Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त

देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या काळजावर वार केला - मनोज जरांगे पाटील

मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईमध्ये दाखल होणार
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी -


 पश्चिम महाराष्ट्राचा आपण दौरा केला असून मुंबईमध्ये 29 ऑगस्टला मोठ्या प्रमाणावर मराठा समाज येणार आहे. मराठा आरक्षणासाठी आता एक घर एक गाडी असा नारा दिला असून मराठ्यांनी आता घरात बसू नये. अस्तित्व संपल्यानंतर पुन्हा येणार नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या काळजावर वार केला असून सर्व मराठ्यांना ताकतीन उभे राहावे असे आवाहन संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केले. २९ ऑगस्ट रोजी चलो मुंबईचा नारा दिला असून त्या पार्श्वभूमीवर अखंड मराठा समाजाच्या तयारीच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठीत फलटण येथे आले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. 


मराठा शांततेमध्ये मुंबईला जातो शांततेत लढतो, मागणी करतो याचा गैरफायदा आता सरकार घ्यायला लागले आहे तर आपल्या अंगावर लोक सोडण्याच काम देवेंद्र फडणवीस करू लागले आहेत त्यामुळे मुंबईला ताकतीने उभे राहणे गरजेचे असल्याचे असे जरांगे पाटील म्हणाले. ही आता अंतिम लढाई असून समाज हारता कामा नये असे जरांगे पाटील म्हणाले. हसू होईल असे एकाही मराठ्याने वागू नये. राजकारण पायाखाली तुडवावे पण लेकरं मोठं करण्यासाठी मराठ्यांनी रस्त्यावर येणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. 



 देवेंद्र फडवणीस यांचा मराठा ओबीसी दंगली लावण्याचे स्वप्न असल्याचा आरोप यावेळी जरांगे पाटील यांनी केला परंतु मराठा ओबीसी वाद होणार नाहीत असे सांगतानाच ओबीसी साठी देवेंद्र फडणीस यांनी काय केले असा सवाल उपस्थित करतानाच भांडणे लावण्या पलीकडे काय केले असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यामुळे आता मराठा समाजाने पाठीमागे उभे राहावे मी तुमच्या लेकरा बाळांसाठी दिवस-रात्र राबतोय त्यांनी दंगली लावण्याचे तयारी सुरू केले आहे त्यामुळे मराठ्यांनी बेसावध राहू नये, मराठ्यांनी ओबीसींच्या अंगावर जाऊ नये त्यांच त्यांचा स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका असे आवाहन यावेळी जरांगे पाटील यांनी केले.


 देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजाला आरक्षण देतो म्हणत आहेत परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी बोलत नाहीत या प्रश्नावर उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, हे चांगले झाले असून यामुळे सरकारमध्ये असणाऱ्या मराठ्यांचे डोळे उघडतील, त्याच्या पोटातील आता ओठावर आले असून नियतीला हे मान्य नसून त्याच्या पोटातील बाहेर आले ते खूप चांगले झाले. त्यामुळे तुम्हाला निवडून आणायला सत्तेत बसवायला ठेका घेतला आहे का? मराठ्यांची लोक तुम्हाला सत्तेत आणण्यासाठी रात्रंदिवस पळत होती. केवळ ओबीसीसाठी लढणार व मराठा आरक्षणासाठी लढणार नाही असे देवेंद्र फडणवीस बोलत आहेत हे योग्य नसून धनगर समाजाला आरक्षण दिले का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. धनगर - मराठा वेगळे केले मुस्लिम - दलित वेगळे केले असून किती फसवणूक करणार आहात असे जरांगे म्हणाले. 


देवेंद्र फडणवीस यांनी गोव्याला ओबीसीच्या आरक्षणाविषयी मीटिंग घेऊन ओबीसी - मराठा समाजामध्ये दंगल लावणार असल्याचा आरोप यावेळी जरांगे यांनी केला. तर देवेंद्र फडणवीस यांनी कितीही प्रयत्न केले तरी मराठा व ओबीसी मध्ये दंगल होणार नाही असा विश्वास यावेळी जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. तुम्ही सत्तेवर येण्यासाठी कधी मराठा, धनगर, मुस्लिम, दलित यांना हाताशी धरले जात आहे. परंतु जर राज्यात ओबीसी मराठा दंगल झाली तर याला जबाबदारी तेव्हा देवेंद्र फडणवीस असतील असे विधान जरांगे पाटील यांनी काढले. 


 देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने मराठा समाजाचा जागा झाला असून मुलांना आत्महत्या करायची वेळ देऊ नका जागे व्हा असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.


धनंजय मुंडे यांना अजितदादा व मुख्यमंत्री मंत्रिपद देणार नाहीत असे एका प्रश्नाला उत्तर देताना जरांगे म्हणाले. स्वतःच्या भाऊजयला न्याय देता येत नाही तर संतोष भैयाचा मर्डर त्यांच्याच लोकांनी केला असल्याचे जरांगे म्हणाले. तर ते चाळीस कॉल कुणाचे आहेत असा सवाल यावेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

 मराठ्यांचे आरक्षण ओबीसी मधून घेणार असून आरक्षण कसे मिळत नाही असे जाहीर आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिले. तर राज्यातील सर्वच मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे असे वाटत असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना शेवटी मनोज जरांगे पाटील म्हणाले. 


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER