शाश्वत ग्रामविकासाचे प्रमुख घटक पायाभूत सुविधा व ऊर्जा: सौर ऊर्जा/सौर पथदिवे,स्वच्छ रस्ते, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन,आणि शाळेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी ग्रामीण स्वयंरोजगार,लघुउद्योगांना प्रोत्साहन, मोफत आरोग्य व शिक्षण सुविधा,आणि ग्रामसभेद्वारे पारदर्शक नियोजन सागर अभंग यांनी केले आहे.
फलटण प्रतिनिधी -
विडणी गावाचा शाश्वत विकास करीत भविष्यात नगरपंचायत करण्याचा मानस व्यक्त करीत गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अहोरात्र झटणारे नेतृत्व म्हणजे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग परंतु या नेतृत्वाला खच्ची करण्यासाठी तसेच होणारा शाश्वत विकास रोखण्यासाठी नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांनी प्रचंड मायाजाल दाखवित गोरगरिबांचा अक्षरशः लुटलेला पैसा अतोनात बाहेर काढला परंतु इथे उत्तरेश्वराच्या भूमीत न्याय आहे अन्याय नाही शेवटी सचिन अभंग अध्यक्ष यांच्या विजय झाला.त्यामुळे "सत्य परेशान हो सकता है"पराजित नहीं हे या स्वाभिमानी जनतेने दाखवून दिले.
विडणी च्या या स्वयंघोषित नेत्याने आत्तापर्यंत राजकारणात याला गाड त्याला गाड याला लुबाड त्याला लुबाड, याची वस्ती उठव त्याची वस्ती उठव,भावकीत भावाभावात पाहुण्या रावळ्यात भांडणे लावून आपली राजकीय पोळी भाजून घेतली त्यामुळे आता या निवडणुकीत त्या स्वयंघोषित नेत्यांना घरातून बाहेर तोंड दाखवायला सुद्धा लाज वाटली पाहिजे असे लोकांनी केले आहे.सागर अभंग म्हणजे भविष्यातील पिढ्यांच्या गरजा लक्षात घेऊन,पर्यावरणाचे रक्षण करत सध्याच्या आर्थिक,सामाजिक व पायाभूत सुविधांचा समतोल विकास करणे हेच कार्य करीत होते ,यात थेट लाईव ग्रामसभा,त्यात वाढणारा लोकसहभाग, पाणी व्यवस्थापन, स्वच्छता, सौर ऊर्जा, आणि आधुनिकतेचा वापर करून 'आमचा गाव-आमचा विकास' या संकल्पनेतून गाव स्वयंपूर्ण बनवण्यावर भर दिला होता.तरीही केवळ पैशाच्या जोरावर मते मिळविली तरीही विरोधकांचा धक्कादायक पराभव केला.
शाश्वत ग्रामविकासाचे प्रमुख घटक
पायाभूत सुविधा व ऊर्जा: सौर ऊर्जा/सौर पथदिवे,स्वच्छ रस्ते, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन,आणि शाळेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी ग्रामीण स्वयंरोजगार,लघुउद्योगांना प्रोत्साहन, मोफत आरोग्य व शिक्षण सुविधा,आणि ग्रामसभेद्वारे पारदर्शक नियोजन सागर अभंग यांनी केले. वेळोवेळी लोकसहभाग ग्रामविकास आराखड्यात प्रत्येक ग्रामस्थाचा, युवकांचा व महिलांचा सहभाग सुनिश्चित केला.
शाश्वत विकासासाठी गावातील नैसर्गिक संसाधने टिकवून ठेवून,आर्थिक क्षमता वाढवणे आणि सामाजिक समानता प्रस्थापित करणे आवश्यक समजून राजकारण केले मात्र विरोधकांनी केवळ पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकू शकले नाहीत असा घणाघात लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी विरोधकांवर केला.












