फलटण (प्रतिनिधी) — फलटण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची जोरदार चर्चा सुरू आहे. नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि तरुणवर्ग या सर्व घटकांकडून त्यांच्या नेतृत्वाला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, “फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी दादांचे नेतृत्व आवश्यक आहे,” असे मत सर्वत्र उमटताना दिसत आहे.
गेल्या काही वर्षांपासून समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते म्हणून केलेले काम उल्लेखनीय ठरले आहे. नागरिकांशी थेट संवाद साधण्याची त्यांची कार्यशैली, समस्यांवर झटपट निर्णय घेण्याची वृत्ती यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी आपलेपणा निर्माण झाला आहे.
प्रचार सुरु होण्यापूर्वीच दादांच्या वैयक्तिक भेटीगाठींना मोठा प्रतिसाद मिळत असून नागरिकांची उत्स्फूर्तपणे त्यांना पाठिंबा दिला आहे. विशेषतः युवक आणि महिला मतदारांकडून त्यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे.
शहराच्या विकासासाठी स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन, दर्जेदार रस्ते, व्यापाऱ्यांसाठी सुखसुविधा, प्रलंबित प्रकल्पांना पूर्णत्व, तसेच नव्या विकास योजनांची अंमलबजावणी ही आपली मुख्य प्राधान्ये असल्याचे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
दरम्यान, विरोधकांच्या प्रचाराला अजून गती मिळालेली नसतानाच समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराची लाट शहरभर पसरू लागली आहे. येत्या काही दिवसांत त्यांच्या प्रचाराचा जोर आणखी वाढणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असून, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दादांची उमेदवारी प्रभावी ठरणार, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.











