फलटण प्रतिनिधी :
भारतीय संविधान दिनाच्या औचित्याने फलटण शहरात संविधान निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी फलटण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, नगरपरिषद निवडणुकीचे भाजपा - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी उपस्थित राहून संविधान आणि लोकशाही मूल्यांचे महत्व अधोरेखित केले.
यावेळी आमदार सचिन पाटील म्हणाले, श्रद्धा आणि विश्वास देण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. या देशातील सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केल्याचे पाटील यांनी नमूद केले. देशातील सर्व जात धर्म पाळत गुण्यागोविंदाने एकत्र काम करीत आहेत हेच खरे माझ्या दृष्टीने महत्वाचे काम असल्याचे आमदार सचिन पाटील म्हणाले.
यावेळी बोलताना समशेरसिंह म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून ज्यावेळी हे संविधान अस्तित्वात आले त्यावेळी इंग्रज राजवट व राजेशाही करून सर्वसामान्यांचा भारत देश बनवण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.
“भारतीय संविधान हे केवळ एक कायदापुस्तक नाही, तर समानता, स्वाभिमान, न्याय आणि प्रगतीचा पाया आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्व घटकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम केले. त्यांच्यामुळे आज प्रत्येक भारतीय उंच मानेने लोकशाहीचा लाभ घेत आहे.”
यावेळी माजी जेष्ठ नगरसेवक सुदाम मांढरे, सनी अहिवळे, नगरसेवक पदाचे उमेदवार सौ. सुपर्णा सनी अहिवळे, सचिन अहिवळे, सौ.मीना जीवन काकडे, सुलक्षण जितेंद्र सरगर, हरिष काकडे, जितेंद्र सरगर, तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, युवा वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधानाचे प्रास्ताविक वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
फलटणमध्ये संविधान दिन सन्मानाने आणि एकतेच्या संदेशासह साजरा झाल्याने सामाजिक, राजकीय आणि युवकांमध्ये उर्जा निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.











