Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

आंबेडकरवाद्यांनो सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न झाले का ?

टीम : धैर्य टाईम्स

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न झाले का.? या प्रश्नाचे उत्तर शोधले तर आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षाचा इतिहास असे सांगते की, रिपब्लिकन पक्षाचे नेते नेतृत्वासाठी भांडतं बसले. तु अध्यक्ष की, मी अध्यक्ष या साटमारीत रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट, तट निर्माण झाले ते अजुनही वळवळ करतातचं.रिपब्लिकन, रिपब्लिकन एवढाच कंठशोष केला जातो. सत्तेसाठी कुठलाच प्रयोग केला जातं नाही हे वास्तव आहे. 

रिपब्लिकन या नावाचा वापर करून रा. सु. गवई यांनी स्वतःच्या सत्तेसाठी ,स्वार्थासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, त्याचे फळ म्हणून त्यांना विधानपरिषदेचे उपसभापती,सभापती , राज्यपाल असे सत्तेचे तुकडे मिळतं गेले. आंबेडकरी समुह होता तसाच सत्तेपासून वंचित राहिला. आंबेडकरी समुहाच्या सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न केल्या गेले नाही हा इतिहास आहे. आरोप नाही.

रिपब्लिकन या नावाचा वापर करून रामदास आठवले यांनी स्वतः च्या सत्तेसाठी, स्वार्थापोटी प्रामाणिक प्रयत्न केले त्याचे फळ म्हणून त्यांना खासदारकी,राज्यसभा,समाजकल्याण मंत्री राज्यात आणि केंद्रात असे सत्तेचे तुकडे मिळाले. आंबेडकरी समुह सत्तेपासून वंचित राहीला. हा आरोप नाही घडलेल्या घटनांचा इतिहास आहे.

उत्तरेत कांशीराम यांनी आंबेडकरी समुहाच्या सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. पक्ष केडर बेस केला. नोकरदार वर्गाने आर्थिक रसद पुरविली त्याचे फळ म्हणून मायावती चार वेळा उत्तरप्रदेश सारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या.

आंबेडकरी समूहासाठी सत्ता हवी असेल तर महाराष्ट्रातील आंबेडकरी समुहाने उत्तर प्रदेश प्रमाणे बसपा सारखे सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. सत्ता हवेतून मिळतं नाही. सत्तेसाठी सामाजिक मशागत करावी लागते.

महाराष्ट्रात १९८२ साली ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. त्यांना १९८२ ते २०१४ पर्यंत आंबेडकरी समुहाच्या फुटीचा फटका सहन करावा लागला.प्रस्थापित राजकीय पक्ष आणि मिडिया यांनी आंबेडकरी राजकीय पक्षांचे चार नेते ठरवून टाकले. रा. सु. गवई. रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे आणि प्रकाश आंबेडकर.

"चोघांची माय अन् खाटल्यावर जीव जाय." अशी अवस्था आंबेडकरवादी राजकीय पक्षाची झाली. समाज एकत्र येतं नव्हता. प्रस्थापित राजकीय पक्ष आमिषे देऊन नेत्यांना विकतं घेतं होते.सतत चौघांची चार दिशेला तोंडे सत्ता कशी मिळणार.? अशाही परिस्थिती वर मात करीत ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः च्या खासदारकीचा,मंत्रीपदाचा त्याग करून आत्ता पर्यंत १० आमदार निवडून आणलेले आहेत. १९९९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तीन आमदार निवडून आले आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना कॉंग्रेस आघाडीच्या सरकार मध्ये भारिप बहूजन महासंघ सहयोगी पक्ष होता. दोन कॅबिनेट मंत्री,एक राज्यमंत्री आणि एक महामंडळ अशी सत्ता हस्तगत केली.ती आंबेडकरवादी समूहासाठी सत्ता होती. बंजारा समाजाचा कॅबिनेट मंत्री,कोळी समाजाचा कॅबिनेट मंत्री, बारी समाजाचा राज्यमंत्री,बौद्ध समाजाचा खनिकर्म महामंडळाचा अध्यक्ष होता.

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला पॅटर्न विकसित केला आणि समाजासमोर एक मॉडेल सादर केले. गेल्या ३० वर्षापासून अकोला जिल्हा परिषद ही भारिप बहूजन महासंघ किंवा वंचित बहूजन आघाडीच्या ताब्यात आहे. अकोला पॅटर्न राज्यात राबविला तर आपणं सत्ताधारी होऊ शकतो हा विश्वास ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडला आहे.

हा सत्तासंघर्ष आहे आणि म्हणून ही प्रदिर्घ काळ चालणारी प्रक्रिया आहे. झटपट सत्ता मिळतं नाही. एका निवडणुकीत निराश आणि हताश होणारा कार्यकर्ता हा या सत्ता संघर्षात तग धरू शकत नाही. हा काळ आणीबाणीचा आहे. लोकशाही धोक्यात आहे. विष्णूचा नवीन ईव्हीएम अवतार लोकशाही गिळंकृत करुनच थांबणार आहे. सत्तेसाठी झगडणारा समुह निराश आणि हताश झाला पाहिजे म्हणून ईव्हीएमद्वारे झटके देण्याचा प्रयोग केला जातो आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती प्रतिक्रांती मध्ये नमूद केले आहे की, इथला प्रत्येक संघर्ष हा सत्ता संघर्ष आहे. सत्ताधारी होण्यासाठी नियोजन बद्ध कार्य करण्याची गरज आहे. प्रत्येकाला इथं आपलं योगदान देता आलं पाहिजे. सल्ले देणारे अनेक आहेत मात्र निस्वार्थ झटणारे किती आहेत.? विचारवंत, स्वयं घोषित पत्रकार, संपादक, नोकरदार, साहित्यिक,आरक्षण लाभार्थी, कार्यकर्ता आणि मतदार सगळ्यांनी विचार केला पाहिजे. कारण लोकशाही धोक्यात आहे. त्याचे कारण असे की, जसा वामन अवतार झाला आणि बळीचे राज्य गिळंकृत केले. अगदी त्याच धर्तीवर इव्हीएम अवतार आला आहे आणि तो लोकशाही गिळंकृत करुनच थांबणार आहे.

मुठभर सवर्ण नियोजन बद्ध पद्धतीने सत्तेसाठी सातत्यपूर्ण रितीने वर्षातील ३६५ दिवस काम करीत असतात म्हणून ते सत्ताधारी आहेत. आपणं निस्वार्थ वृत्तीने समुहाच्या सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न करतो का.? हा प्रत्येक आंबेडकरवादी माणसाने स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे आणि मग राजकीय पक्ष आणि नेतृत्वाला सल्ला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आंबेडकरी चळवळीत सबब सांगून कार्य नाकारणारे अनेक आहेत. मात्र नोकरदार असुनही सवर्ण अधिकारी,कर्मचारी आरएसएस मध्ये योगदान देतात. काही सामाजिक कार्याचा दाखला देत राजकीय पक्षांना मदत करतात. सवर्णाकडे कमालीची सामाजिक बांधिलकी आहे आणि म्हणूनच ते सत्ताधारी आहेत.

आंबेडकरवाद्यांनो एकमेकांचा द्वेष करणे थांबले पाहिजे. सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. निराशेच्या गर्तेतून बाहेर पडून आजपासून कार्याला लागले पाहिजे. हताश होण्याचे काहीही कारण नाही. सवर्ण मुठभर आहेत ते समोरासमोरची लढाई कधीच लढतं नाहीत. तुम्ही पुढाकार घेतला आणि बहूजन वर्गाला सोबतं घेऊन सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू केले तर सवर्ण कोमात जातीलं. आपणं सत्ताधारी असु.

साभार - भास्कर भोजने 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER