Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात

देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या काळजावर वार केला - मनोज जरांगे पाटील

मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईमध्ये दाखल होणार
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी -


 पश्चिम महाराष्ट्राचा आपण दौरा केला असून मुंबईमध्ये 29 ऑगस्टला मोठ्या प्रमाणावर मराठा समाज येणार आहे. मराठा आरक्षणासाठी आता एक घर एक गाडी असा नारा दिला असून मराठ्यांनी आता घरात बसू नये. अस्तित्व संपल्यानंतर पुन्हा येणार नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या काळजावर वार केला असून सर्व मराठ्यांना ताकतीन उभे राहावे असे आवाहन संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केले. २९ ऑगस्ट रोजी चलो मुंबईचा नारा दिला असून त्या पार्श्वभूमीवर अखंड मराठा समाजाच्या तयारीच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठीत फलटण येथे आले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. 


मराठा शांततेमध्ये मुंबईला जातो शांततेत लढतो, मागणी करतो याचा गैरफायदा आता सरकार घ्यायला लागले आहे तर आपल्या अंगावर लोक सोडण्याच काम देवेंद्र फडणवीस करू लागले आहेत त्यामुळे मुंबईला ताकतीने उभे राहणे गरजेचे असल्याचे असे जरांगे पाटील म्हणाले. ही आता अंतिम लढाई असून समाज हारता कामा नये असे जरांगे पाटील म्हणाले. हसू होईल असे एकाही मराठ्याने वागू नये. राजकारण पायाखाली तुडवावे पण लेकरं मोठं करण्यासाठी मराठ्यांनी रस्त्यावर येणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. 



 देवेंद्र फडवणीस यांचा मराठा ओबीसी दंगली लावण्याचे स्वप्न असल्याचा आरोप यावेळी जरांगे पाटील यांनी केला परंतु मराठा ओबीसी वाद होणार नाहीत असे सांगतानाच ओबीसी साठी देवेंद्र फडणीस यांनी काय केले असा सवाल उपस्थित करतानाच भांडणे लावण्या पलीकडे काय केले असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यामुळे आता मराठा समाजाने पाठीमागे उभे राहावे मी तुमच्या लेकरा बाळांसाठी दिवस-रात्र राबतोय त्यांनी दंगली लावण्याचे तयारी सुरू केले आहे त्यामुळे मराठ्यांनी बेसावध राहू नये, मराठ्यांनी ओबीसींच्या अंगावर जाऊ नये त्यांच त्यांचा स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका असे आवाहन यावेळी जरांगे पाटील यांनी केले.


 देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजाला आरक्षण देतो म्हणत आहेत परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी बोलत नाहीत या प्रश्नावर उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, हे चांगले झाले असून यामुळे सरकारमध्ये असणाऱ्या मराठ्यांचे डोळे उघडतील, त्याच्या पोटातील आता ओठावर आले असून नियतीला हे मान्य नसून त्याच्या पोटातील बाहेर आले ते खूप चांगले झाले. त्यामुळे तुम्हाला निवडून आणायला सत्तेत बसवायला ठेका घेतला आहे का? मराठ्यांची लोक तुम्हाला सत्तेत आणण्यासाठी रात्रंदिवस पळत होती. केवळ ओबीसीसाठी लढणार व मराठा आरक्षणासाठी लढणार नाही असे देवेंद्र फडणवीस बोलत आहेत हे योग्य नसून धनगर समाजाला आरक्षण दिले का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. धनगर - मराठा वेगळे केले मुस्लिम - दलित वेगळे केले असून किती फसवणूक करणार आहात असे जरांगे म्हणाले. 


देवेंद्र फडणवीस यांनी गोव्याला ओबीसीच्या आरक्षणाविषयी मीटिंग घेऊन ओबीसी - मराठा समाजामध्ये दंगल लावणार असल्याचा आरोप यावेळी जरांगे यांनी केला. तर देवेंद्र फडणवीस यांनी कितीही प्रयत्न केले तरी मराठा व ओबीसी मध्ये दंगल होणार नाही असा विश्वास यावेळी जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. तुम्ही सत्तेवर येण्यासाठी कधी मराठा, धनगर, मुस्लिम, दलित यांना हाताशी धरले जात आहे. परंतु जर राज्यात ओबीसी मराठा दंगल झाली तर याला जबाबदारी तेव्हा देवेंद्र फडणवीस असतील असे विधान जरांगे पाटील यांनी काढले. 


 देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने मराठा समाजाचा जागा झाला असून मुलांना आत्महत्या करायची वेळ देऊ नका जागे व्हा असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.


धनंजय मुंडे यांना अजितदादा व मुख्यमंत्री मंत्रिपद देणार नाहीत असे एका प्रश्नाला उत्तर देताना जरांगे म्हणाले. स्वतःच्या भाऊजयला न्याय देता येत नाही तर संतोष भैयाचा मर्डर त्यांच्याच लोकांनी केला असल्याचे जरांगे म्हणाले. तर ते चाळीस कॉल कुणाचे आहेत असा सवाल यावेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

 मराठ्यांचे आरक्षण ओबीसी मधून घेणार असून आरक्षण कसे मिळत नाही असे जाहीर आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिले. तर राज्यातील सर्वच मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे असे वाटत असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना शेवटी मनोज जरांगे पाटील म्हणाले. 


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER