फलटण प्रतिनिधी -
साखरवाडी जिल्हा परिषदेसाठी उभे असलेले भाजपचे उमेदवार हे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे लाभार्थी होते ते जेव्हा पंचायत समितीला निवडून आले तेव्हा ते आर्थिक अडचणीत आले होते तेव्हा रामराजेसह इतर लोकांनी मदत करीत त्यांना अडचणीतून बाहेर काढले त्याची ओळख विसरून दुसऱ्या गटात गेले ते आमचे होऊ शकले नाहीत ते तुमचे काय होणार?असा प्रहार करीत सागर कांबळे यांच्यावर टीका करीत त्यांचा खरपूस समाचार श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी घेतला.
सातारा जिल्हा परिषद साखरवाडी गटाच्या उमेदवार श्रीमती रुपालीताई लक्ष्मण सरगर व सस्तेवाडी पंचायत समितीचे उमेदवार गणेश तांबे यांच्या प्रचारार्थ चौधरवाडी येथे झालेल्या कोपरा सभेत श्रीमंत संजीवराजे बोलत होते यावेळी फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. रेश्माताई भोसले,श्रीमती रुपालीताई लक्ष्मण सरगर व सस्तेवाडी पंचायत समितीचे उमेदवार गणेश तांबे यांच्यासह चौधरवाडी येथील जेष्ठ व युवानेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या मागे आपली ताकद उभी करायची असून जिल्हा परिषद व पंचायत समितीवर झेंडा फडकवयाचा असून आता आपण शिवसैनिक आहात आता कोण आडवा येईल त्याला आता आडवा करायची ताकद आपल्यात आहे यामुळे अस्थिर राजकारण स्थिर करण्यासाठी तसेच येणारी वाईट प्रवृत्ती रोखण्यासाठी आपल्याला या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी साखरवाडी चा कारखाना पुन्हा उभारला दराची कोंडी दत्त इंडियाने फोडली म्हणून त्यांना फोन यायला लागले व तुम्ही एवढा दर का देताय असे दबाव येत आहेत. विकासाची घडी विस्कटू देऊ नका, आता कोणत्याही संस्था बिघडू देऊ नका ही प्रवृत्ती तालुक्यात वधू देऊ नका,विकासकामात कमी पडनार नाही आम्ही कामांचे बोर्ड लावले असते तर तुम्ही बोर्ड पाहून कंटाळला असता मात्र आता कोट्यावधी च्या गप्पा मारायच्या अन निधी देयाचा लाख रुपये आपण प्रसिद्धी ला कमी पडलो परंतु आता हे मागे पुढे न पाहता जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भगवा फडकवा असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले यावेळी उत्तम चौधरी,हेमंत भोसले, मुकुंद धनवडे,डॉ.रवींद्र घाडगे,यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.










