Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार अजितदादा यांच्या सारखे कणखर नेतृत्व पुन्हा घडणार नाही,शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेत पाठिंबा दिला - आमदार सचिन पाटील अजित दादांच्या अचानक जाण्याने खूप मोठा धक्का,त्यांचे खूप उपकार सातारा जिल्ह्यावर होते - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी वाहिली श्रद्धांजली कोळकी येथील दांपत्य अपघातात ठार कर्तव्य बजावत असताना तरडगावच्या सुपुत्रचा दुर्दैवी मृत्यू अजित पवार हे जनतेचे नेते होते : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर केली पोस्ट - उद्या अंत्यसंस्कार तरडगाव येथे राजेगटाला रामराम करीत शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल : ॲड. सौ.जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला विकासाचा शब्द जयकुमार या नावाचा संस्कृतमध्ये अर्थ तरुण विजयी किंवा विजयाचा तरुण वडजल करांचा भाजपमध्ये प्रवेश, विष्णुपंत लोखंडे व धनंजय साळुंखे पाटील यांना एकमुखी पाठिंबा देत आम्ही विकास पुरुष पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे केले स्पष्ट विडणी प्रमाणे धुळदेव,पिंपरद,माझेरी गावाचा विकास होईल, - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग कोळकी गावचे उद्योजक तथा माजी ग्रामपंचायत सदस्य उमेशशेठ काशिद यांचा राजेगटाला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश राजेगटाला जबर धक्का, दडस वस्ती कुरवली येथील शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल, जयकुमार शिंदे अन् युवराज सस्ते चेअरमन यांची प्रचारात आघाडी हाकेच्या अंतरावर एमआयडिसी होणार असून रोजगाराचा अन पाण्याचा प्रश्न माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सुटला आहे - आमदार सचिन पाटील विरोधकांना त्यांची जागा दाखवा : आमदार सचिन पाटील : मुंजवडी येथील कोपरा सभा आम्ही शरद पवारांच्या छताडावर बसून रेल्वे नेली अन तुम्ही फक्त त्यांची चाटायचं काम केले - श्रीमंत रामराजेंवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बोचरी टीका स्व. माजी आमदार चिमणराव कदम यांनी बांधलेले उपजिल्हा रुग्णालय सुरु होऊ दिले नाही अन त्यांचा पुत्र त्यांच्या वळचनीला गेलाय - झिरपवाडी येथे आमदार सचिन पाटील यांचे टिकास्त्र विडणी गणात सचिन अभंग अध्यक्ष यांची प्रचारात मोठी आघाडी, धुळदेव मध्ये तरुण वर्गाने केला विजयाचा निश्चय शिंदेमाळ गावानेच केला भाजपात प्रवेश, स्मिता गायकवाड यांचा विजय सोपा राजे गटाला कोळकीत जोरदार धक्का; युवा नेते अनुप गायकवाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

दिवाळी अर्थात् दीपोत्सव : डॉ प्रसाद जोशी

टीम : धैर्य टाईम्स

दिवाळी 

अर्थात् दीपोत्सव 


दिवाळी असे दिव्यांचा उत्सव ,

अंधारावर प्रकाशाचा , वाईटावर चांगल्याचा असे हा विजयोत्सव,

नवी उमेद , नवे चैतन्य आणि नवी दिशा मिळे आपल्या सर्वांना, 

एकोपा, प्रेम ,समृद्धी आणि आनंद पसरे दाही दिशांना!!


दिवाळी हा सण सर्वांनाच प्रिय आहे . तो सुरू झाला ते रावणाचा वध करून राम , सीतामाई आणि लक्ष्मण जेव्हा अयोध्येला परतले तेव्हा पासून त्यांच्या आगमनाखातर अयोध्ये मध्ये हा उत्सव साजरा करण्यास प्रारंभ झाला. त्यावेळी सर्व लोकांनी आपापल्या घरात , परसात , मंदिरात आणि जिथे शक्य असतील तिथे मातीचे दिवे आणि पणत्या लावून अग्नी देवतेची पूजा केली आणि हाच दीपोत्सव पुढे वाढत गेला आणि भारतातच न्हवे तर परदेशात जसे की बँकॉक , सिंगापूर, मलेशिया , हाँगकाँग, भूतान, नेपाळ, त्रिनिनाद आणि अजून बऱ्याच ठिकाणी हा सण उत्साहात साजरा होतो.

मिठाई , फराळ आणि गोड पदार्थ करणे आणि ते एकत्र येऊन खाणे यात काही वेगळीच मज्जा असते. शहरात तर सामूहिक कार्यक्रम जसे की दिवाळी पहाट , दिवाळी संध्या , नृत्य कला आणि गायन या सारखे उत्तम दर्जेदार कार्यक्रम  आयोजित केले जातात . 

फटाके उडविण्यास कधी सुरुवात झाली हे निश्चितपणे सांगता येणार नाही पण लहानपणी हे एक महत्त्वाचे आकर्षण जरूर असे.


सध्याची दिवाळी आणि पूर्वीची दिवाळी यात काय फरक झाला आहे ते आता जरा बघुयात.


पूर्वीची दिवाळी ......

छानशी गुलाबी आणि थोडी बोचरी थंडी असायची. 

घरात सगळे नातेवाईक , सगे सोयरे , काका , मामा , दादा ,ताई , आप्पा , आण्णा , तात्या,  मावशी असे सगळे एकत्र यायचे आणि ते ही आवर्जून . 

लहान , मोठे आणि थोर मंडळी एकमेकांशी गप्पा गोष्टी ,विचारांची देवाणघेवाण करीत असतं. 

घराची साफसफाई करून घर नीट नेटके लावणे , सकाळी नरकचतुर्दशी ला अभ्यंग स्नान करून नवीन कपडे घालून गावातल्या मंदिरात जाऊन मग एकत्र जमून दिवाळीचा फराळ करणे यात काही वेगळीच अनुभूती होती.

लहान मुलांना किल्ला करणे , त्याचावर गहू, मोहरी आणि कोथिंबीर पेरून ती उगवून आणणे, मावळे , मावळीणी , सिंह , मारुती या सर्वांना बसवले की मग शिवाजी महाराजांना गडावर वरच्या बाजूला स्थानापन्न करणे असा बाळ गोपळांचा कार्यक्रम असे. 

नवीन कपडे , फटाके , नवीन प्रेरणा , नवीन चैतन्य आणि एक कमालीचा उत्साह घरा घरात दिसत असे . 

हा दिवाळीचा उत्सव ४ ते ५ दिवस चालत असे आणि तो कधी संपूच नये असे वाटे. 


आता काय बदलले आहे .......

आताची दिवाळी ही जास्त तांत्रिक आणि कृत्रिम झाली आहे असे नाही का वाटत .

टेक्नॉलॉजी च्या युगात आणि मोबाईलच्या जगात आपल्या भावना आपण मेसेज द्वारे पाठवतो खरे पण त्यात खऱ्या भावना किती असतात् हे प्रत्येकाने जाणणे गरजेचे आहे . 

अभ्यंगस्नान हे काय असते हे तरुण पिढीला माहीतच नाही . 

उटणे आणि तेल लावणे तर त्यांना किळसवाणे वाटते. 

एकोप्याची आणि सामाजिक बांधिलकीची भावना कुठेतरी लोप पावत चालली आहे . 

एकत्र येऊन कुटुंबासोबत मनमुराद आनंद लुटणे हा प्रकार हळू हळू कमी होत चालला आहे . एकदा का फराळाचे दिवाळी गिफ्ट हांफर आणि शुभेच्छा पाठवल्या की भेटण्याचा प्रश्नच उरत नाही .

एकंदरीत काय तर पूर्वीचा उत्साह , चैतन्य , एकोपा कुठेतरी हरवत चालला आहे असे नक्कीच वाटते .


तर प्रियजन हो, 

अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे" प्रतीक असे आपली दिवाळी,

एकोपा , चैतन्य , परोपकार , आपुलकी आणि जिव्हाळा या गुणांची होऊ देत मांदियाळी,

जरी आपण जगत आहोत कलियुगात विसरू नका पूर्व परंपरेचा सोहळा,

दिवाळीचे सर्व सण करा साजरे मनापासून म्हणजेच तो उत्सव होईल अगळा वेगळा

रमा एकादशीची भक्ती

वसुबारस चे वात्सल्य

धनत्रोदशीची संपत्ती

नरकचतुर्दशी ची शक्ती

लक्ष्मीपूजनाचे वैभव

पाडव्या चे भरभरून प्रेम

भाऊबीजेच्या जिव्हाळ्याने

ही दिवाळी संपन्न होवो.


दिवाळीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा


डॉ प्रसाद जोशी ,डॉ प्राची जोशी, 

जोशी हॉस्पिटल प्रा ली. फलटण.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER