वाल्मिकी रामायणातील युद्धकांडात रामराज्याचे वर्णन आहे. येथे महर्षि वाल्मीकि यांनी रामराज्याचे महत्त्व आणि श्रेष्ठता दर्शविली... ते लिहितात
रामो रामो राम इति प्रजानामभवन् कथाः ।
रामभूतं जगाभूद्रामे राज्यं प्रशासति ॥ ६-१२८-१०३
श्रीराम राज्य करत असताना, लोककेंद्रित राम, राम, राम अशी चर्चा होते. जग रामाचे जग झाले.
फलटण : सचिन मोरे, 9284246026
राजकारणात येण्यापूर्वीच फलटणच्या विकासाच जे स्वप्न पाहिलं होतं, ते डोळ्यासमोर प्रत्यक्ष साकार होत असताना तालुक्याची सत्ता चुकीच्या माणसाच्या हातात जाऊ नये याकरीताच आपण रणजितसिंह यांना जाहीर विरोध करत असल्याची भूमिका रामराजे यांनी घेतली. महायुतीतील एक वरिष्ठ नेते असूनही भाजपा उमेदवाराला ठामपणे विरोध करणे भविष्यातील राजकारणाला किती घातक ठरू शकते, हे माहित असूनही रोखठोक भूमिका घेऊ शकतात ते फक्त रामराजेच. गेल्या 34 वर्षाचा सक्रिय राजकारणाचा अनुभव असणारे रामराजेंना कुठे थांबायचं हे नक्की कळतं त्यामुळे आपणाला तुतारी हातात घ्यायला वेळ लागणार नसल्याचे त्यांनी जाहिर करून एक प्रकारे येणाऱ्या निवडणूकीतील वेगळे संकेत दिलेत हे मात्र नक्की. अशा धाडशी निर्णय क्षमतेमुळेच रामराजेंची 34 वर्षाची सत्ता अबाधित राहिली आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया केल्या व जिंकल्या. या लढायांचं वैशिष्ट्य म्हणजे एका लढाईतील डावपेच पुन्हा कधीच दिसला नाही प्रत्येक लढाईत नवीन युद्धनितीचा वापर शिवाजी महाराज करतात. राजकीय कौशल्य वापरताना अगदी हेच सूत्र रामराजे वापरताना दिसतात म्हणूनच श्रीमंत रामराजे यांना अपराजित राजकीय योद्धा म्ह्टले तर वावगे ठरू नये.
फलटणचे नगरसेवक ते विधान परिषदेचे सभापती हा राजकीय प्रवास तेवढाच कठीण व धाडसचा आहे. खरे तर राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारे रामराजे रमले ते फलटणच्या राजकारणा भोवतीच. त्याला कारणही तसेच आहे. फलटण,खंडाळा, माण व कोरेगाव या तालुक्यातील जनतेसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक पिढ्या पाण्यासाठी संघर्ष करत होत्या. हा पाण्यासाठीचा संघर्ष संपला तरच आपल्या राजकीय जीवनाला किंमत आहे हे रामराजे ओळखून होते. त्यामुळे राजकारणातील अनेक धाडसी निर्णय रामराजे यांनी घेतले. अपक्ष आमदार असूनही महायुतीच्या सत्तेत राजकीय कौशल्य वापरून कृष्णा - खोरे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेले यश हेच खरे रामराजे यांच्या राजकीय जीवनाला मिळालेली कलाटणी होय.
पाण्याविना करपलेल्या जमिनी सारखी माणसांची झालेली दशा, पाण्यासाठी टाहो फोडणारी जनावरे तर प्रसंगी पावसाच्या थेंबासाठी डोळ्यातील आसवांचे थेंबही सुकून गेलेली माणसे वाचण्याचं कसब फक्त रामराजेच जाणो. म्हणूनच की काय संपूर्ण राजकीय जीवन याच पाण्याच्या प्रश्नासाठी खर्ची घातले. त्यामुळे याच पाण्याचे मोल जाणणारी जनता रामराजे यांच्या पाठीशी आजही खंबीरपणे उभी आहे हे वेगळे सांगायला नकोच.
1976 मध्ये केंद्रीय कृष्णा लवादाच्या बच्छाव आयोगाने, महाराष्ट्र सरकारला कृष्णा नदीतून महाराष्ट्राच्या वाट्याचे कर्नाटकात वाहून जाणारे 555 टीएमसी पाणी 2000 सालापर्यंत उचलण्याबाबत निर्देश दिले. हा पश्चिम महाराष्ट्रासाठी कठीण व गुंतागुंतीचा प्रश्न सखोल अभ्यास करुन त्याच्यावर दिवस रात्र एक करुन अनेक आमदारांना पाणी प्रश्नावर एकत्र करणे. आंध्र प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र सरकार यांचा ताळमेळ घालत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांचा पाण्यासाठीच्या संघर्षाची बाजू मांडणे हे फक्त हाडाचे वकील असणारे रामराजेच करू जाणे. खरे तर रामराजेंनी केलेले हा राजकीय संघर्ष, अनेक पिढ्या फेडता नयेणारे रामराजेंचे उपकार आजही जनता विसरली नाही. त्यामुळेच अपराजित रामराज्य आजही अबाधित आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
90 च्या दशकापूर्वीची फलटणची दशा आणि दिशा कोणाला माहिती असेल तर जरूर विचारा. केवळ राजकीय सत्तेच्या लोभापायी दिशाहीन नेतृत्वाने स्वतःच्या हट्टीपणाने तालुक्याला वेठीस धरले होते. रामराजे यांच्या राजकीय प्रवेशाने जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला हेच प्रत्येक जण सांगेल.
राजकीय गणित जुळवताना प्रत्येक निवडणुकीत वेगळी रणनीती आखत विरोधकांना मात देण्यात रामराजे नेहमीच यशस्वी झाले आहेत. सलग ६ वेळा विधानसभा निवडणूक एकहाती जिंकत रामराज्य अबाधित ठेवले आहे. परिस्थिती प्रमाणे बदलण्यापेक्षा परिस्थितीला बदलवणे हे राजकीयसूत्र असल्याचे रामराजे यांच्या राजकारणाचे आणखी एक वैशिष्ट्य. प्रत्येक निवडणुकीत याचा प्रत्यय येतोच आहे. येणारी 2024 ची विधानसभेची निवडणूक एक नवीन राजकीय संघर्ष घेऊन आली आहे. यावेळी राजकीय गणितं काहीशी वेगळी असतील. मात्र राजकारणतील "रामाचे" रामराज्य अबाधित राहिल असेच चित्र सध्या तरी दिसत आहे. कारण, 'राजकीय तत्त्वज्ञानाचा जनक' प्लेटो म्हणतो, ते राज्य आदर्श आहे, जिथे तत्त्वज्ञ राज्य करतात. ते राज्य कायम अबादित राहते.











