Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या काळजावर वार केला - मनोज जरांगे पाटील

मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईमध्ये दाखल होणार
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी -


 पश्चिम महाराष्ट्राचा आपण दौरा केला असून मुंबईमध्ये 29 ऑगस्टला मोठ्या प्रमाणावर मराठा समाज येणार आहे. मराठा आरक्षणासाठी आता एक घर एक गाडी असा नारा दिला असून मराठ्यांनी आता घरात बसू नये. अस्तित्व संपल्यानंतर पुन्हा येणार नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या काळजावर वार केला असून सर्व मराठ्यांना ताकतीन उभे राहावे असे आवाहन संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केले. २९ ऑगस्ट रोजी चलो मुंबईचा नारा दिला असून त्या पार्श्वभूमीवर अखंड मराठा समाजाच्या तयारीच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठीत फलटण येथे आले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. 


मराठा शांततेमध्ये मुंबईला जातो शांततेत लढतो, मागणी करतो याचा गैरफायदा आता सरकार घ्यायला लागले आहे तर आपल्या अंगावर लोक सोडण्याच काम देवेंद्र फडणवीस करू लागले आहेत त्यामुळे मुंबईला ताकतीने उभे राहणे गरजेचे असल्याचे असे जरांगे पाटील म्हणाले. ही आता अंतिम लढाई असून समाज हारता कामा नये असे जरांगे पाटील म्हणाले. हसू होईल असे एकाही मराठ्याने वागू नये. राजकारण पायाखाली तुडवावे पण लेकरं मोठं करण्यासाठी मराठ्यांनी रस्त्यावर येणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. 



 देवेंद्र फडवणीस यांचा मराठा ओबीसी दंगली लावण्याचे स्वप्न असल्याचा आरोप यावेळी जरांगे पाटील यांनी केला परंतु मराठा ओबीसी वाद होणार नाहीत असे सांगतानाच ओबीसी साठी देवेंद्र फडणीस यांनी काय केले असा सवाल उपस्थित करतानाच भांडणे लावण्या पलीकडे काय केले असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यामुळे आता मराठा समाजाने पाठीमागे उभे राहावे मी तुमच्या लेकरा बाळांसाठी दिवस-रात्र राबतोय त्यांनी दंगली लावण्याचे तयारी सुरू केले आहे त्यामुळे मराठ्यांनी बेसावध राहू नये, मराठ्यांनी ओबीसींच्या अंगावर जाऊ नये त्यांच त्यांचा स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका असे आवाहन यावेळी जरांगे पाटील यांनी केले.


 देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजाला आरक्षण देतो म्हणत आहेत परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी बोलत नाहीत या प्रश्नावर उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, हे चांगले झाले असून यामुळे सरकारमध्ये असणाऱ्या मराठ्यांचे डोळे उघडतील, त्याच्या पोटातील आता ओठावर आले असून नियतीला हे मान्य नसून त्याच्या पोटातील बाहेर आले ते खूप चांगले झाले. त्यामुळे तुम्हाला निवडून आणायला सत्तेत बसवायला ठेका घेतला आहे का? मराठ्यांची लोक तुम्हाला सत्तेत आणण्यासाठी रात्रंदिवस पळत होती. केवळ ओबीसीसाठी लढणार व मराठा आरक्षणासाठी लढणार नाही असे देवेंद्र फडणवीस बोलत आहेत हे योग्य नसून धनगर समाजाला आरक्षण दिले का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. धनगर - मराठा वेगळे केले मुस्लिम - दलित वेगळे केले असून किती फसवणूक करणार आहात असे जरांगे म्हणाले. 


देवेंद्र फडणवीस यांनी गोव्याला ओबीसीच्या आरक्षणाविषयी मीटिंग घेऊन ओबीसी - मराठा समाजामध्ये दंगल लावणार असल्याचा आरोप यावेळी जरांगे यांनी केला. तर देवेंद्र फडणवीस यांनी कितीही प्रयत्न केले तरी मराठा व ओबीसी मध्ये दंगल होणार नाही असा विश्वास यावेळी जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. तुम्ही सत्तेवर येण्यासाठी कधी मराठा, धनगर, मुस्लिम, दलित यांना हाताशी धरले जात आहे. परंतु जर राज्यात ओबीसी मराठा दंगल झाली तर याला जबाबदारी तेव्हा देवेंद्र फडणवीस असतील असे विधान जरांगे पाटील यांनी काढले. 


 देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने मराठा समाजाचा जागा झाला असून मुलांना आत्महत्या करायची वेळ देऊ नका जागे व्हा असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.


धनंजय मुंडे यांना अजितदादा व मुख्यमंत्री मंत्रिपद देणार नाहीत असे एका प्रश्नाला उत्तर देताना जरांगे म्हणाले. स्वतःच्या भाऊजयला न्याय देता येत नाही तर संतोष भैयाचा मर्डर त्यांच्याच लोकांनी केला असल्याचे जरांगे म्हणाले. तर ते चाळीस कॉल कुणाचे आहेत असा सवाल यावेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

 मराठ्यांचे आरक्षण ओबीसी मधून घेणार असून आरक्षण कसे मिळत नाही असे जाहीर आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिले. तर राज्यातील सर्वच मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे असे वाटत असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना शेवटी मनोज जरांगे पाटील म्हणाले. 


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER