Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार अजितदादा यांच्या सारखे कणखर नेतृत्व पुन्हा घडणार नाही,शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेत पाठिंबा दिला - आमदार सचिन पाटील

तंत्रज्ञान आणि आरोग्य - डॉ.प्रसाद जोशी

टीम : धैर्य टाईम्स
नोकिया चे मोठ्ठे आणि जड मोबाईल आले, मग साधे छोटे मोबाईल आले आणि आता तर स्मार्ट फोन चां सुळसुळाटच दिसतो. काहीकाही वेळा त्या स्मार्ट फोन मधील कितीतरी फिचर्स आपण वापरत पण नाही आणि ती आपल्याला माहीत पण नसतात.

   टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान) च्या जगात आम्ही अडकलोय पार!
आहारी न जाता, कामापुरतेच वापर ना यार!!
वरून दिसतोय नुसताच की हो झगमगाट !!!
आरोग्याची तर लागलिये पुरतीच की हो वाट!!!!
सध्याचे जग टेक्नॉलॉजीचेच आहे. नवीन नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होते आहे आणि आपण त्याच्या आहारी जात आहोत.
मला आठवतं आहे की 1998 साली पेजर ची टेक्नॉलॉजी आली, मग नोकिया चे मोठ्ठे आणि जड मोबाईल आले, मग साधे छोटे मोबाईल आले आणि आता तर स्मार्ट फोन चां सुळसुळाटच दिसतो. काहीकाही वेळा त्या स्मार्ट फोन मधील कितीतरी फिचर्स आपण वापरत पण नाही आणि ती आपल्याला माहीत पण नसतात.
ह्या सर्व टेक्नॉलॉजीचा कसा आणि किती वापर करावा हे खरंच अजून आपल्याला कळले आहे का ?
टेक्नॉलॉजी चां सूयोग्य वापर कसा करावा ?
1.सगळ्यात पहिलं म्हणजे आपण हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे की टेक्नॉलॉजी ही आपल्यासाठी आहे, आपण त्या साठी नाही . 
माणसाने त्याच्या बुद्धी ने तिचा शोध लावला आहे त्यामुळे त्याने (माणसाने) ती आपल्याला डोईजड होणार नाहीना या कडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
2.दुसरा मुद्दा टेक्नॉलॉजी ही आपल्या उन्नती साठी आहे ना की अधोगती साठी. आहारी गेलं की विनाश हा अटळच आहे.
3. टेक्नॉलॉजी मुळे जसे फायदे होतात तसे तोटे ही खूप आहेत. गुगल बाबांना तर जगातलं सर्व काही माहिती आहे. काहीवेळा अज्ञानात सुख असतं असं म्हणतात, अनावश्यक गोष्टींचे अर्धवट ज्ञान वाईटच. त्यांनी गैरसमज नक्कीच वाढीला लागतात आणि त्याचे दुष्परिणाम आपण भोगतोच आहोत.
4.टेक्नॉलॉजी मुळे मनुष्याची बुद्धी उंचावत चालली आहे पण त्याचे आरोग्य मात्र वेशीवर टांगले गेले आहे हेही तितकेच खरे.
काय आहेत टेक्नॉलॉजी च्या दुरुपयोगा मुळे होणारे आजार ?
1. सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि तो ही स्मार्ट मोबाईल.
सतत मोबाईल च्या वापरा मुळे मानेचे, कंबरेचे, डोळ्यांचे आणि मानसिक आजार बळावले आहेत. मनुष्या मधला संवाद कुठे तरी हरवला आहे. सर्व जग आभासी बनले आहे. 
‘भावना ’ ही वरवरच्या झाल्या आहेत. मोबाईलचे व्यसन ही मोठी समस्या होऊन बसली आहे. 
माझ्याकडे किती तरी तरुण मुलं मुली पेशंट म्हणून येतात की ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, मणक्यांचे आजार, मानसिक ताण हे सर्व आजार  लहान वयातच होत आहेत.
2.कॉम्प्युटर समोर जे तासनतास  बसतात अर्थात त्यांचे कामचं ते आहे पण वरील सर्व आजार हे त्यांना होताना दिसत आहेत. मान दुखी, कंबर दुखी आणि मणक्यांची झीज ही तर खूपच कॉमन होऊन बसली आहे. 
स्थूल पणा हा पण त्यामुळे वाढीला लागला आहे. लठ्ठ पणा वाढला की बाकीचे आजार हे त्यापाठोपाठ आलेच म्हणून समजा .
3. खूप वेळ एका जागी बसून राहिल्यामुळे शारीरिक क्षमतेचा र्‍हास होऊ  लागला आहे. पूर्वी 100किलो वजनाची पोती उचलणारी माणसे सहज दिसायची, आता 20 किलोचं ठिकं सुद्धा उचलताना फे फे उडते.
4. नवीन टेक्नॉलॉजी च्या नावाखाली लाईफ स्टाईल पण पार बदलून गेली आहे. उशिरा उठणे, रात्री उशिरा झोपणे, तासनतास एका जागी बसणे आणि मग ताण तणावा मुळे व्यसनाधीन होणे. हे चक्र विनाशा कडेच घेऊन जाणारे आहे यात काही शंकाच नाही .
5. अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर आपण मूळ उदिष्टा पासून या भौतिक जगात पार गुरफटून गेलो आहोत. 
‘मनुष्य’ विश्‍वा मधून स्वर्गीय विश्‍वा कडे न जाता आपण परत ‘प्राणी’ विश्‍वाकडे या टेक्नॉलॉजी मुळे वाटचाल करत आहोत. आणि हे मनुष्य जातीला घातक आहे.
आता मग हे टाळायचे कसे ?
आणि खरंच टेक्नॉलॉजीचा वापर किती आणि कसा करावा ?
टेक्नॉलॉजी हे आपल्याला मिळालेले एक वरदान आहे. त्याचा कामा पुरता आणि सुयोग्य वापर ह्यातच आपले हित आहे. लवकर झोपे आणि लवकर उठे हे अंगिकारले पाहिजे. त्याने शरीराला व्यवस्थे मध्ये येण्यास मदत होईल आणि पचन संस्थाही सुधारेल.
- रोजचा स्वतः साठी अर्धा ते एक तास व्यायाम हा झालाच पाहिजे. मग तो कोणताही असेल. चालणे, योगा, पोहणे, पळणे, मैदानी खेळ, सायकलींग असेच अनेक व्यायामांनी शरीराची मशागात होते. स्नायूंना बळकटी येते. संध्यांना वंगण आणि पोषण मिळते आणि शरीर सुदृढ आणि निरोगी राहण्यास नक्कीच मदत होते.
- आहार हा सकस, सात्विक आणि घरचाच असावा.
जंक फूडस् , कोड्रिंक्स ही शक्यतो टाळावीत. 
- पाणी भरपूर प्या . साधारण दोन ते तीन लिटर दिवसातून कमीतकमी.
- मोबाईल किंवा लॅपटॉप वर काम करण्याच्या किंवा टाईमपास करण्याच्या वेळा पक्क्या कराव्यात. म्हणजे स्वतः कडे आणि आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल .
- छंद जोपासा मग तो कुठलाही असो . म्हातारंपणी तोच तुमची साथ नक्की सोडणार नाही .
- सात ते आठ तास शांत झोप शरीराला फार आवश्यक आहे . रात्री झोपताना मोबाईल शक्यतो जवळ नसावाच.
तर प्रियजन हो,
करा टेक्नॉलॉजीचा योग्य वापर,
द्या स्वतःला पुरेसा वेळ वरचेवर,
आजार जातील पळून दूरवर ,
आयुष्य होईल निरोगी, सुदृढ आणि अतिशय सुंदर !!

डॉ. प्रसाद जोशी 
अस्थिरोग शल्य चिकित्सक
जोशी हॉस्पिटल प्रा.लि.फलटण.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER