डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या आदर्श राज्यघटनेवर देशाचा कारभार चालतो आहे. आदर्श लोकशाही आदर्श, विचार बाबासाहेबानी दिले आहेत. फलटण येथे लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियमची उभारणी होईल असे आश्वासन मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले. ते आज फलटण येथे राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणा निमित्त अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी आमदार सचिन पाटील, फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनीही अभिवादन करून मानवंदना अर्पण केली.
यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या घटनेमुळे सर्वसामान्य जनतेला जगण्याचा अधिकार मिळाला. शिक्षणासह आदर्श ठेवण्याचं काम बाबासाहेबांनी केले.
फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे राजेशाही संपुष्टात आणून सर्वसामान्य लोकांना राजा बनविण्याचे काम बाबासाहेबांनी केले.
यावेळी जेष्ठ नेते विजयराव येवले यांनी आपले विचार व्यक्त केले.
या वेळी माजी नगरसेवक सनी अहिवळे, सचिन अहिवळे, विजराव येवले, अभिजित नाईक निंबाळकर, सौ. सुपर्णा सनी अहिवळे, सौ. मीना जीवन काकडे, हरिष काकडे, सागर सोरटे, उमेश कांबळे, विशाल अहिवळे, विशाल पाटील, अमोल अहिवळे, निलेश मोरे, प्रवीण कांबळे, किरण अहिवळे, सुनिल अहिवळे, सतीश अहिवळे, श्रीकांत काकडे, जीवन काकडे, सनी मोरे, आप्पा सरगर, जाकीर हाज कुरेशी, सुरज अहिवळे यासह विविध सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.











