Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार

आंबेडकरवाद्यांनो सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न झाले का ?

टीम : धैर्य टाईम्स

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न झाले का.? या प्रश्नाचे उत्तर शोधले तर आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षाचा इतिहास असे सांगते की, रिपब्लिकन पक्षाचे नेते नेतृत्वासाठी भांडतं बसले. तु अध्यक्ष की, मी अध्यक्ष या साटमारीत रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट, तट निर्माण झाले ते अजुनही वळवळ करतातचं.रिपब्लिकन, रिपब्लिकन एवढाच कंठशोष केला जातो. सत्तेसाठी कुठलाच प्रयोग केला जातं नाही हे वास्तव आहे. 

रिपब्लिकन या नावाचा वापर करून रा. सु. गवई यांनी स्वतःच्या सत्तेसाठी ,स्वार्थासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, त्याचे फळ म्हणून त्यांना विधानपरिषदेचे उपसभापती,सभापती , राज्यपाल असे सत्तेचे तुकडे मिळतं गेले. आंबेडकरी समुह होता तसाच सत्तेपासून वंचित राहिला. आंबेडकरी समुहाच्या सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न केल्या गेले नाही हा इतिहास आहे. आरोप नाही.

रिपब्लिकन या नावाचा वापर करून रामदास आठवले यांनी स्वतः च्या सत्तेसाठी, स्वार्थापोटी प्रामाणिक प्रयत्न केले त्याचे फळ म्हणून त्यांना खासदारकी,राज्यसभा,समाजकल्याण मंत्री राज्यात आणि केंद्रात असे सत्तेचे तुकडे मिळाले. आंबेडकरी समुह सत्तेपासून वंचित राहीला. हा आरोप नाही घडलेल्या घटनांचा इतिहास आहे.

उत्तरेत कांशीराम यांनी आंबेडकरी समुहाच्या सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. पक्ष केडर बेस केला. नोकरदार वर्गाने आर्थिक रसद पुरविली त्याचे फळ म्हणून मायावती चार वेळा उत्तरप्रदेश सारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या.

आंबेडकरी समूहासाठी सत्ता हवी असेल तर महाराष्ट्रातील आंबेडकरी समुहाने उत्तर प्रदेश प्रमाणे बसपा सारखे सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. सत्ता हवेतून मिळतं नाही. सत्तेसाठी सामाजिक मशागत करावी लागते.

महाराष्ट्रात १९८२ साली ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. त्यांना १९८२ ते २०१४ पर्यंत आंबेडकरी समुहाच्या फुटीचा फटका सहन करावा लागला.प्रस्थापित राजकीय पक्ष आणि मिडिया यांनी आंबेडकरी राजकीय पक्षांचे चार नेते ठरवून टाकले. रा. सु. गवई. रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे आणि प्रकाश आंबेडकर.

"चोघांची माय अन् खाटल्यावर जीव जाय." अशी अवस्था आंबेडकरवादी राजकीय पक्षाची झाली. समाज एकत्र येतं नव्हता. प्रस्थापित राजकीय पक्ष आमिषे देऊन नेत्यांना विकतं घेतं होते.सतत चौघांची चार दिशेला तोंडे सत्ता कशी मिळणार.? अशाही परिस्थिती वर मात करीत ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः च्या खासदारकीचा,मंत्रीपदाचा त्याग करून आत्ता पर्यंत १० आमदार निवडून आणलेले आहेत. १९९९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तीन आमदार निवडून आले आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना कॉंग्रेस आघाडीच्या सरकार मध्ये भारिप बहूजन महासंघ सहयोगी पक्ष होता. दोन कॅबिनेट मंत्री,एक राज्यमंत्री आणि एक महामंडळ अशी सत्ता हस्तगत केली.ती आंबेडकरवादी समूहासाठी सत्ता होती. बंजारा समाजाचा कॅबिनेट मंत्री,कोळी समाजाचा कॅबिनेट मंत्री, बारी समाजाचा राज्यमंत्री,बौद्ध समाजाचा खनिकर्म महामंडळाचा अध्यक्ष होता.

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला पॅटर्न विकसित केला आणि समाजासमोर एक मॉडेल सादर केले. गेल्या ३० वर्षापासून अकोला जिल्हा परिषद ही भारिप बहूजन महासंघ किंवा वंचित बहूजन आघाडीच्या ताब्यात आहे. अकोला पॅटर्न राज्यात राबविला तर आपणं सत्ताधारी होऊ शकतो हा विश्वास ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडला आहे.

हा सत्तासंघर्ष आहे आणि म्हणून ही प्रदिर्घ काळ चालणारी प्रक्रिया आहे. झटपट सत्ता मिळतं नाही. एका निवडणुकीत निराश आणि हताश होणारा कार्यकर्ता हा या सत्ता संघर्षात तग धरू शकत नाही. हा काळ आणीबाणीचा आहे. लोकशाही धोक्यात आहे. विष्णूचा नवीन ईव्हीएम अवतार लोकशाही गिळंकृत करुनच थांबणार आहे. सत्तेसाठी झगडणारा समुह निराश आणि हताश झाला पाहिजे म्हणून ईव्हीएमद्वारे झटके देण्याचा प्रयोग केला जातो आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती प्रतिक्रांती मध्ये नमूद केले आहे की, इथला प्रत्येक संघर्ष हा सत्ता संघर्ष आहे. सत्ताधारी होण्यासाठी नियोजन बद्ध कार्य करण्याची गरज आहे. प्रत्येकाला इथं आपलं योगदान देता आलं पाहिजे. सल्ले देणारे अनेक आहेत मात्र निस्वार्थ झटणारे किती आहेत.? विचारवंत, स्वयं घोषित पत्रकार, संपादक, नोकरदार, साहित्यिक,आरक्षण लाभार्थी, कार्यकर्ता आणि मतदार सगळ्यांनी विचार केला पाहिजे. कारण लोकशाही धोक्यात आहे. त्याचे कारण असे की, जसा वामन अवतार झाला आणि बळीचे राज्य गिळंकृत केले. अगदी त्याच धर्तीवर इव्हीएम अवतार आला आहे आणि तो लोकशाही गिळंकृत करुनच थांबणार आहे.

मुठभर सवर्ण नियोजन बद्ध पद्धतीने सत्तेसाठी सातत्यपूर्ण रितीने वर्षातील ३६५ दिवस काम करीत असतात म्हणून ते सत्ताधारी आहेत. आपणं निस्वार्थ वृत्तीने समुहाच्या सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न करतो का.? हा प्रत्येक आंबेडकरवादी माणसाने स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे आणि मग राजकीय पक्ष आणि नेतृत्वाला सल्ला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आंबेडकरी चळवळीत सबब सांगून कार्य नाकारणारे अनेक आहेत. मात्र नोकरदार असुनही सवर्ण अधिकारी,कर्मचारी आरएसएस मध्ये योगदान देतात. काही सामाजिक कार्याचा दाखला देत राजकीय पक्षांना मदत करतात. सवर्णाकडे कमालीची सामाजिक बांधिलकी आहे आणि म्हणूनच ते सत्ताधारी आहेत.

आंबेडकरवाद्यांनो एकमेकांचा द्वेष करणे थांबले पाहिजे. सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. निराशेच्या गर्तेतून बाहेर पडून आजपासून कार्याला लागले पाहिजे. हताश होण्याचे काहीही कारण नाही. सवर्ण मुठभर आहेत ते समोरासमोरची लढाई कधीच लढतं नाहीत. तुम्ही पुढाकार घेतला आणि बहूजन वर्गाला सोबतं घेऊन सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू केले तर सवर्ण कोमात जातीलं. आपणं सत्ताधारी असु.

साभार - भास्कर भोजने 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER