Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

सचिन यादव यांना शरद कृषी उद्योजक पुरस्कार जाहीर : खा.शरद पवार यांच्या शुभहस्ते होणार सन्मान

टीम : धैर्य टाईम्स

धैर्य टाईम्स,| विशेष वृत्त,| 

 के बी ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक सचिन बबनराव यादव यांना यंदाचा शरद कृषी उद्योजक पुरस्कार जाहीर झाला असून तो पुरस्कार माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते लोणंद येथील शरद कृषी महोत्सवात रविवार दि.2 फेब्रुवारी रोजी प्रदान होणार असल्याची माहिती के.बी. ग्रुप ऑफ कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर हेमंत खलाटे पाटील यांनी दिली.

मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात शिरवली ता. बारामती येथे २४ डिसेंबर १९७७ रोजी सचिन यादव सर यांचा जन्म झाला. वडिलांचा शेती व्यवसाय असल्यामुळे शेतीशी त्यांची बालपणापासूनच अतूट नाळ जोडली गेली होती. महात्मा गांधी बालक मंदिर, बारामती येथे प्राथमिक, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात महाविद्यालयीन, मालोजीराजे शेती विद्यालय फलटण येथे उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण कृषी कॉलेज, पुणे इथे पूर्ण करत असताना शेतीतून निघणारे तुटपुंज्या उत्पन्नावर शैक्षणिक जीवनाची घडी बसवत असताना कराव्या लागलेल्या कसरतीच्या जखमा वेळोवेळी वेदना आणि भविष्यात कराव्या लागणाऱ्या कार्याची दिशाच जणू स्पष्ट करत होते. तत्पूर्वी महाविद्यालयीन शिक्षण बारामतीला घेत असतानाच बारामतीमधील प्रमुख हटिल व्यावसायिकांना घरचा पशुपालनाचा जोडधंदा असल्यामुळे दुधाचा पुरवठा घरूनच केला जात होता. त्यामुळे व्यवसायाचे बाळकडू कमी वयातच घरातून मिळाले होते. महाविद्यालयीन शिक्षण कृषी कॉलेज, पुणे इथे पूर्ण करत असतानाच भेंडी व बेबीकॉर्न या दोन पिकाशी १९९४-९५ साली पासूनचा निकटचा संपर्क होता. शैक्षणिक टप्पा पार पडल्यानंतर सरांनी कारकिर्दीला सुरुवात केली ती डी. वाय. पाटील ट्रस्ट द्वारे. कृषी विज्ञान केंद्र, कोल्हापूर येथे नेहमीच नवनवीन शिकण्याची ओढ त्यांना कधीच शांत बसू देत नव्हती, यातून अधिकाधिक वाचनही त्यांनी केले त्यामुळे नवनवीन कल्पना व संकल्प यांना एक दिशा भेटत गेली. यात प्रमुख भर पडली ती म्हणजे २००८ साली, के. बी. एक्सपोर्टस इंटरनॅशनलची पायाभरणी फलटण तालुक्यात झाली. याच एक आव्हान म्हणून स्वीकार करत शेतकऱ्यांना अगदीच नवख्या असणाऱ्या एक्स्पोर्ट या विषयी माहिती पोहोचवण्यासाठी घड्याळालाही लाजवेल अशी कामगिरी करत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून अडचणी समजून घेत एक्स्पोर्ट संदर्भात रेसिड्यू फ्रि उत्पादनांची संज्ञा प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये बिंबवत शेतकऱ्यांना जणू भरारीसाठी पंखच दिले. खुर्चीला चिकटून राहण्यापेक्षा प्रत्येक्षात जिथे प्रोसेसिंग चालू असेल त्या ठिकाणी उतरून तिथल्या अडचणी समजून घेऊन त्या ठिकाणची क्षमता वाढविण्यासाठी आधुनिकतेचा प्रयोग करून अजून दुपटीने उत्पादन क्षमता वाढवून कंपनी कामास वेग देणे, एवढेच नव्हे तर अगदी शेतकऱ्यांच्या वा युरोपात जाणाऱ्या माल वाहतूक वाहनांचे चेकिंग स्वतः करणे इत्यादी बारीक गोष्टीवर करडी नजर ठेवून आपले कार्य बजावत असत. हे करत असतांना सरांचा पेन आणि डायरी हा अगदी जिव्हाळ्याचा विषय होता. यातून त्यांच्या तत्परतेचे, बारकाईचे आपसूकच दर्शन घडते. रेसिड्यू फ्री कृषीमालाची निर्यात युरोपियन मार्केटमध्ये अव्वल क्रमांकाने चालू झाली. याच विश्वासाच्या बळावर आज भेंडीसोबतच डाळिंब, बेबीकॉर्न, आंबे, कडीपत्ता, दुधी अशा ताज्या पालेभाज्या व फळे यांची मोठ्या प्रमाणात होत असणारी मागणी व तितक्याच विश्वासाने ते अवघ्या २४ तासात भारतातून एक्स्पोर्ट केले जात आहे. यासोबतच अगदी विदेशी फळ म्हणून ओळखले जाणारे ड्रॅगन फ्रुट देखील निर्यात करत आहेत. युरोपात निर्यात करत असताना घातक रासायनिक कीटकनाशकांचे अंश यामुळे अडथळे निर्माण होतील याची चाहूल लागताच शेतकरी बांधवांच्या हातातोंडाशी आलेला घास वाचवण्यासाठी सचिन यादव सर यांनी विविध तज्ञ शास्त्रज्ञांना सोबत घेऊन विविध वनस्पतीच्या अल्कोलॉइड्स पासून वनस्पतीजन्य जैव कीटकनाशके बनवणाऱ्या के. बी. बायो आरमनिक्स प्रा. लि. कंपनीची स्थापना केली. यामुळे आज शेतकऱ्यांना निरोगी व निर्यातक्षम कृषीमालाचे उत्पादन मिळवण्यासाठी बाजारात एक सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या औषधांच्या वापरामुळे शेतकऱ्यांसोबतच कृषी मालाचा वापर म्हणजेच फळे भाजीपाल्याचे सेवन करणाऱ्या सामान्य नागरिकांना देखील रसायनमुक्त अन्न मिळविणे सोपे झाले आहे. या कंपनीच्या स्थापनेमुळे फलटण, बारामती, पुरंदर, इंदापूर, माण-खटाव, माळशिरस तालुक्यातील तसेच भारतातील इतर राज्यातील हजारो कुशल अकुशल कामगारांच्या हाती काम देण्याच भाग्य यांनी मिळवले. आज जवळपास २००० युवकांना रोजगार पुरवण्याचे कार्य कंपनीच्या माध्यमातून केले जाते. कंपनीने कमी कालावधीत उत्तुंग अशी भरारी घेत भारतातील १४ प्रमुख राज्यांमध्ये कंपनीची सुरुवात करत शेतकऱ्याचे एक विश्वासाचे केंद्रच या राज्यांमध्ये पोहोचल्याचा आनंद शेतकऱ्यांना मनोमन के. बी. बायोच्या माध्यमातून वाटत आहे. अधिक जलद गतीने सेवा प्रदान करता यावी यासाठी इंदोर (मध्यप्रदेश) येथे ऑफिस स्थापनाही करण्यात आली आहे व देशाची राजधानी दिल्ली येथे लवकरच कंपनीच्या नवीन ऑफिसची स्थापना करण्यात येणार आहे. भविष्यावर नजर ठेवत वर्तमान व भविष्यकाळात रसायनमुक्त उत्पादने प्रत्येक भारतीयाच्या ताटात पोहोचावीत यासाठी न्यू एज ॲग्री इनोवेशन प्रायव्हेट लिमिटेड व ग्रीन इरा या दोन कंपनीची कंपनीची स्थापना करत सरांची विचारांची सखोलता अजूनच मनामध्ये स्थान वाढत जाते. त्याचबरोबरच १०० एक्स आयुर्वेदा या फार्मासिटिकल कंपनीची स्थापना करून भविष्यात याही क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे. 

कोरोनासारख्या महामारीमध्ये असंख्य कुटुंबांना घरगुती वापरासाठी आवश्यक असणाऱ्या धान्य, किराणा स्वरूपात किट वाटप सरांच्या मार्गदर्शनातून करण्यात आले. लगोलग कोल्हापूर, सांगली, कोकण भागात आलेल्या महापुरात सुद्धा सचिन यादव यानी कंपनीतर्फे विविध लोकांना मदतीचा हात दिला. एवढेच नव्हे तर कंपनी एक कुटुंब समजून प्रत्येकाच्या अडीअडचणीत सर सर्वप्रथम उभा असतात. जिथे डॉक्टर प्रयत्न सोडतात तिथे सर स्वतःची यंत्रणा कामाला लावून डॉक्टरांच्या मदतीने कर्मचाऱ्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्याची अनेक उदाहरणे आहेत. अवेळी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या जाण्याने होणारी दशा व सरांना भेटून त्यांच्या व्यथा सांगताना दर्यादिल सरांच्या मनाची हळहळ होणे साहजिकच होते. यावर उपाययोजना व आरोग्याच्या संबंधित कोणावरच अशी वेळ या तक्रारच येऊ नये, यासाठी वनस्पतींचा वापर करून बनविलेली कीटकनाशकांचा यशस्वी व क्रांतिकारी प्रयोग झाल्यानंतर लवकर आयुर्वेदाच्या धर्तीवर वनस्पतींचा वापर करून मानवी जीवनातील दुर्धर आजार व रोगांवर उपचार करण्यासाठी १०० एक्स आयुर्वेदा प्रा. लि. या नवीन कंपनीची सुरुवात त्यांनी केली आहे . असा हा त्यांचा तेजोमय प्रवास दिवसेंदिवस अधिक वेगाने संबंध शेतकरी, मानव जातीच्या सेवेसाठी भारताबरोबर संपूर्ण जगात पोहोचवण्यासाठी अधिक वेगाने सक्रियपणे प्रयत्नशील राहणार आहे.


Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER