Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

केंद्र सरकारने शेतकऱ्यांबद्दलचे धोरण बदलावे

राज्यमंत्री बच्चू कडू : ठाकरे सरकारचे काम गाडगेबाबांच्या दशसुत्रीप्रमाणे उत्कृष्ठ
टीम : धैर्य टाईम्स
The central government should change its policy towards farmers
केंद्र सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आज संसदेत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. परंतु, फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही. तर धोरणे बदलाने गरजेचे असून जोपर्यत केंद्र सरकार आपले धोरण बदलत नाही; तोपर्यत हे सरकार शेतकऱ्यांचे आहे की नाही, यावर प्रश्नचिन्ह राहणार असल्याचे मत शालेय शिक्षण राज्यमंत्री आ. बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

कराड : केंद्र सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आज संसदेत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. परंतु, फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही. तर धोरणे बदलाने गरजेचे असून जोपर्यत केंद्र सरकार आपले धोरण बदलत नाही; तोपर्यत हे सरकार शेतकऱ्यांचे आहे की नाही, यावर प्रश्नचिन्ह राहणार असल्याचे मत शालेय शिक्षण राज्यमंत्री आ. बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
राज्यमंत्री बच्चू कडू सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असता सोमवारी २९ रोजी येथील शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील प्रहार जनशक्तीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह अपंग, विकलांगांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित बानगुडे, कराड तालुकाध्यक्ष सतीश पाटील, विद्याताई करंडे, रुपेश राठोड, अशोक काळोखे, रंजना बर्गे आदी. उपस्थित होते.
ना. बच्चू कडू म्हणाले, गेल्या दीड-दोन वर्षात कोरोनामुळे झालेल्या उपद्रवाचा राज्य सरकारवर परिणाम झाला आहे. परंतु, या काळातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने गाडगेबाबांच्या ददशसुत्रीप्रमाणे उत्कृष्ठ काम केले आहे. तसेच भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव न वाढल्यास सरकारचे काम आणखी उठून दिसेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले, कोरोना काळात राज्यातील अपंग, विकलांग, शेतमजुरांच्या भेटी घेता आल्या नाहीत. परंतु, यापुढे जास्त जोमाने काम करणार असून दोन महिन्यात विविध ठिकाणी अपंग, विकलांग, शेतमजुर बांधवांसाठी १ दिवसाचा जनता दरबार भरवून त्यांची कामे मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, ना. बच्चू कडू यांच्या हस्ते प्रहार जनशक्ती संघटनेच्या पदाधिकार्यांना संघटनेची नियुक्तीपत्रे देण्यात आली. तसेच काही अपंग, विकलांगांना व्हीलचेअर, गरजेचे साहित्यही देण्यात आले.

हार-तुऱ्यांपेक्षा गरजूंना मदत करा
प्रहार जनशक्ती संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या स्वागतासाठी हार, शाल, श्रीफळ, बुके आणले होते. यावेळी ना. बच्चू कडू यांनी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना माझ्या स्वागतासाठी हे सगळे करण्याची आजीबात गरज नसून शाल, सत्कारापेक्षा या पैशांमधून गरजूंना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. तसेच याप्रसंगी एका कुटुंबाला धान्य कीट देत स्वतःच्या खिशात हात घालून त्यांनी आर्थिक मदतही केली.

अपंगांचे काम करण्यामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाचा आनंद
पाटण तालुक्यातील पूरग्रस्त व भूस्खलनग्रस्त लोकांसह अपंग, विकलांग, गरजूंना मदत केल्याची दखल घेत ना. बच्चू कडू यांनी पाटणचे तहसीलदार योगेश टोम्पे यांचा सत्कार केला. तसेच गावागावात जाऊन अपंगांना मदत करण्यामध्ये आपल्याला पांडुरंगाच्या दर्शनाचा आनंद मिळत असल्याचे सांगून त्यांनी तहसीलदार टोम्पे त्यांच्या कामचे कौतुक केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER