Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त

शिक्षण क्षेत्रातील तारा - सुभाषराव सूर्यवंशी (बेडके)

टीम : धैर्य टाईम्स

समाजाच्या सर्व क्षेत्रात विशेष करून शिक्षण क्षेत्रात सातत्याने अलौकिक कार्य केलेल्या सुभाषकाकांना आपल्यातून जाऊन आज एक वर्षे झाले आहे. लौकिक अर्थाने ते आपल्यातून गेले असले तरी त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामुळे ते अनंत काळापर्यंत आपल्या सोबत राहणार आहेत. काकांच्या पश्चात त्यांच्या सुविद्य पत्नी सविता काकींनी श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदाचा भार स्वीकारुन एक प्रकारे काकांना व त्यांनी केलेल्या असामान्य कार्याला भावपूर्ण श्रध्दांजलीच वाहिली आहे.

आज काकांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या बद्दलच्या अनंत आठवणींनी मनात गदीं केली आहे. गेली चार पाच दशके त्यांच्या सहवासात राहिल्याने त्यांच्या अंतर्यामाशी व कार्यपध्दतीशी मी थोडा फार परिचीत झालो आहे. आज त्यांच्या स्मृतिला मनःपूर्वक अभिवादन करुन त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा जनमानसाला परिचय करुन देण्याचा प्रयत्न करीत आहे.

पन्नास - साठ वर्षापूर्वी फलटण तालुक्यात शिक्षणाचा विस्तार म्हणावा तसा झाला नव्हता. बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता. शिक्षणापासून वंचित असलेल्या या घटकाला शैक्षणिक दृष्ट्या सक्षम आणि साक्षर करण्याच्या ध्येयाने के. कर्मवीर भाऊराव पाटील आण्णांच्या प्रेरणेने आणि कै. यशवंतराव चव्हाण यांच्या आशीर्वादाने सुभाषकाकांच्या वडिलांनी कै. नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) तथा नानांनी त्या खडतर काळात आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने श्रीराम एज्युकेशन संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्याकाळी बहुजन समाजासाठी शाळा काढणे म्हणजे एक धाडसच होते.

कै. नानांनी काढलेल्या शाळांचा विस्तार करणे, इमारती, क्रिडांगणे उभी करणे या गोष्टी महाकठीण होत्या. अशा या बिकट परिस्थितीत विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होऊन त्यांनी ही जबाबदारी पार पाडण्याचे ठरविले आणि अगदी कालपर्यंत त्यांनी या ध्येयाचा पाठपुरावा करुन ते तडीस नेहले आहे.

त्यांच्या या अफाट कार्यामुळे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा एक अविभाज्य भाग म्हणजे सुभाषकाका असे समीकरण झाले आहे. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यास सुरवात केली त्यावेळी समाजातील तळा गळात त्यासाठी फारशा शैक्षणिक सुविधा उपलब्ध नव्हत्या. अशा या दुर्लक्षीत समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून त्यांनी आपल्या संस्थेच्या सर्व शाखांचा सर्वार्थाने विस्तार केला. कोणाचे ही आर्थिक पाठबळ नसताना पण सामान्यांच्या जनाधारावर त्यांनी हे कार्य यशस्वीरित्या पार पाडले.

कै. नानांनी उभारलेल्या या संस्थेची संख्यात्मक व गुणात्मक याढ त्यांनी केली. शिक्षणाने समाजात परिवर्तन होते, माणूस विचारशील बनतो, त्यामुळे शिक्षणाला पर्याय नाही या विचारावर ते ठाम होते. शिक्षणासह मूल्यविचारांबाबत त्यांनी कधीच तडजोड केली नाही. त्यामुळे संस्थेच्या सर्व शाखा आजही बदलत्या काळाबरोबर नेहमीच प्रगतशील आणि ज्ञानाबद्दल अद्ययावत राहिल्या आहेत. शाळांच्या इमारती, विद्यार्थ्यांच्या प्राथमिक गरजा, नविन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यासाठी कोणाचेही आर्थिक पाठबळ नसल्याने त्यांनी स्वतःची वैयक्तिक मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवली होती, त्यागाची परिसिमा या पेक्षा आणखी काय असू शकते.

सातारा जिल्ह्याच्या नकाशावर शिक्षण क्षेत्रात श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते याचे श्रेय निर्विवाद काकांकडे जाते. शिक्षण क्षेत्रात शिक्षक व विद्यार्थी हे दोन घटक अत्यंत महत्वाचे असल्याने विद्यार्थ्यांबद्दल त्यांना अत्यंतिक जिव्हाळा व अभिमान होता तर शिक्षकांबद्दल आपुलकी प्रेम व अपेक्षाही होत्या. शिक्षकांना त्यांनी ध्येयवादाचा मार्ग दाखवला आणि हाच ध्येयवाद शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजविला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती. दुसऱ्यांना सतत प्रोत्साहन देणे, त्यांना उद्यमशील बनविणे हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्टे होते.

विद्यार्थी हा देशाचा एक चांगला सुसंस्कारित नागरिक झाला पाहिजे हा विचार त्यांनी आपल्या संस्थेच्या सर्व शिक्षक वर्गात, सेवकांत रुजविला आहे. शिक्षण क्षेत्रातील एक मानदंड, आधुनिक विचारांचा पुरस्कर्ता, नवीन शैक्षणिक धोरणाचा पाठीराखा, एक सच्चा समाजसेवक म्हणून लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. संस्थेतील त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल त्यांच्या मनी आदराची भावना आहे. प्रत्येक विषयाच्या खोलवर जाऊन त्या विषयाचा मागोवा घेण्याच्या त्यांच्या चौकस स्वभावामुळे समाजाच्या सर्व क्षेत्रात त्यांचा मित्रवर्ग विखुरलेला आहे.

स्वतःच्या कुटूंबावद्दल ते अत्यंत भावूक आहेत कै. नानांनी लावलेल्या शिक्षणरुपी रोपटयाचे, अनंत अडचणीवर मात करीत त्यांनी विशाल वृक्षात रुपांतर केले आहे. तर त्यांच्या दोन्ही मुलांनी या विशाल वृक्षाचे वटवृक्षात रुपांतर केले आहे. थोरले चिरंजीव श्री.डॉ. सचिन यांनी आपले आजोबा कै. नाना व वडील कै. सुभाषकाका यांच्या प्रमाणे स्वतःचे जीवन शिक्षणासाठी वाहून घेतले आहे, या त्यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी सौ. ज्योतीताई यांचाही हातभार आहे. धाकटे चिरंजीव श्री. महेंद्र यांनी शिक्षणाबरोबर राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवेची पताका हाती घेतली आहे.

श्री. सचिन यांच्या कार्याचा आवाका पाहून एका मान्यवर संस्थेने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना पी. एचडी ही पदवी प्रदान केली आहे. तर चालू वीं संस्थेच्या कार्याचा विस्तार आणि प्रगती पाहून महाराष्ट्र शासनाने संस्थेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन संस्थेच्या कार्याचा गौरव केला आहे. तर महेंद्र यांना विभागीय च राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेस पक्षात जबाबदारीची पदे मिळाली आहेत. काँग्रेस पक्षाचे एक रचनात्मक कार्य करणारे, उत्कृष्ट संघटक, क्रियाशील खंदे नेते म्हणून ते पक्षात प्रसिध्द शाळांनी आयुष्यभर जे शशैक्षणिक कार्य केले त्यात त्यांच्या पत्नी सविता काकी सर्व काळ त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काकांना जे उत्तुंग यश मिळाले, वेळोवेळी जो मानसन्मान मिळाला त्या यशात काकींचा सिंहाचा वाटा आहे.

सर्व नातंर्वधनात नाजूक आणि हळवे नाते म्हणजे नातवंडे आणि काकाही आपल्या दोन्ही लाडक्या नातवंडा बाल हळवे होते. अशा या दूरदशी व बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या काकांचे शैक्षणिक कार्य आपणा सर्वासाठी प्रेरणादायी आहे. आज त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या कार्याचा पाठपुरावा करणे हीच त्यांना खरी आदरांजली होईल. त्यांच्या स्मृतिला विनम्र अभिवादन.


 सतीश मोरेश्वर पटवर्धन, 
 सेवानिवृत्त मुख्याध्यापक, यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER