Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी - उपमुख्यमंत्री अजित पवार

टीम : धैर्य टाईम्स

सातारा प्रतिनिधी 

: माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचे देखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे. तुमची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असण्याबरोबरच सत्य, पारदर्शकता आणि नैतिकतेला महत्त्व दिले जावे, यामुळे पत्रकारितेचा गौरव वाढेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.


मावळा फौंडेशन आणि जिल्ह्यातील सर्व साहित्यिक आणि पत्रकारांतर्फे ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ यांचा गौरव समारंभ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, पुणे विभागीय अधिस्वीकृतीचे अध्यक्ष हरीष पाटणे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे आदी उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सर्व पत्रकारांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊन स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे ही आता काळाची गरज आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आता पत्रकारितेतही होत आहे. हे तंत्रज्ञान आता पत्रकारांनीही अवगत केले पाहिजे. पत्रकारितेचे मूल्ये ही केवळ पत्रकारच जपू शकतात हेही लक्षात ठेवले पाहिजे. पत्रकारांवर हल्ले व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने कसे कायदेशीर संरक्षण देता येईल यासाठी प्रयत्न केला. 


आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि या योजनेच्या अंतर्गत पात्र ज्येष्ठ पत्रकारांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य दिले जाते असे सांगून अजित पवार म्हणाले, पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत दरमहा ११ हजार रुपये दिला जाणारा सन्मान निधी 20 हजार रुपये करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. तसेच शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सव पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून पत्रकारांच्या कुटुंबीयांना विविध प्रकारे आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचे काम शासन करीत आहे. शासन म्हणून काम करत असतानाच समाजातल्या सर्व घटकांना आपल्याला बरोबर घेऊन जाता येईल, सर्वांचे प्रश्न हे कसे मार्गी लावता येतील यावर शासनाचा भर आहे. 


आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ यांनी केले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारकाच्या उभारणीसाठी अतिशय मोलाची भूमिका त्यांनी बजावली. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव आणि कार्य प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले. श्री. बेडकीहाळ यांनी पत्रकारितेला एक दिशा दिली. त्यांनी केवळ पत्रकारिता व्यवसाय न मानता समाज जागृतीचं साधन म्हणून स्वीकारले. त्यांचे योगदान आजच्या तरुण पत्रकारांसाठी एक आदर्श आहे. त्यांनी लेखनातून आणि कार्यातून सामाजिक सुधारणा, शिक्षणाचा प्रसार आणि मराठी भाषेचा, संस्कृतीचा गौरव यांचा सातत्याने पुरस्कार केला. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि समाजातील दुरावस्थेवर प्रकाश टाकण्याचे काम केले. रवींद्रजींनी आपल्या आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये पत्रकारितेप्रमाणे साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. मर्ढे येथील बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मारकासाठी त्यांनी पाठपुरावा केला. हे स्मारक पूर्ण झाले असून याचे लोकार्पणही लवकर करु असेही, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.


मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील म्हणाले, पत्रकार आणि साहित्य हे कुठल्या एका विचाराचे नसतात आणि कुठल्याही एका विचाराबरोबर ते जात नाहीत. जे दिसतं घडतं त्यावर ते त्यांचे मोकळेपणाने आणि स्पष्टपणे भाष्य करतात. श्री. बेडकीहाळ यांनी ही तत्वे जपली आहेत, परंतु त्यांनी पवार कुटुंबीयांशी आपले नाते हे आजपर्यंत ही अतिशय उत्तम पद्धतीने कायम ठेवले. पत्रकारिता, साहित्य क्षेत्राबरोबरच, समाजकारणसुद्धा उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील कविवर्य बा.सी. मर्ढेकर, कवी यशवंत, कवी गिरीश आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि या जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची परंपरा असलेल्या सातारा जिल्ह्यात रवींद्रजी बेडकीहाळ यांची वाटचाल, त्यांचा विचार आणि साहित्यक्षेत्रामध्ये त्यांनी केलेले काम हे निश्चितपणाने एक आगळावेगळा ठसा निर्माण करणारे आहे.


सत्काराला उत्तर देताना श्री. बेडकीहाळ म्हणाले, आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान निधी 11 हजार रुपये होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी 50 कोटी रुपयांची तरतुद केली. आता हा निधी 20 हजार रुपये करण्यात आला आहे. बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मारकासाठी निधी कमी पडत होता. साडेबत्तीस लाख रुपये देण्यात आले. हे स्मारक पूर्ण झाले आहे. त्याचे लवकरात लवकर लोकर्पण व्हावे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमास साहित्य क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, नागरिक उपस्थित होते.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER