स्वातंत्र्य चळवळीत राजकीय भान निर्माण करणारी, अनेक सामाजिक बदलांसाठी आग्रही राहणारी ते आताची 24 बाय 7 पत्रकारिता पेन ते काँप्युटर, खिळे जुळवण्यापासून ते डिजिटल प्रिंटिंग, मुद्रित माध्यमं, टीव्ही चॅनेल्स ते हातातल्या मोबाईलवर वेळोवेळी येणारे अपडेट्स पत्रकारिता बदलत राहिली आहेत.
पौराणिक संदर्भ असे सांगतात की, एखादा चांगला गुण अंगिकार करायचा असेल, तर त्याला 12 वर्षाचा कालावधी लागतो. थोडक्यात ती गोष्ट सतत एकसंध 12 वर्षे करणे जरुरी आहे. तपाचा काळ बारा वर्षांचा मानला आहे. एखादा गुण आग्रहपूर्वक बारा वर्षे आपणात उतरविण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे तप !
बारा वर्षे त्याच गुणाचा पाठपुरावा केलेला असेल, तर मग तो ‘स्वभाव’ बनून जातो. मग प्रयत्न करावा लागत नाही प्रियत्नशैथिल्यात् ! - असे योगसूत्र आहे.) असे झाले म्हणजे तप पूर्ण झाले. ज्या बारा वर्षात मेहनत केली, परिश्रम केले, परंतू ते निरपेक्ष भावनेने लोकहितार्थ केलेले कार्य असेल तरच त्या बारा वर्षाच्या कालावधीला तप म्हणतात. जर आपण स्वतःसाठी बारा वर्ष मेहनत करत असेल त्याला तप म्हणता येणार नाही. तप हे ऋषीच करत असतात हे चुकीचे आहे. एखादा समाजसेवक, शास्त्रज्ञ, राजकारणी किंवा पत्रकार जरी निस्वार्थ भावनेने लोकांसाठी काम करत असेल तरच तप म्हणता येते. त्यामध्ये निश्चित धेय्य हे पूर्ण करायच असतं. आणि धेय्य पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो हे सांगता येत नाही. मेहनतीचे बारा वर्षे एक टप्पा समजण्यासाठी त्याला एक तप म्हणून कालगणना केली जाते. हि एक वेळेची कालगणनाच नसून एक त्यागाची गणना आहे.
स्वातंत्र्य चळवळीत राजकीय भान निर्माण करणारी, अनेक सामाजिक बदलांसाठी आग्रही राहणारी ते आताची 24 बाय 7 पत्रकारिता पेन ते काँप्युटर, खिळे जुळवण्यापासून ते डिजिटल प्रिंटिंग, मुद्रित माध्यमं, टीव्ही चॅनेल्स ते हातातल्या मोबाईलवर वेळोवेळी येणारे अपडेट्स पत्रकारिता बदलत राहिली आहेत.
या बदलांशी स्वतःला जुळवून घेताना माध्यमांना अनेक आव्हानांचाही सामना करावा लागला, आजही लागत आहे. ही आव्हानं नेमकी काय आहेत आणि या आव्हानांना सामोरं जाणार्या मराठी पत्रकारितेचं भविष्य काय आहे हाच खरा आमच्या समोरील प्रश्न आहे.
प्रिंट, टीव्ही किंवा इतर कुठलाही प्लॅटफॉर्म पूर्णपणे संपणार नाही. पण लोकांच्या सवयींमध्ये होत असलेला बदल, म्हणजे प्रस्थापित माध्यमांकडून ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे वळत असल्याने धैर्य टाईम्सनेही नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरली आहे.
मोबाईल टीव्ही हे आता माहितीचं प्रमुख माध्यम असेल आणि व्हीडिओ हा त्याचा महत्त्वाचा भाग असणार आहे. लोकांना आता वाचण्यापेक्षा पाहणं हे जास्त सोपं आणि इंटरेस्टिंग वाटतं. त्यामुळेच व्हीडिओ हे येत्या काळात महत्त्वपूर्ण ठरतील.
सध्याच्या राजकीय परिस्थितीमधील पत्रकारांची भूमिका ही सध्या काळजीचा विषय आहे. सध्या पत्रकारांमध्ये वैचारिक आणि राजकीय पातळीवर विविध गट पहायला मिळतात. पत्रकारिता हा तसा वैचारिक प्रांत असल्याने ते स्वाभाविकच आहे. पण आता त्याला पक्षीय अभिनिवेशही जडला आहे. देशाची लोकशाही आणि सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता या बाबतीतली पत्रकारांची ’भक्तिमय’ मतं हा सर्वांत मोठा धोका ओढवण्याची भितीही कायम आहे.
प्रिंट, रेडिओ, टीव्ही, डिजिटल, अशी अनेक माध्यमं आली, येत राहतील. पण बदलणार नाही तो कन्टेन्ट. कन्टेन्टचा फॉर्म बदलत राहणार आहे. मराठी पत्रकारितेनं नवीन प्रवाह आत्मसात करायला हवेत. नवनवीन माहिती, तिचा वेग आणि दृष्टिकोन आत्मसात करायला हवा. भूमिका घ्यायला हव्यात. सध्या मराठी पत्रकार भूमिका घेण्यात मागे आहेत. जर भूमिका घेतल्या आणि त्या भूमिकांसाठी जी किंमत मोजावी लागते ती मोजायची तयारी ठेवली तरच भविष्यात पत्रकारिता टिकू शकेल. नाहीतर पत्रकारितेचं स्वरूप ’माहिती-मनोरंजन’ या पलीकडे जाणार नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते.











