेशाध्यक्ष बी.जी. पाटील म्हणाले, सहकारमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढून मोठे पातक केले आहे. मात्र, त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून आंदोलन मोडून आमच्यावर गुन्हे जरी दाखल केले. तरीही आम्ही मागे हटणार नसून आता आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही थांबणार नसल्याचेही त्यांनी यावेळी बजावले आहे.
दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या येडेमच्छिंद्र या गावातून रविवारी 7 रोजी बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर येडेमच्छिंद्र, शिरटे, नरसिंहपूर, खुबी, कृष्णा कारखाना, रेठरे बुद्रुक, गोंदी, शेरे दुशेरे, शेणोली, वडगाव हवेली, कोडोली, कार्वे, कापिल, गोळेश्वर व कराड असा या यात्रेचा मार्ग होता. ही संघर्ष यात्रा कराड शहरात प्रवेश करण्यापूर्वी पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी बॅरिगेट्स लाऊन आंदोलकांची कोंडी केल्याचे दिसून आले. तसेच आंदोलकांना दत्त चौकातच रोखून धरत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवास्थानी पोहचू दिले नाही. त्यामुळे आंदोलक, शेतकरी चांगलेच संतप्त झाले होते. त्यामुळे त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर येथील प्रशासकीय कार्यालयासमोर त्यांनी ठिय्या देऊन आंदोलनास प्रारंभ केला. त्याचबरोबर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे.

अग्निशमन बंबही तैनात
ऊसाला एफआरपी अधिक 600 रुपये दर मिळावा, या मागणीसाठी बळीराजातर्फे काढण्यात आलेली संघर्ष यात्रा, आंदोलक व शेतकऱ्यांची कोंडी करण्यासाठी प्रशासनाने चांगलाच चंग बांधल्याचे दिसून आले. त्यासाठी शहर व नियोजित संघर्ष यात्रा मार्गावरही मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता. शिवाय, आंदोलकांनी आक्रमक पवित्र घेतल्यास अग्निशमन बंबाच्या सहाय्याने त्यांना रोखण्याची व्युव्हरचनाच पोलीस प्रशासनाने आखली होती. याचीही चर्चा उपस्थितांमध्ये चांगलीच रंगल्याचे दिसून आले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER