Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात

टीम : धैर्य टाईम्स
राजकारण करण्यासाठी आम्ही राजकारणात आलो नाही विकास करण्यासाठी आलो आहे. भविष्य कोणाच्या हातात देणार हे ठरवणारी ही जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आहे - सरपंच सागर अभंग

फलटण प्रतिनिधी -


निवडणूकीला इतरांना उभं करता,त्यांच्या जमिनीवर आपल्याच पतसंस्थेचे कर्ज देत बोजा चढवता अन त्यांना देशोधडीला लावता. एवढीच राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही.तुम्ही केलेला सर्व भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. तुम्हाला लवकरच जेलची हवा खावी लागणार आहे. आमच्या उमेदवाराला गावाचा गडी म्हणता हो आम्ही आहोतच जनतेचे गडी तुमच्या सारखे घरगडी नाही. तुमचे राजकारण आता विडणी काय या पंचक्रोशीतील लोकांनी ओळखले आहे. लोकांच्या जमिनी कमी झाल्या मात्र तुमच्या कशा वाढल्या हे आता लोकांच्या लक्षात आले आहे. ही तुमची राजकरानातली शेवटची निवडणूक आहे या निवडणुकीत तुमचा दारुण पराभव होणून तुम्हाला घराच्या बाहेर काय तुमच्या घरात तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही असा घणाघात विडणी चे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर नाव न घेता केला.


विडणी गटाच्या उमेदवार सौ. सुषमा ताई मोरे व विडणी गणाचे उमेदवार सचिन अभंग अध्यक्ष यांच्या प्रचारार्थ विडणी येथील खंडोबा मंदीर परिसरात झालेल्या कोपरा सभेत अभंग बोलत होते यावेळी अनिल शेंडे, अविनाश मोरे, शरद कोल्हे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना सागर अभंग यांनी सांगितले की ही निवडणूक भविष्य कोणाच्या हातात द्यायचं हे ठरवण्याची आहे,आता मतभेद करून चालणार नाही,सरपंच नाही तर त्याच्या मागची फौज महत्वाची असते, खासदार आमदार व मार्गदर्शक असतील चुकीचं काम केले नाही, तीन वर्षात एकही काम चुकीचं केल नाही,दलित वस्तीचा निधी इतरत्र नेला दलित वस्ती काय पाकिस्तानात आहे का?स्ट्रीट लाईट लोकवर्गणी मधून तसेच काय अगदीच खिशातून विकास केला आहे,परंतु विरोधकांनी आपल्या पतसंस्थेचा बोजा टाकायचा व गावातली चांगली लोकांना राजकारणात आणायचं अन त्यांना उध्वस्त करायची यांचा एक कलमी कर्यक्रम असतो कुटुंब देशोधडीला लावने,आत्तापर्यंत दारू मटण देऊन तरुणांना झुलवत ठेवले, महिलांना काय दिले, महाराष्ट्रात पहिली ग्रामपंचायत आहे आम्ही गुढी उभारली, महिलांच्या उपस्थितीत गणपती बसवतो विसर्जन मिरवणूक काढतो, वचनालयातून तीस अधिकारी घडले,बरड वरून असलेली लाईट जात होती त्यासाठी आम्ही कोळकी तुन लाईट आणली आता विडणी येथे स्वतंत्र्य सब स्टेशन होत आहे त्यासाठी जागा खरेदी केली आहे, आत्तापर्यंत विकास का झाला नाही,असा सवाल विरोधकांना विचारीत त्यांच्या कारभाराचा जाहीर पंचनामा केला.


 तुमच्या बरोबर असलेल्या लोकांचा सात बारा कमी झाला ते देशोधडीला लावले, परंतु यांचा सात बारा वाढला, एक कोटी अडतीस लाख रुपये कोणी भ्रष्टाचार केला त्यांना जेलची हवा खावी लागणार आहे त्या शिवाय गप्प बसणार नाही, रुग्णसेवा नाही यांनी धंदा केला, दादांना खरी श्रद्धांजली वाहीची आहे,श्रद्धांजली कार्यक्रमाला यांनी बहिष्कार घातला, ज्यांच्या जिवावर राजकारण केले,ते दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले नाहीत   


राजकारण करण्यासाठी आम्ही राजकारणात आलो नाही विकास करण्यासाठी आलो आहे. भविष्य कोणाच्या हातात देणार हे ठरवणारी ही जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आहे.प्रश्न उत्तरे काय विचारता?विकास केलाय म्हणून मते मागतोय,विडणी आता महाराष्ट्रात वेगळी असेल,तुमच्या मताची किंमत दाखवून दिली आहे तीनच वर्षात,कामाची उदघाट्न करून थकलो,परंतु नागरिकांना मान सन्मान देण आमच कर्तव्य आहे असे सागर अभंग यांनी सांगितले.


अध्यक्ष आपण गडीच आहोत,याची आडवा त्याची जिरवा असे आम्हाला आमच्या नेत्यांनी सांगितले नाही, यांनी समाजात भांडणे लावली, सातारा जिल्ह्यात कार्यालय नसेल असे कार्यालय केले आहे,वाचनालय,सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे,आपल्याकडे इतर गावातील मुले अभ्यासाला येत आहेत, मी मोडेन परंतु वाकणार नाही,विकासाचा रथ पुढे घेऊन चाललोय,जनसंपर्क कार्यालयात सर्व मोफत सुविधा दिल्या आहेत.


तब्बल 400 रेशन कार्डचा विषय मार्गी लावला,ग्रामविकास मंत्री आमचे आहेत,200 कोटी रुपये मिळणार आहेत यामुळे विडणी गटाचा व गणाचा विकास करायचा आहे यांनी आत्तापर्यंत पैसे बरड ला वापरले,परंतु आपल्याला गणाचा अन गटाचा विकास करायचा असेल तर या दोन्ही उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी स्पष्ट केले यावेळी विडणी येथे झालेल्या कोपरा सभेला युवक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 विकासाचा सर्व आलेख कागदोपत्री दाखवत भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष अक्षय अभंग यांनी दुध का दुध पाणी का पाणी केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER