Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

तंत्रज्ञान आणि आरोग्य - डॉ.प्रसाद जोशी

टीम : धैर्य टाईम्स
नोकिया चे मोठ्ठे आणि जड मोबाईल आले, मग साधे छोटे मोबाईल आले आणि आता तर स्मार्ट फोन चां सुळसुळाटच दिसतो. काहीकाही वेळा त्या स्मार्ट फोन मधील कितीतरी फिचर्स आपण वापरत पण नाही आणि ती आपल्याला माहीत पण नसतात.

   टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान) च्या जगात आम्ही अडकलोय पार!
आहारी न जाता, कामापुरतेच वापर ना यार!!
वरून दिसतोय नुसताच की हो झगमगाट !!!
आरोग्याची तर लागलिये पुरतीच की हो वाट!!!!
सध्याचे जग टेक्नॉलॉजीचेच आहे. नवीन नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होते आहे आणि आपण त्याच्या आहारी जात आहोत.
मला आठवतं आहे की 1998 साली पेजर ची टेक्नॉलॉजी आली, मग नोकिया चे मोठ्ठे आणि जड मोबाईल आले, मग साधे छोटे मोबाईल आले आणि आता तर स्मार्ट फोन चां सुळसुळाटच दिसतो. काहीकाही वेळा त्या स्मार्ट फोन मधील कितीतरी फिचर्स आपण वापरत पण नाही आणि ती आपल्याला माहीत पण नसतात.
ह्या सर्व टेक्नॉलॉजीचा कसा आणि किती वापर करावा हे खरंच अजून आपल्याला कळले आहे का ?
टेक्नॉलॉजी चां सूयोग्य वापर कसा करावा ?
1.सगळ्यात पहिलं म्हणजे आपण हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे की टेक्नॉलॉजी ही आपल्यासाठी आहे, आपण त्या साठी नाही . 
माणसाने त्याच्या बुद्धी ने तिचा शोध लावला आहे त्यामुळे त्याने (माणसाने) ती आपल्याला डोईजड होणार नाहीना या कडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
2.दुसरा मुद्दा टेक्नॉलॉजी ही आपल्या उन्नती साठी आहे ना की अधोगती साठी. आहारी गेलं की विनाश हा अटळच आहे.
3. टेक्नॉलॉजी मुळे जसे फायदे होतात तसे तोटे ही खूप आहेत. गुगल बाबांना तर जगातलं सर्व काही माहिती आहे. काहीवेळा अज्ञानात सुख असतं असं म्हणतात, अनावश्यक गोष्टींचे अर्धवट ज्ञान वाईटच. त्यांनी गैरसमज नक्कीच वाढीला लागतात आणि त्याचे दुष्परिणाम आपण भोगतोच आहोत.
4.टेक्नॉलॉजी मुळे मनुष्याची बुद्धी उंचावत चालली आहे पण त्याचे आरोग्य मात्र वेशीवर टांगले गेले आहे हेही तितकेच खरे.
काय आहेत टेक्नॉलॉजी च्या दुरुपयोगा मुळे होणारे आजार ?
1. सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि तो ही स्मार्ट मोबाईल.
सतत मोबाईल च्या वापरा मुळे मानेचे, कंबरेचे, डोळ्यांचे आणि मानसिक आजार बळावले आहेत. मनुष्या मधला संवाद कुठे तरी हरवला आहे. सर्व जग आभासी बनले आहे. 
‘भावना ’ ही वरवरच्या झाल्या आहेत. मोबाईलचे व्यसन ही मोठी समस्या होऊन बसली आहे. 
माझ्याकडे किती तरी तरुण मुलं मुली पेशंट म्हणून येतात की ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, मणक्यांचे आजार, मानसिक ताण हे सर्व आजार  लहान वयातच होत आहेत.
2.कॉम्प्युटर समोर जे तासनतास  बसतात अर्थात त्यांचे कामचं ते आहे पण वरील सर्व आजार हे त्यांना होताना दिसत आहेत. मान दुखी, कंबर दुखी आणि मणक्यांची झीज ही तर खूपच कॉमन होऊन बसली आहे. 
स्थूल पणा हा पण त्यामुळे वाढीला लागला आहे. लठ्ठ पणा वाढला की बाकीचे आजार हे त्यापाठोपाठ आलेच म्हणून समजा .
3. खूप वेळ एका जागी बसून राहिल्यामुळे शारीरिक क्षमतेचा र्‍हास होऊ  लागला आहे. पूर्वी 100किलो वजनाची पोती उचलणारी माणसे सहज दिसायची, आता 20 किलोचं ठिकं सुद्धा उचलताना फे फे उडते.
4. नवीन टेक्नॉलॉजी च्या नावाखाली लाईफ स्टाईल पण पार बदलून गेली आहे. उशिरा उठणे, रात्री उशिरा झोपणे, तासनतास एका जागी बसणे आणि मग ताण तणावा मुळे व्यसनाधीन होणे. हे चक्र विनाशा कडेच घेऊन जाणारे आहे यात काही शंकाच नाही .
5. अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर आपण मूळ उदिष्टा पासून या भौतिक जगात पार गुरफटून गेलो आहोत. 
‘मनुष्य’ विश्‍वा मधून स्वर्गीय विश्‍वा कडे न जाता आपण परत ‘प्राणी’ विश्‍वाकडे या टेक्नॉलॉजी मुळे वाटचाल करत आहोत. आणि हे मनुष्य जातीला घातक आहे.
आता मग हे टाळायचे कसे ?
आणि खरंच टेक्नॉलॉजीचा वापर किती आणि कसा करावा ?
टेक्नॉलॉजी हे आपल्याला मिळालेले एक वरदान आहे. त्याचा कामा पुरता आणि सुयोग्य वापर ह्यातच आपले हित आहे. लवकर झोपे आणि लवकर उठे हे अंगिकारले पाहिजे. त्याने शरीराला व्यवस्थे मध्ये येण्यास मदत होईल आणि पचन संस्थाही सुधारेल.
- रोजचा स्वतः साठी अर्धा ते एक तास व्यायाम हा झालाच पाहिजे. मग तो कोणताही असेल. चालणे, योगा, पोहणे, पळणे, मैदानी खेळ, सायकलींग असेच अनेक व्यायामांनी शरीराची मशागात होते. स्नायूंना बळकटी येते. संध्यांना वंगण आणि पोषण मिळते आणि शरीर सुदृढ आणि निरोगी राहण्यास नक्कीच मदत होते.
- आहार हा सकस, सात्विक आणि घरचाच असावा.
जंक फूडस् , कोड्रिंक्स ही शक्यतो टाळावीत. 
- पाणी भरपूर प्या . साधारण दोन ते तीन लिटर दिवसातून कमीतकमी.
- मोबाईल किंवा लॅपटॉप वर काम करण्याच्या किंवा टाईमपास करण्याच्या वेळा पक्क्या कराव्यात. म्हणजे स्वतः कडे आणि आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल .
- छंद जोपासा मग तो कुठलाही असो . म्हातारंपणी तोच तुमची साथ नक्की सोडणार नाही .
- सात ते आठ तास शांत झोप शरीराला फार आवश्यक आहे . रात्री झोपताना मोबाईल शक्यतो जवळ नसावाच.
तर प्रियजन हो,
करा टेक्नॉलॉजीचा योग्य वापर,
द्या स्वतःला पुरेसा वेळ वरचेवर,
आजार जातील पळून दूरवर ,
आयुष्य होईल निरोगी, सुदृढ आणि अतिशय सुंदर !!

डॉ. प्रसाद जोशी 
अस्थिरोग शल्य चिकित्सक
जोशी हॉस्पिटल प्रा.लि.फलटण.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER