Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार

कारखानदारांना आंदोलनाशिवाय दुसरी भाषा कळत नाही

पंजाबराव पाटील : एफआरपी अधिक 600 दर मिळेपर्यंत ठिय्या देणार
टीम : धैर्य टाईम्स
Manufacturers do not understand another language without agitation
ऊसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये दर मिळाला पहिले, या मागणीसाठी आम्ही संघर्ष यात्रा काढून सहकारमंत्र्यांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार होतो. परंतु, प्रशासनाने आमची कोंडी करून रोखून धरले. मात्र, आम्ही कराडमध्ये कुठेही बसलो, तरीही सहकारमंत्र्यांच्या दारातच ठिय्या दिल्यासारखा आहे.

कराड : ऊसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये दर मिळाला पहिले, या मागणीसाठी आम्ही संघर्ष यात्रा काढून सहकारमंत्र्यांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार होतो. परंतु, प्रशासनाने आमची कोंडी करून रोखून धरले. मात्र, आम्ही कराडमध्ये कुठेही बसलो, तरीही सहकारमंत्र्यांच्या दारातच ठिय्या दिल्यासारखा आहे. शेतकऱ्यांना त्यांच्याच हक्काचे पैसे मागण्यासाठी आंदोलने करावी लागत असून कारखानदारांना त्याशिवाय दुसरी भाषा कळत नाही. परंतु, जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला.
बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रविवारी ७ रोजी काढण्यात आलेली संघर्ष यात्रा पोलीस प्रशासनाने दत्त चौकात नाकाबंदी करून रोखून धरली. त्यानंतर आंदोलकांनी येथील प्रशासकीय कार्यालयापुढे ठिय्या दिला. त्यानंतर संघर्ष यात्रेचे सभेत रुपांतर झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष बी.जी. पाटील, प्रदेश युवाध्यक्ष नितीन बागल, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, सांगली जिल्हाध्यक्ष उन्मेश देशमुख, सोलापूर जिल्हाध्यक्ष रामदास खराडे, जयंत गायकवाड, माऊली जवळेकर, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे व शेतकरी उपस्थित होते.
पंजाबराव पाटील म्हणाले, सध्या महागाईचा भडका उडाला आहे. त्याचा सामना करण्यासाठी शेतमालाला योग्य दर मिळाला तरच आपण टिकू शकतो. अन्यथा, शेतकऱ्यांची मोठी आर्थिक वाताहत होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गुलामगिरीतून बाहेर काढले. त्यांनतर इंग्रजी पारतंत्र्यातूनही आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, सध्या आपण राजकीय गुलामगिरीत असून शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, यासाठी आमचा लढा आहे.
ते म्हणाले, साखरेला 2800 रुपये दर असताना शेतकऱ्यांना जो दर मिळत होता, तोच दर आज 3600 रुपये झाला तरीही आपणाला तोच दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक होत असून ती यापुढे खपवून घेणार नाही. यासाठी जोपर्यंत ऊसाला एफआरपी अधिक 600 रुपये दर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथेच ठिय्या देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच कारखानदार जर आपली कोंडी करत असतील तर आपणही ऊस त्यांच्या कारखान्याला न घालता त्यांचीही कोंडी करू. त्यामुळे शेतकऱ्यांनी एफआरपी अधिक 600 रुपये दर मिळाल्याशिवाय ऊसाच्या तोंडी थांबवाव्यात. आपल्या मागणीला नक्कीच यश येईल, असे वचनही पंजाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिले.
प्रदेशाध्यक्ष बी.जी. पाटील म्हणाले, सहकारमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढून मोठे पातक केले आहे. मात्र, त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून आंदोलन मोडून आमच्यावर गुन्हे जरी दाखल केले. तरीही आम्ही मागे हटणार नसून आता आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही थांबणार नसल्याचेही त्यांनी यावेळी बजावले आहे.
दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या येडेमच्छिंद्र या गावातून रविवारी 7 रोजी बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर येडेमच्छिंद्र, शिरटे, नरसिंहपूर, खुबी, कृष्णा कारखाना, रेठरे बुद्रुक, गोंदी, शेरे दुशेरे, शेणोली, वडगाव हवेली, कोडोली, कार्वे, कापिल, गोळेश्वर व कराड असा या यात्रेचा मार्ग होता. ही संघर्ष यात्रा कराड शहरात प्रवेश करण्यापूर्वी पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी बॅरिगेट्स लाऊन आंदोलकांची कोंडी केल्याचे दिसून आले. तसेच आंदोलकांना दत्त चौकातच रोखून धरत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवास्थानी पोहचू दिले नाही. त्यामुळे आंदोलक, शेतकरी चांगलेच संतप्त झाले होते. त्यामुळे त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर येथील प्रशासकीय कार्यालयासमोर त्यांनी ठिय्या देऊन आंदोलनास प्रारंभ केला. त्याचबरोबर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे.

अग्निशमन बंबही तैनात
ऊसाला एफआरपी अधिक 600 रुपये दर मिळावा, या मागणीसाठी बळीराजातर्फे काढण्यात आलेली संघर्ष यात्रा, आंदोलक व शेतकऱ्यांची कोंडी करण्यासाठी प्रशासनाने चांगलाच चंग बांधल्याचे दिसून आले. त्यासाठी शहर व नियोजित संघर्ष यात्रा मार्गावरही मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता. शिवाय, आंदोलकांनी आक्रमक पवित्र घेतल्यास अग्निशमन बंबाच्या सहाय्याने त्यांना रोखण्याची व्युव्हरचनाच पोलीस प्रशासनाने आखली होती. याचीही चर्चा उपस्थितांमध्ये चांगलीच रंगल्याचे दिसून आले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER