फलटण, प्रतिनिधी : जाधववाडी ग्रामपंचायतीने गावातील प्रत्येक घरी एक फळरोप मोफत देवून ते लावणे व जोपासण्या- बाबत केलेली कार्यवाही कौतुकास्पद असून इतर ग्रामपंचायतींनी त्याचे अनुकरण करावे, असे आवाहन करतानाच वृक्ष लागवड काळाची गरज असल्याचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी सांगितले. कृषिदिनाचे औचित्य साधून जाधववाडी (फ) ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा शुभारंभ आणि गावातील प्रत्येक कुटुंबाला एक फळझाडाचे रोप देण्याच्या योजनेचा शुभारंभ केला. त्यानंतर मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन बोलत होत्या.
यावेळी सातारा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग श्रीमती क्रांती बोराटे, फलटण पंचायत समिती प्रशासक व गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, पंचायत समिती, फलटण विस्तार अधिकारी कृषी अप्पासाहेब गौंड व चितळकर, सरपंच श्रीमती सीमा गायकवाड, उपसरपंच राहुल लक्ष्मण शिंदे, ग्रामविकास अधिकारी विजयराव निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. सारिका चव्हाण, सचिन मदने, दीपक सपकाळ, सौ. रेखा नाळे, सौ. सोनाली पवार, सौ. नयन जगदाळे, सौ. स्वाती जाधव, सौ. मंगल, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून त्याद्वारे पर्यावरणाचा समतोल सांभाळण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा याशनी नागराजन यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांचा १०० टक्के सहभाग नोंदणीसाठी सर्व यंत्रणांनी कालमर्यादेमध्ये काम करावे असे आवाहन करताना जाधववाडी (फ) ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून ग्रामपंचायतीने आजअखेर स्मार्ट ग्राम योजना, राष्ट्रसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, माझी वसुंधरा योजना यामध्ये अत्यंत चांगले काम करून बक्षीस मिळवले असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यापुढेही अशाच चांगल्या कामासाठी सातत्य याशनी नागराजन, अधिकारी यांच्यासमवेत जाधववाडी (फ) ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व सदस्य.राखण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीस शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी सरपंच श्रीमती सीमा गायकवाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन व अन्य अधिकाऱ्यांचे स्वागत केले.
ग्रामविकास अधिकारी विजयराव निंबाळकर यांनी प्रास्ताविकात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ग्रामपंचायतीने गावात जास्तीत जास्त वृक्ष लागवड होण्यासाठी ग्रामस्थांना प्रवृत्त करणेच्या उद्देशाने ग्रामपंचायतीने प्रत्येक घरमालकास एक फळांचे रोप मोफत देण्याचे मासिक सभेत ठरले असल्याचे तसेच ग्रामपंचायत सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करणार असल्याचे निदर्शनास आणून दिले.











