फलटण | धैर्य टाईम्स |
गेल्या काही दिवसापासून सुरु असणाऱ्या संततधार पावसाने बाणगंगा धरण ९० टक्के भरले आहे. मुसळधार पावसामुळे सांडव्यावरून पाणी वाहू लागल्यानंतर नदीपात्रात व आजूबाजूच्या परिसरात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते तरी नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.त्यांचबरोबर बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा सहाय्यक अभियंता फलटण पाटबंधारे उप विभाग फलटण यांच्या वतीने देण्यात आला आहे.