Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

कारखानदारांना आंदोलनाशिवाय दुसरी भाषा कळत नाही

पंजाबराव पाटील : एफआरपी अधिक 600 दर मिळेपर्यंत ठिय्या देणार
टीम : धैर्य टाईम्स
Manufacturers do not understand another language without agitation
ऊसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये दर मिळाला पहिले, या मागणीसाठी आम्ही संघर्ष यात्रा काढून सहकारमंत्र्यांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार होतो. परंतु, प्रशासनाने आमची कोंडी करून रोखून धरले. मात्र, आम्ही कराडमध्ये कुठेही बसलो, तरीही सहकारमंत्र्यांच्या दारातच ठिय्या दिल्यासारखा आहे.

कराड : ऊसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये दर मिळाला पहिले, या मागणीसाठी आम्ही संघर्ष यात्रा काढून सहकारमंत्र्यांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार होतो. परंतु, प्रशासनाने आमची कोंडी करून रोखून धरले. मात्र, आम्ही कराडमध्ये कुठेही बसलो, तरीही सहकारमंत्र्यांच्या दारातच ठिय्या दिल्यासारखा आहे. शेतकऱ्यांना त्यांच्याच हक्काचे पैसे मागण्यासाठी आंदोलने करावी लागत असून कारखानदारांना त्याशिवाय दुसरी भाषा कळत नाही. परंतु, जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला.
बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रविवारी ७ रोजी काढण्यात आलेली संघर्ष यात्रा पोलीस प्रशासनाने दत्त चौकात नाकाबंदी करून रोखून धरली. त्यानंतर आंदोलकांनी येथील प्रशासकीय कार्यालयापुढे ठिय्या दिला. त्यानंतर संघर्ष यात्रेचे सभेत रुपांतर झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष बी.जी. पाटील, प्रदेश युवाध्यक्ष नितीन बागल, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, सांगली जिल्हाध्यक्ष उन्मेश देशमुख, सोलापूर जिल्हाध्यक्ष रामदास खराडे, जयंत गायकवाड, माऊली जवळेकर, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे व शेतकरी उपस्थित होते.
पंजाबराव पाटील म्हणाले, सध्या महागाईचा भडका उडाला आहे. त्याचा सामना करण्यासाठी शेतमालाला योग्य दर मिळाला तरच आपण टिकू शकतो. अन्यथा, शेतकऱ्यांची मोठी आर्थिक वाताहत होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गुलामगिरीतून बाहेर काढले. त्यांनतर इंग्रजी पारतंत्र्यातूनही आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, सध्या आपण राजकीय गुलामगिरीत असून शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, यासाठी आमचा लढा आहे.
ते म्हणाले, साखरेला 2800 रुपये दर असताना शेतकऱ्यांना जो दर मिळत होता, तोच दर आज 3600 रुपये झाला तरीही आपणाला तोच दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक होत असून ती यापुढे खपवून घेणार नाही. यासाठी जोपर्यंत ऊसाला एफआरपी अधिक 600 रुपये दर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथेच ठिय्या देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच कारखानदार जर आपली कोंडी करत असतील तर आपणही ऊस त्यांच्या कारखान्याला न घालता त्यांचीही कोंडी करू. त्यामुळे शेतकऱ्यांनी एफआरपी अधिक 600 रुपये दर मिळाल्याशिवाय ऊसाच्या तोंडी थांबवाव्यात. आपल्या मागणीला नक्कीच यश येईल, असे वचनही पंजाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिले.
प्रदेशाध्यक्ष बी.जी. पाटील म्हणाले, सहकारमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढून मोठे पातक केले आहे. मात्र, त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून आंदोलन मोडून आमच्यावर गुन्हे जरी दाखल केले. तरीही आम्ही मागे हटणार नसून आता आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही थांबणार नसल्याचेही त्यांनी यावेळी बजावले आहे.
दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या येडेमच्छिंद्र या गावातून रविवारी 7 रोजी बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर येडेमच्छिंद्र, शिरटे, नरसिंहपूर, खुबी, कृष्णा कारखाना, रेठरे बुद्रुक, गोंदी, शेरे दुशेरे, शेणोली, वडगाव हवेली, कोडोली, कार्वे, कापिल, गोळेश्वर व कराड असा या यात्रेचा मार्ग होता. ही संघर्ष यात्रा कराड शहरात प्रवेश करण्यापूर्वी पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी बॅरिगेट्स लाऊन आंदोलकांची कोंडी केल्याचे दिसून आले. तसेच आंदोलकांना दत्त चौकातच रोखून धरत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवास्थानी पोहचू दिले नाही. त्यामुळे आंदोलक, शेतकरी चांगलेच संतप्त झाले होते. त्यामुळे त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर येथील प्रशासकीय कार्यालयासमोर त्यांनी ठिय्या देऊन आंदोलनास प्रारंभ केला. त्याचबरोबर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे.

अग्निशमन बंबही तैनात
ऊसाला एफआरपी अधिक 600 रुपये दर मिळावा, या मागणीसाठी बळीराजातर्फे काढण्यात आलेली संघर्ष यात्रा, आंदोलक व शेतकऱ्यांची कोंडी करण्यासाठी प्रशासनाने चांगलाच चंग बांधल्याचे दिसून आले. त्यासाठी शहर व नियोजित संघर्ष यात्रा मार्गावरही मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता. शिवाय, आंदोलकांनी आक्रमक पवित्र घेतल्यास अग्निशमन बंबाच्या सहाय्याने त्यांना रोखण्याची व्युव्हरचनाच पोलीस प्रशासनाने आखली होती. याचीही चर्चा उपस्थितांमध्ये चांगलीच रंगल्याचे दिसून आले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER